शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

‘सोफिया’चे पाणी तीन महिने बंद करा

By admin | Updated: May 9, 2016 00:15 IST

राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे.

युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक : जलसंपदामंत्र्यांना मागण्यांच्या पूर्ततेसाठी साकडेअमरावती : राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे. विशेषत: अमरावती व बडनेरा शहराला पाणीटंचाई जाणवत असल्याने नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाला दिले जाणारे पाणी तीन महिन्यांपर्यंत बंद करण्यात यावे, अशी मागणी आ. रवि राणाद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने जलसंपदामंत्र्यांकडे करण्यात आली.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ‘सोफिया’त पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची कैफियत त्यांच्या पुढ्यात मांडली. मे महिन्यात भीषण पाण टंचाई भासणार असल्याने तत्पूर्वी उपाययोजना म्हणून सोफियाला दिले जाणारे पाणी पुढील तीन महिने पर्यत बंद करुन पिण्याचे पाण्याला प्राधान्य द्यावे, असे युवा स्वाभिमानने पत्राद्वारे कळविले आहे. जिल्ह्यात निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना चारपट मोबदला देण्यात यावा, गावांचे पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात यावे, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात भूधारकांना लागू केलेला २ चा गुणक शासनाने अमरावतीत लागू करावा, भूधारक व शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार २ चा गुणक लागू करावा, भातकुली तालुक्यात कुंड या गावाचे पुनर्वसनचे ले-आऊट तयार झाले असून येथे नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावा, नागरी सुविधा मिळेपर्यंत महसूल विभागाने भूखंडाचे वाटप करू नये, असे पत्राद्वारे कळविले आहे. पेढी प्रकल्पात ज्या गावांत सहामाही बागायती करण्यात आल्यात त्या गावांना बागायती शेतीचे भाव निश्चित करावे. सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, ते त्वरने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. गाव पुनर्वसन करून ग्रामस्थांना न्याय प्रदान करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उमेश ढोणे, अभिजित देशमुख, अंकुश ठाकरे, मंगेश कोकाटे, अजय बोबडे, ज्ञानेश्वर कळसकर, बबलू दुर्गे, मंगेश इंगोले, भूषण माने, बाळासाहेब दातीर, मयूर माहोरे, विनोद पटवेकर, अमोल इंगोले आदी उपस्थित होते.