शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘सोफिया’चे पाणी तीन महिने बंद करा

By admin | Updated: May 9, 2016 00:15 IST

राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे.

युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक : जलसंपदामंत्र्यांना मागण्यांच्या पूर्ततेसाठी साकडेअमरावती : राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे. विशेषत: अमरावती व बडनेरा शहराला पाणीटंचाई जाणवत असल्याने नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाला दिले जाणारे पाणी तीन महिन्यांपर्यंत बंद करण्यात यावे, अशी मागणी आ. रवि राणाद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने जलसंपदामंत्र्यांकडे करण्यात आली.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ‘सोफिया’त पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची कैफियत त्यांच्या पुढ्यात मांडली. मे महिन्यात भीषण पाण टंचाई भासणार असल्याने तत्पूर्वी उपाययोजना म्हणून सोफियाला दिले जाणारे पाणी पुढील तीन महिने पर्यत बंद करुन पिण्याचे पाण्याला प्राधान्य द्यावे, असे युवा स्वाभिमानने पत्राद्वारे कळविले आहे. जिल्ह्यात निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना चारपट मोबदला देण्यात यावा, गावांचे पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात यावे, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात भूधारकांना लागू केलेला २ चा गुणक शासनाने अमरावतीत लागू करावा, भूधारक व शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार २ चा गुणक लागू करावा, भातकुली तालुक्यात कुंड या गावाचे पुनर्वसनचे ले-आऊट तयार झाले असून येथे नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावा, नागरी सुविधा मिळेपर्यंत महसूल विभागाने भूखंडाचे वाटप करू नये, असे पत्राद्वारे कळविले आहे. पेढी प्रकल्पात ज्या गावांत सहामाही बागायती करण्यात आल्यात त्या गावांना बागायती शेतीचे भाव निश्चित करावे. सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, ते त्वरने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. गाव पुनर्वसन करून ग्रामस्थांना न्याय प्रदान करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उमेश ढोणे, अभिजित देशमुख, अंकुश ठाकरे, मंगेश कोकाटे, अजय बोबडे, ज्ञानेश्वर कळसकर, बबलू दुर्गे, मंगेश इंगोले, भूषण माने, बाळासाहेब दातीर, मयूर माहोरे, विनोद पटवेकर, अमोल इंगोले आदी उपस्थित होते.