शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

हवामान बदलाने आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:10 IST

अमरावती: शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण, मध्येच पडत असलेला पाऊस अशा स्थितीत जुळवून घेणे नागरिकांना अडचणीचे ठरत ...

अमरावती: शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण, मध्येच पडत असलेला पाऊस अशा स्थितीत जुळवून घेणे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. ऋतूमान बदलाचा मानवी आरोग्यावर तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारच्या व्याधींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा बदलत्या वातावरणात आरोग्याची पुरेशी दक्षता हाच रामबाण उपाय ठरू शकतो, असे मत झेडपीच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण उष्मा, पाऊस, थंडी असे वातावरण आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे आहे. अशा वातावरणात व्हायरल इन्फेक्शनची शक्यता वाढते. वातावरणातील बदलामुळे प्रामुख्याने सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, अस्थमा बळावण्याने संसर्गजन्य आजारामुळे रुग्णसंख्याही वाढू शकते. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शरीराला काही वेळ लागतो. या समस्येत डासांचीदेखील भर पडू शकते. त्यामुळे डासांची उत्पत्ती स्थळे तत्काळ नष्ट करण्याचे आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवून पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला. ते सर्दी, खोकला, घशाचे विकार, ताप डोकेदुखी, उलट्या जुलाब यासारखे आजार झाल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे फायदेशीर ठरू शकते. नागरिक घरगुती उपाय करण्यावर भर देतात मात्र अशा वेळी कुठलेही घरगुती उपचार घेणे चुकीचे ठरू शकते. आजारी असताना तोंडाला रुमाल बांधावा, लहान मुले ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला यांच्यावर बदलत्या वातावरणाचा परिणाम होतो. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कोट

वातावरणातील बदलामुळे विषाणूचा संसर्ग वाढतोय. ॲलर्जीच्या आजाराचे प्रमाण बळावते. त्यामुळे आरोग्याची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. परिपक्व आहार वेळी महत्त्वाचा आहे. आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत

- रेवती साबळे,

अतिरक्त जिल्हा आरोग्य अधिकारी