शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

लोकसहभागातून होणार चुडामणी नदीची स्वच्छता

By admin | Updated: May 9, 2016 00:12 IST

नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते.

अमरिश आत्राम यांच्या हस्ते जलपूजन : नागरिकांनी हातभार लावावा वरुड : नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते. ती पार पाडणे काळाची गरज आहे. रोगरार्ईमुक्त व्हायचे असेल तर वैयक्तिक स्वच्छेतवर भर देणे गरजेचे आहे. वरुडातील चुडामणी नदीची स्वच्छता लोकसहभागातून केली जात असल्याने ही बाब शहरवासीयांकरिता कौतुकास्पद आहे. ‘नदी स्वच्छ तर गाव स्वच्छ ’ अभियानाला सर्वांनी सहकार्य केल्यास गावाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी राज्यमंत्री राजे अमरिश आत्राम यांनी चुडामणी साफसफाई अभियानादरम्यान जलपूजन कार्यक्रमात केले. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, नरेशचंद्र ठाकरे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, उपाध्यक्ष लीलाधर बेलसरे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाणे, जि.प. सदस्य विक्रम ठाकरे, अर्चना मुरुमकर, राजेंद्र राजोरीया, मनोहर आंडे, नितीन खेरडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक प्रमोद पोतदार, व्यापारी संघाचे अध्यक्ष रितेश शहा, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद टाकरखेडे, लोकेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. खा. रामदास तडस यांनी सांगितले की, लोकसहभागातून प्रमाणिकपणे कोणतेही काम होवू शकते असे सांगितले. याप्रसंगी चुडामणीच्या पूर सरंक्षक भिंतीकरिता खासदार निधीतून २० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)