शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जेलमधून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:19 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देनाला तुंबला : दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.चपराशीपुरा परिसरात बहुतांश नागरिक दाटीवाटीने वास्तव्य करीत असल्याने तेथे मोकळी हवा दुर्लभच. त्यातही नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढणे साहजिकच. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंद्यांसह कर्मचारी राहतात. तेथील सांडपाणी गजानननगरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. परंतु कारागृहाच्या जागेतील ती नाली गाळाने बुजली असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नालीऐवजी खुल्या जागेतून पाणी वाहत आहे. पुढे गजानननगरातील नाल्यात जात होते. मात्र, अनेक दिवसांपासून तो नाला कचऱ्याने पूर्णत: तुंबल्यामुळे सांडपाणी नाल्याच्या वरच्या भागात जमा होत आहे. परिणामी साचलेल्या सांडपाण्यावर डासांचा थर कायम राहत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्यात.दमट वातावरणाचा परिणामचपराशीपुरा प्रभागात सामान्य नागरिकांचे वास्तव्य असल्याने तोकड्या जागेत शक्य तशा पद्धतीने घरे बांधून नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे दमट वातावरणात मुंबईप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव येथील नागरिक घेत आहेत. त्यातही सफाईअभावी दुर्गंधीचा सामना करावे लागत असल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.गत वर्षात डेंग्यूनेचा कहरआॅगस्ट ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान शहरात डेंग्यू आजाराने कहरच केला. याबाबत 'लोकमत'ने मालिकाच चालविली. याची दखल घेतल्याने काही भागातील समस्या निवारण्यात आली. या भागात सर्वाधिक नागरिक डेंग्यूने आजारी होते. ही स्थिती अस्वच्छतेमुळे उदभवल्यानंतरही येथील अद्याप स्थिती सुधारलेली नाही