शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जेलमधून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:19 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देनाला तुंबला : दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.चपराशीपुरा परिसरात बहुतांश नागरिक दाटीवाटीने वास्तव्य करीत असल्याने तेथे मोकळी हवा दुर्लभच. त्यातही नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढणे साहजिकच. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंद्यांसह कर्मचारी राहतात. तेथील सांडपाणी गजानननगरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. परंतु कारागृहाच्या जागेतील ती नाली गाळाने बुजली असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नालीऐवजी खुल्या जागेतून पाणी वाहत आहे. पुढे गजानननगरातील नाल्यात जात होते. मात्र, अनेक दिवसांपासून तो नाला कचऱ्याने पूर्णत: तुंबल्यामुळे सांडपाणी नाल्याच्या वरच्या भागात जमा होत आहे. परिणामी साचलेल्या सांडपाण्यावर डासांचा थर कायम राहत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्यात.दमट वातावरणाचा परिणामचपराशीपुरा प्रभागात सामान्य नागरिकांचे वास्तव्य असल्याने तोकड्या जागेत शक्य तशा पद्धतीने घरे बांधून नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे दमट वातावरणात मुंबईप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव येथील नागरिक घेत आहेत. त्यातही सफाईअभावी दुर्गंधीचा सामना करावे लागत असल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.गत वर्षात डेंग्यूनेचा कहरआॅगस्ट ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान शहरात डेंग्यू आजाराने कहरच केला. याबाबत 'लोकमत'ने मालिकाच चालविली. याची दखल घेतल्याने काही भागातील समस्या निवारण्यात आली. या भागात सर्वाधिक नागरिक डेंग्यूने आजारी होते. ही स्थिती अस्वच्छतेमुळे उदभवल्यानंतरही येथील अद्याप स्थिती सुधारलेली नाही