शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:19 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देनाला तुंबला : दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.चपराशीपुरा परिसरात बहुतांश नागरिक दाटीवाटीने वास्तव्य करीत असल्याने तेथे मोकळी हवा दुर्लभच. त्यातही नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढणे साहजिकच. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंद्यांसह कर्मचारी राहतात. तेथील सांडपाणी गजानननगरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. परंतु कारागृहाच्या जागेतील ती नाली गाळाने बुजली असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नालीऐवजी खुल्या जागेतून पाणी वाहत आहे. पुढे गजानननगरातील नाल्यात जात होते. मात्र, अनेक दिवसांपासून तो नाला कचऱ्याने पूर्णत: तुंबल्यामुळे सांडपाणी नाल्याच्या वरच्या भागात जमा होत आहे. परिणामी साचलेल्या सांडपाण्यावर डासांचा थर कायम राहत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्यात.दमट वातावरणाचा परिणामचपराशीपुरा प्रभागात सामान्य नागरिकांचे वास्तव्य असल्याने तोकड्या जागेत शक्य तशा पद्धतीने घरे बांधून नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे दमट वातावरणात मुंबईप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव येथील नागरिक घेत आहेत. त्यातही सफाईअभावी दुर्गंधीचा सामना करावे लागत असल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.गत वर्षात डेंग्यूनेचा कहरआॅगस्ट ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान शहरात डेंग्यू आजाराने कहरच केला. याबाबत 'लोकमत'ने मालिकाच चालविली. याची दखल घेतल्याने काही भागातील समस्या निवारण्यात आली. या भागात सर्वाधिक नागरिक डेंग्यूने आजारी होते. ही स्थिती अस्वच्छतेमुळे उदभवल्यानंतरही येथील अद्याप स्थिती सुधारलेली नाही