शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा काठावरील नागरिक भयग्रस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 00:24 IST

दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून

दोन वर्षांपूर्वीचा प्रलय : उद्ध्वस्त घरे अद्यापही तशीच, नागरिकांना सतावते पुराची भीती विलास खाजोने ब्राम्हणवाडा थडी दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून शासनाच्या दुर्लक्षामुळे मोडलेल्या झोपड्यांमध्ये भयकंप स्थितीत अनेक नागरिक जीवन जगत आहे. दोन वर्षांपूर्वी २७ जुलै २०१४ ला पूर्णा एकट्या ब्राम्हणवाडा थडी येथील १७१ कुटुंबांतील ८५५ सदस्यांना या पुराचा फटका बसला. काही लोकांचे पूर्णत: तर काहींचे अंशत: घराचे नुकसान झाले. तात्पुरती मलमपट्टी म्हणून तहसील कार्यालयाच्यावतीने या १७१ कुटुंबांना खाण्यापिण्यासाठी निधी दिला. सामाजिक जाणिवेतून काही सामाजिक संघटनांनी या कुटुंबांना मदत केली. याकाळात काही राजकीय नेत्यांनी त्या काळात या ठिकाणी येऊन मोठमोठी आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात या पूरग्रस्तांचे पूनर्वसन करण्यासाठी शासनस्तरावर ठोस पावले अजूनपर्यंत न उचलल्याने दोन वर्षे उलटूनही पूरग्रस्त कुटुंबे चंद्रमौळी झोपड्यांमध्ये भयग्रस्त स्थितीत जीवन जगत आहेत. या १७१ कुटुंबांपैकी १०० कुटुंबांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनायांना त्यांनी ५ आॅगस्टला निवेदन देऊनही शासनाने याची दखल न घेतल्याने असे जीणे जगावे लागत असल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे. पूर ओसरल्यानंतर तातडीने ग्रामसभा घेऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असा ठरावा ग्रामसभेने घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधी पुढे कारवाई केली नाही. आम्ही पूरग्रस्तांच्या बाजूने आहोत. गरज भासल्यास नागरिकांसाठी पुन्हा शासनस्तरावर प्रयत्न करू. - नंदकिशोर वासनकर, सरपंच, ब्राम्हणवाडा थडी मी म्हातारा असून माझेकडून कोणतेही कामधंदा होत नसल्याने मी शासनाचे श्रावणबाळ योजनेवर जगत आहे. पूर्णेच्या पुरात घर वाहून गेल्याने मला राहायची सोय नाही. मी नातेवाईकांकडे राहून दिवस काढीत आहे. शासनाकडून घरकुलाची अपेक्षा आहे. - महादेव जांगतोड, पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी पूर्णेच्या महापुराने आमचे सर्वस्व नेले. घर तर पडलेच त्यासोबत घरातील १०० क्विंटल कांदे, गहू व भांडेकुंडी सर्व वाहून गेले. आज आम्ही तात्पुरती खोली बांधून त्यामध्ये सर्व कुटुंब राहत आहोत. शासनाने घरकूल द्यावे किंवा पुनर्वसनामध्ये घर बांधून द्यावे. - महादेव यावले, पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी