शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कृषी विभागाकडून रासायनिक खत बचतीची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

अमरावती : येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी कृषी विभागाकडून खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात ...

अमरावती : येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी कृषी विभागाकडून खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

पिकांच्या अन्नद्रव्यांसाठी केवळ रासायनिक खतांवरच अवलंबून न राहता जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, नाडेप खत, बायोडायनामिक कंपोस्ट, हिरवळीचे खत वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे जमीनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात सुधारणा होते. अन्नद्रव्यांची उपलब्धता व उपयुक्तता वाढते. रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी व केएसएम यासारखे जीवाणू संवर्धके किंवा जीवाणू संघ प्रत्येक पिकात शिफारशीप्रमाणे बीज प्रक्रियेसाठी वापरल्यास रासायनिक खतांच्या वापरात बचत होते, असे चवाळे म्हणाले.

पिकांना आवश्यक अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी खतांची बाजारातील उपलब्धता, सद्यस्थितीतील किमतीनुसार येणारा खर्च, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खतमात्रा आदी बाबींचा विचार करणे गरजेचे असते. माती परीक्षणानुसार किंवा जमीन सुपिकता निर्देशांकानुसार खतांचा वापर केल्यास शिफारशीत खत मात्रा व जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता यांची सांगड घालून द्यावयाच्या प्रत्यक्ष खताची मात्रा तयार करता येते. शेतकऱ्यांनी एकाच प्रकारच्या खतांचा वापर करण्याऐवजी बाजारातील उपलब्धता, खर्च व शिफारस या बाबींचा विचार करून रासायनिक खताची निवड करावी जेणेकरून ठराविक खतांच्या अतिवापरावरील ताण कमी होईल व बाजारात उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या पर्यायी वापराला चालना मिळेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी असंतुलित व मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर टाळावा व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांनी केले.

खत बचतीच्या विशेष मोहिमेत गावागावांतून कार्यशाळा, ऑनलाईन कार्यक्रम आदींद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोट

सोयाबीन, कापूस, ज्वारी या प्रमुख पीकांसाठी रासायनिक खतांचा मोठा वापर होतो. तो अनेकदा असंतुलित असतो. त्यामुळे आवश्यक प्रमाणात खताची मात्रा पिकांना मिळत नाही. त्यामुळे पीकाचा उत्पादन खर्च वाढतो व निव्वळ उत्पन्न कमी होते. त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार खत मात्रांचा अवलंब शेतकरी बांधवांनी करावा.

- जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे