शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांतील पाण्याची पातळी तपासा

By admin | Updated: March 5, 2017 00:13 IST

उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी.

पालकमंत्री : पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभाअमरावती : उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी. पाणीटंचाई निवारणासाठी संबंधित विभागाने सुनियोजित उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीत दिले.संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जि.प. सदस्य रवींद्र मुंदे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, धारणीचे प्रकल्प अधिकारी षणमुगराजन, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी के.टी. तुमाळकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती जाणून घेतली. नांदगाव खंडेश्वर येथील पाळा व दाभा या गावांमध्ये होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना करताना पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी परीक्षण करावे, असे सांगितले. पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो त्यावर त्वरित उपाय म्हणून जिल्हा नियोजन योजनेच्या प्रस्तावित निधीतून नवीन पाईप जोडणी करावी, असे त्यांनी सांगितले. वीज देयके वेळेत न भरल्यामुळे पंपाने पाणीपुरवठा करण्याबाबतच्या समस्येवर तसेच विहीर अधिग्रहणाबाबतच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी. नवीन विंधन विहिरीचे काम त्वरित पूर्ण करावे आणि अधिग्रहित विहिरींवर सौरपंप लावण्याबाबतचे नियोजन करावे, असेही निर्देश श्री पोटे यांनी दिले.पालकमंत्री म्हणाले, नांदगाव खंडेश्वर येथे आवश्यक त्या ठिकाणी सिंचन विहिरींबाबत प्रस्ताव सादर करावा. चिखलदरा येथे १४ गावे पाणीटंचाईग्रस्त असून तेथे डिसेंबर, मार्च व जून अशा तीन टप्प्यांमध्ये विशेष नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खंडेमल गावाचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून समावेश होऊ शकतो, तर आवागड येथे पाणीपुरवठा योजना सुरू असल्याबाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. मोर्शी तालुक्यातील येरला गावातील पाण्याचा पाईप जोडणी करण्याबाबत, वरूड तालुक्यात विजदेयक न भरल्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत समस्या निर्माण झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत, अचलपूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये प्रामुख्याने समावेश करावा आणि सौरउजेर्चा कृषिपंप उपयोगात आणून पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश त्यांनी दिले. चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथे पाण्याच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी पाच ठिकाणी सिंचन विहिरींची कामे सुरू असल्याची माहिती संबंधित गटविकास अधिकारी यांनी दिली. यावेळी कृत्रिम पाणीटंचाईवरदेखील चर्चा करण्यात आली. धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी या तालुक्यांचा आराखडा सादर करण्यात आला असून प्रथम टप्प्यात पाणीटंचाई नसल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)