शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

गावागावांतील पाण्याची पातळी तपासा

By admin | Updated: March 5, 2017 00:13 IST

उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी.

पालकमंत्री : पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभाअमरावती : उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी. पाणीटंचाई निवारणासाठी संबंधित विभागाने सुनियोजित उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीत दिले.संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जि.प. सदस्य रवींद्र मुंदे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, धारणीचे प्रकल्प अधिकारी षणमुगराजन, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी के.टी. तुमाळकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती जाणून घेतली. नांदगाव खंडेश्वर येथील पाळा व दाभा या गावांमध्ये होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना करताना पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी परीक्षण करावे, असे सांगितले. पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो त्यावर त्वरित उपाय म्हणून जिल्हा नियोजन योजनेच्या प्रस्तावित निधीतून नवीन पाईप जोडणी करावी, असे त्यांनी सांगितले. वीज देयके वेळेत न भरल्यामुळे पंपाने पाणीपुरवठा करण्याबाबतच्या समस्येवर तसेच विहीर अधिग्रहणाबाबतच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी. नवीन विंधन विहिरीचे काम त्वरित पूर्ण करावे आणि अधिग्रहित विहिरींवर सौरपंप लावण्याबाबतचे नियोजन करावे, असेही निर्देश श्री पोटे यांनी दिले.पालकमंत्री म्हणाले, नांदगाव खंडेश्वर येथे आवश्यक त्या ठिकाणी सिंचन विहिरींबाबत प्रस्ताव सादर करावा. चिखलदरा येथे १४ गावे पाणीटंचाईग्रस्त असून तेथे डिसेंबर, मार्च व जून अशा तीन टप्प्यांमध्ये विशेष नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खंडेमल गावाचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून समावेश होऊ शकतो, तर आवागड येथे पाणीपुरवठा योजना सुरू असल्याबाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. मोर्शी तालुक्यातील येरला गावातील पाण्याचा पाईप जोडणी करण्याबाबत, वरूड तालुक्यात विजदेयक न भरल्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत समस्या निर्माण झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत, अचलपूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये प्रामुख्याने समावेश करावा आणि सौरउजेर्चा कृषिपंप उपयोगात आणून पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश त्यांनी दिले. चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथे पाण्याच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी पाच ठिकाणी सिंचन विहिरींची कामे सुरू असल्याची माहिती संबंधित गटविकास अधिकारी यांनी दिली. यावेळी कृत्रिम पाणीटंचाईवरदेखील चर्चा करण्यात आली. धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी या तालुक्यांचा आराखडा सादर करण्यात आला असून प्रथम टप्प्यात पाणीटंचाई नसल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)