शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

भूमिहिनांनाही मिळतोय स्वस्त धान्याचा लाभ

By admin | Updated: March 23, 2016 00:31 IST

शासकीय कार्यालयात कामाची पूर्तता करायची झाल्यास फार मन:स्ताप होतो.

नांदगाव खंडेश्वर तालुका : ११ हजार ४३० कुटुंबांना लाभनांदगाव खंडेश्वर : शासकीय कार्यालयात कामाची पूर्तता करायची झाल्यास फार मन:स्ताप होतो. तेवढ्याच प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यांचा कामकाजातील ढिसाळपणाही कारणीभूत ठरतो. पण जर एखाद्या अधिकाऱ्याने मनावर घेतले तर शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते. याचा प्रत्यय तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातून दिसून येत आहे. येथील पुरवठा निरीक्षक गजानन मेंडेकर यांनी संपूर्ण तालुका पिंजूूूूूून काढत तालुक्यातील १८३० भूमिहिन व ९,६०० केसरी एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे नापिकीने हतबल झालेले शेतकरी कुटुंब व भूमिहिन कुुटंब असे एकूण ११,४३० कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळाला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात कुटुंबाची ओळख म्हणून एपीएल, बीपीएल अंत्योदय अशा कार्डाचा वापर केल्या जातो. परंतु यामध्ये एपीएल केसरी कार्डधारकांना शासकीय योजनांचा लाभ न मिळता फक्त शासकीय कामकाजासाठीच केसरी कार्डाचा उपयोग होत होता. त्यामुळे शासनाचे सन २०१५ आॅगस्टमध्ये शेतकरी कुटुंबासाठी शेतकरी कुटुंब कार्ड असलेल्या भूमिहीन कुटुंबासाठी जानेवारी २०१६ अन्न सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. अनेकदा शासनाने कुठलीही योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शासकीय कामकाजातील दिरंगाईपणामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. परंतु येथील पुरवठा विभागाने मात्र शेतकरी कुटुंबासाठी सुरू झालेल्या शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत अवघ्या सहा महिन्यापूर्वी पुरवठा निरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या गजानन भेंडेकर यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे शासकीय योजनेची अंमलबजावणी करुन शेतकरी कुटुंबांना व भूमिहिन कुटुंबांना लाभ मिळावा, यासाठी नांदगाव तालुक्यातील एपीएल कार्डधारक शेतकरी कुटुंब व भूमिहीन कुटुंब यांचा शोध घे एकूण ११,४३० कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना व शेतकरी कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ मिळवून दिला. असेच कार्य इतरही विभागातील कर्मचाऱ्यांनी करावे जेणेकरून जनसामान्यांची कामे लवकर होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळावा, अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील ११,४३० कुटुंबांना शेतकरी कुटुंब लाभार्थी योजना व अन्न सुरक्षा योजनेचा तत्पर लाभ मिळवून देताना जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात व पुरवठा विभागातील सहकारी यांच्या सहकार्याने शेतकरी कुटुंब व भूमिहीन कुुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ. - गजानन भेंडेकर,तालुका पुरवठा निरीक्षक