शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहिनांनाही मिळतोय स्वस्त धान्याचा लाभ

By admin | Updated: March 23, 2016 00:31 IST

शासकीय कार्यालयात कामाची पूर्तता करायची झाल्यास फार मन:स्ताप होतो.

नांदगाव खंडेश्वर तालुका : ११ हजार ४३० कुटुंबांना लाभनांदगाव खंडेश्वर : शासकीय कार्यालयात कामाची पूर्तता करायची झाल्यास फार मन:स्ताप होतो. तेवढ्याच प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यांचा कामकाजातील ढिसाळपणाही कारणीभूत ठरतो. पण जर एखाद्या अधिकाऱ्याने मनावर घेतले तर शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते. याचा प्रत्यय तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातून दिसून येत आहे. येथील पुरवठा निरीक्षक गजानन मेंडेकर यांनी संपूर्ण तालुका पिंजूूूूूून काढत तालुक्यातील १८३० भूमिहिन व ९,६०० केसरी एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे नापिकीने हतबल झालेले शेतकरी कुटुंब व भूमिहिन कुुटंब असे एकूण ११,४३० कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळाला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात कुटुंबाची ओळख म्हणून एपीएल, बीपीएल अंत्योदय अशा कार्डाचा वापर केल्या जातो. परंतु यामध्ये एपीएल केसरी कार्डधारकांना शासकीय योजनांचा लाभ न मिळता फक्त शासकीय कामकाजासाठीच केसरी कार्डाचा उपयोग होत होता. त्यामुळे शासनाचे सन २०१५ आॅगस्टमध्ये शेतकरी कुटुंबासाठी शेतकरी कुटुंब कार्ड असलेल्या भूमिहीन कुटुंबासाठी जानेवारी २०१६ अन्न सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. अनेकदा शासनाने कुठलीही योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शासकीय कामकाजातील दिरंगाईपणामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. परंतु येथील पुरवठा विभागाने मात्र शेतकरी कुटुंबासाठी सुरू झालेल्या शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत अवघ्या सहा महिन्यापूर्वी पुरवठा निरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या गजानन भेंडेकर यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे शासकीय योजनेची अंमलबजावणी करुन शेतकरी कुटुंबांना व भूमिहिन कुटुंबांना लाभ मिळावा, यासाठी नांदगाव तालुक्यातील एपीएल कार्डधारक शेतकरी कुटुंब व भूमिहीन कुटुंब यांचा शोध घे एकूण ११,४३० कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना व शेतकरी कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ मिळवून दिला. असेच कार्य इतरही विभागातील कर्मचाऱ्यांनी करावे जेणेकरून जनसामान्यांची कामे लवकर होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळावा, अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील ११,४३० कुटुंबांना शेतकरी कुटुंब लाभार्थी योजना व अन्न सुरक्षा योजनेचा तत्पर लाभ मिळवून देताना जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात व पुरवठा विभागातील सहकारी यांच्या सहकार्याने शेतकरी कुटुंब व भूमिहीन कुुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ. - गजानन भेंडेकर,तालुका पुरवठा निरीक्षक