शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नालेसफाईचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:15 IST

पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, नदी-नाल्याचे पाणी वस्त्यात शिरू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा मान्सूनपूर्व तयारीला लागली असली तरी अद्यापपर्यंत ७० ते ७५ टक्केच काम झाल्याने संपूर्ण नालेसफाईचे आव्हान प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के सफाई बाकी : तुंबलेल्या नाल्यांमुळे पाणी वस्त्यांत शिरण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, नदी-नाल्याचे पाणी वस्त्यात शिरू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा मान्सूनपूर्व तयारीला लागली असली तरी अद्यापपर्यंत ७० ते ७५ टक्केच काम झाल्याने संपूर्ण नालेसफाईचे आव्हान प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे. आगामी दिवसांत दमदार पाऊस आल्यास महापालिकेच्या नालेसफाईची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सून सुरू होऊन दोन दिवस उलटले असताना महापालिकेकडून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरुच आहे.मनपाक्षेत्रातील १८ मुख्य व १९ उपनाल्यांसह छोटे नाले व अन्य नालेसफाईसाठी प्रशासनाने ७ जूनची डेडलाईन दिली होती. मोठे नाले व उपनाल्यांची स्वच्छता यंत्रसामग्रीने केली जात असल्याने ती जबाबदारी अतिक्रमण विभागाकडे देण्यात आली तर प्रभागातील तुंबलेल्या नाल्या व अन्य ठिकाणची स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वच्छता विभागाकडे देण्यात आली. मात्र, ९ जूनपर्यंत नालेसफाईचे काम ७५ टक्यांपर्यंतच झाल्याची कबुली स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोठा पाऊ स झाल्यास पावसाचे पाणी वस्त्यांत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालेसफाईची कुर्मगती पाहता प्रशासनाने अधिनिस्थ यंत्रणेला पुन्हा ११ जूनची डेडलाईन देण्यात आली आहे. रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत शहरातील उर्वरित २५ टक्के नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करण्याचे आव्हान अतिक्रमण व स्वच्छता विभागाला पेलायचे आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माहितीनुसार, १८ मोठ्या नाल्यांपैकी १३ व १९ छोट्या नाल्यांपैकी १४ नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. जेसीबी आणि पोकलॅन्ड या यंत्रणेद्वारा ही स्वच्छता करण्यात आल्याचा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहे. मात्र, ते अद्यापही पूर्ण करण्यात महापालिकेला यश आलेले नाही. शहरातील अनेक भागांमधील गटारींची साफसफाई झालेली नाही, तर काही नाल्यांमधील घाण बाजूलाच टाकून दिली जात आहे. अंबादेवी संस्थानलगत वाहणाऱ्या अंबानाल्याची सफाई अद्यापही न झाल्याने यंदाही पावसाचे पाणी तुंबण्याचा योग नाकारता येत नाही. बांधकाम विभागाच्या कृपेने यंदाही पिल्लरला अडकलेला कचरा ‘जैसे थे’ आहे. गतवर्षी पावसाचे पाणी घरात शिरून नमुना भागातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्या बाबीपासून धडा घेऊन अंबानाल्यातील अनावश्यक पिल्लर पाडण्याचे काम महापालिकेला करायचे होते. तसा अहवालही नागपूरच्या व्हीएनआयटीने दिला होता. मात्र, त्या अहवालानुसार कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही अंबादेवीलगतच्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.नाल्यातीलमलमा नाल्यातचमहापालिका क्षेत्रातील ज्या मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यात येऊन नाला साफ करण्याचा दावा करण्यात येत आहे, त्यापैकी अनेक नाल्यातील मलबा काढून तो त्याच नाल्याच्या काठावर टाकण्याचा प्रताप काही कंत्राटदारांनी केला आहे. प्रशांतनगर भागातून जाणारा नाला स्वच्छ करण्यात आला असला तरी त्यातील मलबा नाल्याच्या दुसºया बाजूला टाकण्यात आल्याने तो मलबा एकाच पावसात त्याच नाल्यात पडून पुन्हा नाला ‘चोकअप’ होण्याची भीती आहे. नाल्यातील मलमा नाल्याच्या दुसºया बाजूने टाकणाºया कंत्राटदारांवर महापालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही, हे विशेष.