शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

नालेसफाईचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:15 IST

पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, नदी-नाल्याचे पाणी वस्त्यात शिरू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा मान्सूनपूर्व तयारीला लागली असली तरी अद्यापपर्यंत ७० ते ७५ टक्केच काम झाल्याने संपूर्ण नालेसफाईचे आव्हान प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के सफाई बाकी : तुंबलेल्या नाल्यांमुळे पाणी वस्त्यांत शिरण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, नदी-नाल्याचे पाणी वस्त्यात शिरू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा मान्सूनपूर्व तयारीला लागली असली तरी अद्यापपर्यंत ७० ते ७५ टक्केच काम झाल्याने संपूर्ण नालेसफाईचे आव्हान प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे. आगामी दिवसांत दमदार पाऊस आल्यास महापालिकेच्या नालेसफाईची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सून सुरू होऊन दोन दिवस उलटले असताना महापालिकेकडून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरुच आहे.मनपाक्षेत्रातील १८ मुख्य व १९ उपनाल्यांसह छोटे नाले व अन्य नालेसफाईसाठी प्रशासनाने ७ जूनची डेडलाईन दिली होती. मोठे नाले व उपनाल्यांची स्वच्छता यंत्रसामग्रीने केली जात असल्याने ती जबाबदारी अतिक्रमण विभागाकडे देण्यात आली तर प्रभागातील तुंबलेल्या नाल्या व अन्य ठिकाणची स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वच्छता विभागाकडे देण्यात आली. मात्र, ९ जूनपर्यंत नालेसफाईचे काम ७५ टक्यांपर्यंतच झाल्याची कबुली स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोठा पाऊ स झाल्यास पावसाचे पाणी वस्त्यांत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालेसफाईची कुर्मगती पाहता प्रशासनाने अधिनिस्थ यंत्रणेला पुन्हा ११ जूनची डेडलाईन देण्यात आली आहे. रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत शहरातील उर्वरित २५ टक्के नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करण्याचे आव्हान अतिक्रमण व स्वच्छता विभागाला पेलायचे आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माहितीनुसार, १८ मोठ्या नाल्यांपैकी १३ व १९ छोट्या नाल्यांपैकी १४ नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. जेसीबी आणि पोकलॅन्ड या यंत्रणेद्वारा ही स्वच्छता करण्यात आल्याचा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहे. मात्र, ते अद्यापही पूर्ण करण्यात महापालिकेला यश आलेले नाही. शहरातील अनेक भागांमधील गटारींची साफसफाई झालेली नाही, तर काही नाल्यांमधील घाण बाजूलाच टाकून दिली जात आहे. अंबादेवी संस्थानलगत वाहणाऱ्या अंबानाल्याची सफाई अद्यापही न झाल्याने यंदाही पावसाचे पाणी तुंबण्याचा योग नाकारता येत नाही. बांधकाम विभागाच्या कृपेने यंदाही पिल्लरला अडकलेला कचरा ‘जैसे थे’ आहे. गतवर्षी पावसाचे पाणी घरात शिरून नमुना भागातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्या बाबीपासून धडा घेऊन अंबानाल्यातील अनावश्यक पिल्लर पाडण्याचे काम महापालिकेला करायचे होते. तसा अहवालही नागपूरच्या व्हीएनआयटीने दिला होता. मात्र, त्या अहवालानुसार कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही अंबादेवीलगतच्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.नाल्यातीलमलमा नाल्यातचमहापालिका क्षेत्रातील ज्या मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यात येऊन नाला साफ करण्याचा दावा करण्यात येत आहे, त्यापैकी अनेक नाल्यातील मलबा काढून तो त्याच नाल्याच्या काठावर टाकण्याचा प्रताप काही कंत्राटदारांनी केला आहे. प्रशांतनगर भागातून जाणारा नाला स्वच्छ करण्यात आला असला तरी त्यातील मलबा नाल्याच्या दुसºया बाजूला टाकण्यात आल्याने तो मलबा एकाच पावसात त्याच नाल्यात पडून पुन्हा नाला ‘चोकअप’ होण्याची भीती आहे. नाल्यातील मलमा नाल्याच्या दुसºया बाजूने टाकणाºया कंत्राटदारांवर महापालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही, हे विशेष.