शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

नऊ हजार विद्यार्थ्यांपुढे शिक्षक बनण्याचे आव्हान

By admin | Updated: December 26, 2015 00:25 IST

डीटीएडधारक विद्यार्थ्यांची ससेहोलपट आणि नोकरीसाठी भटकंती होत आहे. पुन्हा एकदा नऊ हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षक होण्याच्या ईर्ष्येने ‘टीईटी’ला सामोरे जाणार आहेत.

१६ जानेवारीला टीईटी : जिल्ह्यात २२ परीक्षा केंद्र सज्जअमरावती : डीटीएडधारक विद्यार्थ्यांची ससेहोलपट आणि नोकरीसाठी भटकंती होत आहे. पुन्हा एकदा नऊ हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षक होण्याच्या ईर्ष्येने ‘टीईटी’ला सामोरे जाणार आहेत. जिल्ह्यातील २२ केंद्रावरून १६ जानेवारीला ९,५३९ विद्यार्थी प्राथमिक शिक्षकपदी नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या टीईटीला (शिक्षक पात्रता परीक्षा) प्रविष्ठ झाले आहेत. टीईटीच्या दोन विषयांच्या पेपरसाठी परीक्षा केंद्राचे नियोजन महसूल विभागाने केले आहे. गतवर्षी टीईटीचा निकाल अवघा दीड ते दोन टक्के लागला असताना टीईटी देणाऱ्यांचा टक्का घटेल, अशी शक्यता असतानाही बेभरवशाच्या प्राथमिक शिक्षक या नोकरीसाठी तब्बल नऊ हजार विद्यार्थी टीईटीतून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार आहेत. चुकीचे नियोजन आणि घसरलेल्या दर्जामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांना उतरती कळा लागली. पटसंख्या घसरल्याने शिक्षकांसह मुख्याध्यापकही अतिरिक्त ठरले. त्यांच्या समायोजनेचा प्रश्न निर्माण झाला. मागील १० वर्षांत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. राज्यात तूर्तास डी.एड. करून बेरोजगारीची झळ सोसणाऱ्यांची संख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. मात्र त्यानंतरही नोकरी मिळेल, जागा निघतील, अशा भाबड्या आशेपोटी राज्यातील हजारो डीटीएडधारक पात्रता परीक्षा असलेल्या टीईटीला सामोरे जात आहेत. राज्यात २२ हजार शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर टीईटी होवून राज्य शासन बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याही विपरित परिस्थितीत १६ जानेवारीला होणाऱ्या टीईटीला जिल्ह्यातून ९,५३९ विद्यार्थी सामोरे जात आहेत. (प्रतिनिधी)