शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
4
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
7
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
9
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
10
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
11
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
12
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
13
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
14
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
15
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
16
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
17
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
18
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
19
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
20
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !

श्रीहव्याप्र मंडळ होते स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र

By admin | Updated: August 14, 2014 23:28 IST

भारताचा स्वातंत्र्य लढा अनेक मार्गांनी लढला गेला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जहाल क्रांतीकारी लढा, लोकमान्य टिळक, आगरकर यांनी लेखणीव्दारे समाजजागृती व महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने

राजेश जवंजाळ - अमरावतीभारताचा स्वातंत्र्य लढा अनेक मार्गांनी लढला गेला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जहाल क्रांतीकारी लढा, लोकमान्य टिळक, आगरकर यांनी लेखणीव्दारे समाजजागृती व महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने नि:शस्त्रपणे असहकारात्मक आंदोलनाने इंग्रज सरकारला हादरुन सोडले होते. त्यावेळी येथील जगप्रसिध्द श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (श्री हव्याप्र मंडळ) या संपूर्ण चळवळीचे केंद्रबिंदू ठरले होते.स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी वीर वामनराव जोशी यांनी इंग्रज सरकारविरुध्द लढा उभारण्यासाठी वऱ्हाड प्रांतात ठिकठिकाणी आखाडे, व्यायामशाळा सुरु करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित केले. याच दरम्यान म्हणजे १९१४ साली स्वातंत्र्य चळवळीने झपाटलेले अनंत कृष्णराव वैद्य व अंबादास कृष्णराव वैद्य या बंधुंनी हनुमान क्लबची स्थापना केली. १९१८ साली हनुमान क्लबचे नामांतर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, असे झाले. त्यावेळी संस्थेच्या प्रवाहात डॉ. शिवाजीराव पटवर्धन सहभागी झाले. १९२० सालापासून भारतीय राजकारणात गांधीयुगाला सुरुवात झाली. देशभर असहकार आंदोलन सुरु झाले. दिशाहीन युवकांना राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात सामिल होण्याचा नवा मार्ग सापडला. यात हव्याप्र मंडळाने हिरारीने सहभाग घेतला होता. त्यावेळी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकण्यात आला व चळवळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शाळा सुरु केली.