शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सावधान, ‘लेप्टोस्पायरोसिस’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:10 IST

मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने अधिनस्थ यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देमुंबईच्या धर्तीवर आवाहन

अमरावती : मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने अधिनस्थ यंत्रणेला निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने लेप्टोस्पायरा’बद्दलची सर्व माहिती, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात मागील पाच वर्षा$ंत लेप्टोमुळे तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका पावसाळ्यात सर्वाधिक असतो. तुंबलेले पाणी, पाण्याची छोटी मोठी तळे किंवा पुराचे पाणी ज्यामध्ये लेप्टोचे जिवाणू आहेत. अशा पाण्याशी संपर्क आल्यास, लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. तसेच प्राण्यांशी संपर्क येणारे व्यक्ती उदा. व्हेटर्नरी व्यवसाय, प्रयोगशाळेत काम करणारे आणि प्राण्यांच्या कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींनादेखील या आजाराचा धोका अधिक संभवतो.उंदीर, वराह, गाई, म्हशी, श्वान यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेची संपर्क आल्यास किंवा जखमा असल्यास लेप्टोस्पायरोसिस हा रोग होतो. सर्वाधिक पाऊस पडल्याने हा आजार होण्याची शक्यता अधिक आहे.रूग्णास फ्ल्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून येतात. जसे ताप, थंडी, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे, डोळे लाल होणे, रक्तस्त्राव, रक्ताच्या उलट्या होणे इत्यादी. बरेच रूग्ण एका आठवड्याच्या कालावधीनंतर ताप कमी होऊन बरे होतात. पण, काही रूग्णांमध्ये ३-४ दिवस बरे वाटल्यावर पुन्हा लक्षणे जाणवू लागतात आणि ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. शरीरातील मुख्य अवयवांना बाधा होते आणि मल्टिसिस्टिम इन्व्हॉल्व्हमेंटमुळे रूग्ण दगाऊ शकतो.प्लेटलेट्समध्ये झपाट्याने कमीताप, स्नायूदुखी, मूत्रपिंड आणि यकृताचे काम बंद पडणे, ही लेप्टोची प्रमुख लक्षणे आहेत. लेप्टो रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊन त्याची प्रकृती गंभीर होते. मुंबईत या आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमिवर अमरावतीकर नागरिकांनी सजग राहावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुचविल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली.असा आहे लेप्टोस्पायरोसिसलेप्टोस्पायरोसिस हा आजार झूनॉटिक (प्राण्यांपासून मनुष्याला होणारा) आजारांच्या श्रेणीमधील आहे. लेप्टोस्पायरा नामक स्पायरोचीट या जातीच्या विषाणूपासून तो पसरतो. प्रथम लेप्टोस्पायराचे जिवाणू सस्तन प्राणी जसे, उंदीर, मांजर, श्वान, गाय, वराह आदींमध्ये संसर्ग करतात आणि या प्राण्यांच्या मुत्रवाटे, हे जिवाणू पाणी अथवा जमिनीत मिसळतात. लेप्टोस्पायरोचे जिवाणू असलेल्या पाण्याशी आणि ओलसर जमिनीशी संपर्क आल्यास मनुष्यास या जिवाणूची लागण होते. त्वचेची अखंडता बाधित झाल्यास, जसे त्वचेला जखम असल्यास, लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश मिळवू शकतात. तसेच डोळे, नाक, तोंड आणि जनेंद्रीयांच्या ओलसर त्वचेतूनदेखील लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश करू शकतात. पायाला जखमा, चिखल्या, खरचटणे, इसब असेल, तर या जखमेतून हे जंतू रक्तात प्रवेश करतात.

टॅग्स :Healthआरोग्य