शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, ‘लेप्टोस्पायरोसिस’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:10 IST

मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने अधिनस्थ यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देमुंबईच्या धर्तीवर आवाहन

अमरावती : मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने अधिनस्थ यंत्रणेला निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने लेप्टोस्पायरा’बद्दलची सर्व माहिती, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात मागील पाच वर्षा$ंत लेप्टोमुळे तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका पावसाळ्यात सर्वाधिक असतो. तुंबलेले पाणी, पाण्याची छोटी मोठी तळे किंवा पुराचे पाणी ज्यामध्ये लेप्टोचे जिवाणू आहेत. अशा पाण्याशी संपर्क आल्यास, लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. तसेच प्राण्यांशी संपर्क येणारे व्यक्ती उदा. व्हेटर्नरी व्यवसाय, प्रयोगशाळेत काम करणारे आणि प्राण्यांच्या कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींनादेखील या आजाराचा धोका अधिक संभवतो.उंदीर, वराह, गाई, म्हशी, श्वान यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेची संपर्क आल्यास किंवा जखमा असल्यास लेप्टोस्पायरोसिस हा रोग होतो. सर्वाधिक पाऊस पडल्याने हा आजार होण्याची शक्यता अधिक आहे.रूग्णास फ्ल्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून येतात. जसे ताप, थंडी, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे, डोळे लाल होणे, रक्तस्त्राव, रक्ताच्या उलट्या होणे इत्यादी. बरेच रूग्ण एका आठवड्याच्या कालावधीनंतर ताप कमी होऊन बरे होतात. पण, काही रूग्णांमध्ये ३-४ दिवस बरे वाटल्यावर पुन्हा लक्षणे जाणवू लागतात आणि ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. शरीरातील मुख्य अवयवांना बाधा होते आणि मल्टिसिस्टिम इन्व्हॉल्व्हमेंटमुळे रूग्ण दगाऊ शकतो.प्लेटलेट्समध्ये झपाट्याने कमीताप, स्नायूदुखी, मूत्रपिंड आणि यकृताचे काम बंद पडणे, ही लेप्टोची प्रमुख लक्षणे आहेत. लेप्टो रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊन त्याची प्रकृती गंभीर होते. मुंबईत या आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमिवर अमरावतीकर नागरिकांनी सजग राहावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुचविल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली.असा आहे लेप्टोस्पायरोसिसलेप्टोस्पायरोसिस हा आजार झूनॉटिक (प्राण्यांपासून मनुष्याला होणारा) आजारांच्या श्रेणीमधील आहे. लेप्टोस्पायरा नामक स्पायरोचीट या जातीच्या विषाणूपासून तो पसरतो. प्रथम लेप्टोस्पायराचे जिवाणू सस्तन प्राणी जसे, उंदीर, मांजर, श्वान, गाय, वराह आदींमध्ये संसर्ग करतात आणि या प्राण्यांच्या मुत्रवाटे, हे जिवाणू पाणी अथवा जमिनीत मिसळतात. लेप्टोस्पायरोचे जिवाणू असलेल्या पाण्याशी आणि ओलसर जमिनीशी संपर्क आल्यास मनुष्यास या जिवाणूची लागण होते. त्वचेची अखंडता बाधित झाल्यास, जसे त्वचेला जखम असल्यास, लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश मिळवू शकतात. तसेच डोळे, नाक, तोंड आणि जनेंद्रीयांच्या ओलसर त्वचेतूनदेखील लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश करू शकतात. पायाला जखमा, चिखल्या, खरचटणे, इसब असेल, तर या जखमेतून हे जंतू रक्तात प्रवेश करतात.

टॅग्स :Healthआरोग्य