शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुरांचा बाजार सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:13 IST

आसेगाव पूर्णा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. ...

आसेगाव पूर्णा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. सोशल मीडियावर आपल्या जनावरांचे फोटो टाकून त्याखाली आपला मोबाइल क्रमांक दिला जातो. ज्या शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी करायची आहे, त्यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावरही आता गुरांची खरेदी-विक्री होताना दिसत आहे.

खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गुरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे बैलांची खरेदी- विक्री बंद झालेली आहे. परिणामी वर्षभरात एक कोटीची होणारी उलाढाल ठप्प झाल्याने बैलांद्वारे केली जाणारी शेती मशागतीची कामे अडचणीत सापडली आहेत. हवामान खात्याने यंदा मान्सून हा जूनच्या १ तारखेला धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आसेगावासह परिसरातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. सद्यस्थितीत शिवारात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. शेतकरी बैलांच्या साह्याने यंदा मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहे. एप्रिल व मे महिन्यांत बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलबाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकरी वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. अशातच बैलांचे भावदेखील प्रचंड वाढले आहेत.

कोट

दोन-तीन वर्षांपासून नापिकी होत असल्यामुळे चाराटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे दूध व्यवसायाची जनावरे विक्री केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही. विक्री व खरेदी करण्याकरिता बैलबाजार पेरणीच्या तोंडावर खुला करण्यात यावा.

- राजेंद्र नवले, शेतकरी, हिवरा पूर्णा

कोट २

दोन-तीन एकर शेती असणाऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे परवडत नाही. त्यामुळे बैलजोडीशिवाय लहान शेतकऱ्यांना पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे बैलबाजार बंद असल्याने बैलजोडी खरेदी-विक्री करण्याकरिता पेच निर्माण होत आहे.

- योगेश कोळस्कर, शेतकरी, आसेगाव पूर्णा