शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेचे आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST

परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांना पदस्थापना देताना शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन केल्या गेलेले नाही. या ...

परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांना पदस्थापना देताना शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन केल्या गेलेले नाही. या कारणावरून प्रधान मुख्य वनसंरक्षक जी साईप्रकाश यांनी ते आदेश रद्द केले आहेत. शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन करून पदोन्नत वनपालांच्या पदस्थापनेचे सुधारित आदेश निर्गमित करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती यांना आपल्या ५ मे च्या आदेशान्वये दिले आहेत.

मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग अमरावती यांनी आपल्या २९ एप्रिलचे कार्यालयीन आदेशान्वये अमरावती विभागातील २२ वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती दिली. या पदोन्नतीनंतर पदोन्नत वनपालांना पदस्थापना दिल्या गेली. पदोन्नती दिल्यानंतर ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना प्रथम पदस्थापना वन्यजीव विभागात देणे आवश्यक ठरते. तसे शासन निर्देशही आहेत. पण मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग अमरावती यांनी या २२ पदोन्नत वनपालांपैकी फक्त ७ वनपालांना वन्यजीव विभागात पदस्थापना दिली. उर्वरित १५ वनपालांना प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागात पदास्थापना दिली आहे. दरम्यान मेळघाटातील वन्यजीव विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत व बदलीस पात्र वनपालांना मेळघाटबाहेर पदस्थापना, बदली दिली गेली नाही. यात संबंधित बदलीस पात्र वनपाल यांच्या बाजूने उपवनसंरक्षकांनी दिलेल्या सकारात्मक शिफारशीसह लोकप्रतिनिधींच्या शिफारशीही त्यांनी दुर्लक्षित केल्या. यात काहींवर अन्याय झाला.

या अन्यायाच्या अनुषंगाने मेळघाटातील वन्यजीव विभागात कार्यरत वनपाल आशिष चक्रवर्ती यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ३ मे रोजी लिखित तक्रार दिली आहे. या तक्रारीत न्याय मागताना, जर माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण व व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी हेच सर्वस्वी जबाबदार राहतील, असे या तक्रारीत चक्रवर्ती यांनी नमूद केले आहे. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिवंगत दीपाली चव्हाण यांचाही उल्लेख या तक्रारीत त्यांनी केला आहे.