शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेचे आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST

परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांना पदस्थापना देताना शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन केल्या गेलेले नाही. या ...

परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांना पदस्थापना देताना शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन केल्या गेलेले नाही. या कारणावरून प्रधान मुख्य वनसंरक्षक जी साईप्रकाश यांनी ते आदेश रद्द केले आहेत. शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन करून पदोन्नत वनपालांच्या पदस्थापनेचे सुधारित आदेश निर्गमित करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती यांना आपल्या ५ मे च्या आदेशान्वये दिले आहेत.

मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग अमरावती यांनी आपल्या २९ एप्रिलचे कार्यालयीन आदेशान्वये अमरावती विभागातील २२ वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती दिली. या पदोन्नतीनंतर पदोन्नत वनपालांना पदस्थापना दिल्या गेली. पदोन्नती दिल्यानंतर ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना प्रथम पदस्थापना वन्यजीव विभागात देणे आवश्यक ठरते. तसे शासन निर्देशही आहेत. पण मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग अमरावती यांनी या २२ पदोन्नत वनपालांपैकी फक्त ७ वनपालांना वन्यजीव विभागात पदस्थापना दिली. उर्वरित १५ वनपालांना प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागात पदास्थापना दिली आहे. दरम्यान मेळघाटातील वन्यजीव विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत व बदलीस पात्र वनपालांना मेळघाटबाहेर पदस्थापना, बदली दिली गेली नाही. यात संबंधित बदलीस पात्र वनपाल यांच्या बाजूने उपवनसंरक्षकांनी दिलेल्या सकारात्मक शिफारशीसह लोकप्रतिनिधींच्या शिफारशीही त्यांनी दुर्लक्षित केल्या. यात काहींवर अन्याय झाला.

या अन्यायाच्या अनुषंगाने मेळघाटातील वन्यजीव विभागात कार्यरत वनपाल आशिष चक्रवर्ती यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ३ मे रोजी लिखित तक्रार दिली आहे. या तक्रारीत न्याय मागताना, जर माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण व व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी हेच सर्वस्वी जबाबदार राहतील, असे या तक्रारीत चक्रवर्ती यांनी नमूद केले आहे. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिवंगत दीपाली चव्हाण यांचाही उल्लेख या तक्रारीत त्यांनी केला आहे.