शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

आष्टी येथील देशी दारू दुकानाचा परवाना रद्द

By admin | Updated: September 19, 2015 00:14 IST

भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत.

महिला जिंकल्या : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत. सदर देशी दारू दुकानाबाबत आष्टी ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. महिलांना होत असलेल्या त्रासामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावण्याची शक्यता निर्माण झाली होती.आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांचे देशी दारू दुकान गावठाणापासून २ कि.मी. अंतरावर हटवावे, अशी विनंती ग्रामसभेने केली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिला मतदारांचे गुप्त मतदान घेण्याचे ठरविले. मात्र जयस्वाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर १० मार्च २०१४ च्या आदेशानुसार हे देशी दारू दुकान २ महिन्यांच्या आत स्थलांतरित करावे, असे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. १० मार्चचा राज्य उत्पादन शुल्काचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. जयस्वाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर फेर आदेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सर्वांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्या दरम्यान १७ जुलै २०१५ ला आष्टी येथील बसस्थानकाजवळ सुरेश डोमाजी जवंजाळ या इसमाला ४८ देशी दारूच्या बाटल्यासह अटक करण्यात आली. दारूचा हा साठा रेवसा येथील अडवाणी वाईन यांच्याकडील असल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय म्हणजे सुरेश जवंजाळ याच्याकडून जप्त केलेला माल आणि जयस्वाल याच्या दुकानातील बॅच क्रमांकाचा साठा जुळून आल्याने जयस्वालनेच तो साठा जवंजाळला विकण्यासाठी दिला असावा, अशा निष्कर्षाप्रत राज्य शुल्क विभाग पोहोचला. याचसंदर्भात जयस्वाल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांच्या देशी दारूचा दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. जिल्हाप्रशासनाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.(वार्ताहर)विद्यार्थी-महिलांना दिलासाआष्टी येथील वादग्रस्त देशी दारुविक्रीच्या दुकानाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्यामुळे विद्यार्थी व महिलांना दिलासा मिळाला आहे. कारण दारुड्यांनी यथेच्च मद्य प्राशन करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालविला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना शिवीगाळ करणे, भांडणे करण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यामुळे या दुकानाविरोधात महिलांनी एल्गार पुकारला होता. दारुविक्री बंद करण्यासाठी महिलांनी कंबर कसली होती.