शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

आष्टी येथील देशी दारू दुकानाचा परवाना रद्द

By admin | Updated: September 19, 2015 00:14 IST

भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत.

महिला जिंकल्या : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत. सदर देशी दारू दुकानाबाबत आष्टी ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. महिलांना होत असलेल्या त्रासामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावण्याची शक्यता निर्माण झाली होती.आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांचे देशी दारू दुकान गावठाणापासून २ कि.मी. अंतरावर हटवावे, अशी विनंती ग्रामसभेने केली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिला मतदारांचे गुप्त मतदान घेण्याचे ठरविले. मात्र जयस्वाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर १० मार्च २०१४ च्या आदेशानुसार हे देशी दारू दुकान २ महिन्यांच्या आत स्थलांतरित करावे, असे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. १० मार्चचा राज्य उत्पादन शुल्काचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. जयस्वाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर फेर आदेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सर्वांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्या दरम्यान १७ जुलै २०१५ ला आष्टी येथील बसस्थानकाजवळ सुरेश डोमाजी जवंजाळ या इसमाला ४८ देशी दारूच्या बाटल्यासह अटक करण्यात आली. दारूचा हा साठा रेवसा येथील अडवाणी वाईन यांच्याकडील असल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय म्हणजे सुरेश जवंजाळ याच्याकडून जप्त केलेला माल आणि जयस्वाल याच्या दुकानातील बॅच क्रमांकाचा साठा जुळून आल्याने जयस्वालनेच तो साठा जवंजाळला विकण्यासाठी दिला असावा, अशा निष्कर्षाप्रत राज्य शुल्क विभाग पोहोचला. याचसंदर्भात जयस्वाल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांच्या देशी दारूचा दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. जिल्हाप्रशासनाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.(वार्ताहर)विद्यार्थी-महिलांना दिलासाआष्टी येथील वादग्रस्त देशी दारुविक्रीच्या दुकानाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्यामुळे विद्यार्थी व महिलांना दिलासा मिळाला आहे. कारण दारुड्यांनी यथेच्च मद्य प्राशन करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालविला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना शिवीगाळ करणे, भांडणे करण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यामुळे या दुकानाविरोधात महिलांनी एल्गार पुकारला होता. दारुविक्री बंद करण्यासाठी महिलांनी कंबर कसली होती.