शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी येथील देशी दारू दुकानाचा परवाना रद्द

By admin | Updated: September 19, 2015 00:14 IST

भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत.

महिला जिंकल्या : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत. सदर देशी दारू दुकानाबाबत आष्टी ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. महिलांना होत असलेल्या त्रासामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावण्याची शक्यता निर्माण झाली होती.आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांचे देशी दारू दुकान गावठाणापासून २ कि.मी. अंतरावर हटवावे, अशी विनंती ग्रामसभेने केली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिला मतदारांचे गुप्त मतदान घेण्याचे ठरविले. मात्र जयस्वाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर १० मार्च २०१४ च्या आदेशानुसार हे देशी दारू दुकान २ महिन्यांच्या आत स्थलांतरित करावे, असे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. १० मार्चचा राज्य उत्पादन शुल्काचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. जयस्वाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर फेर आदेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सर्वांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्या दरम्यान १७ जुलै २०१५ ला आष्टी येथील बसस्थानकाजवळ सुरेश डोमाजी जवंजाळ या इसमाला ४८ देशी दारूच्या बाटल्यासह अटक करण्यात आली. दारूचा हा साठा रेवसा येथील अडवाणी वाईन यांच्याकडील असल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय म्हणजे सुरेश जवंजाळ याच्याकडून जप्त केलेला माल आणि जयस्वाल याच्या दुकानातील बॅच क्रमांकाचा साठा जुळून आल्याने जयस्वालनेच तो साठा जवंजाळला विकण्यासाठी दिला असावा, अशा निष्कर्षाप्रत राज्य शुल्क विभाग पोहोचला. याचसंदर्भात जयस्वाल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांच्या देशी दारूचा दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. जिल्हाप्रशासनाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.(वार्ताहर)विद्यार्थी-महिलांना दिलासाआष्टी येथील वादग्रस्त देशी दारुविक्रीच्या दुकानाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्यामुळे विद्यार्थी व महिलांना दिलासा मिळाला आहे. कारण दारुड्यांनी यथेच्च मद्य प्राशन करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालविला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना शिवीगाळ करणे, भांडणे करण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यामुळे या दुकानाविरोधात महिलांनी एल्गार पुकारला होता. दारुविक्री बंद करण्यासाठी महिलांनी कंबर कसली होती.