शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

गांधींना ‘पाकिस्तानचे पिता’ संबोधणाऱ्या सौमित्र यांची नियुक्ती रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:11 IST

कॅप्शन - पत्रपरिषदेला उपस्थित (डावीकडून) जयसिंहराव देशमुख, अरुण मानकर, बबन नाखले, चंद्रकांत वानखडे, कुमार बोबडे अमरावतीत पत्रपरिषद, जनआंदोलन छेडण्याची ...

कॅप्शन - पत्रपरिषदेला उपस्थित (डावीकडून) जयसिंहराव देशमुख, अरुण मानकर, बबन नाखले, चंद्रकांत वानखडे, कुमार बोबडे

अमरावतीत पत्रपरिषद, जनआंदोलन छेडण्याची भूमिका

अमरावती : महात्मा गांधींना ‘फादर ऑफ पाकिस्तान’ संबोधणारे अनिल कुमार सौमित्र यांची अमरावतीच्या आयआयएमसी (भारतीय जनसंचार संस्था) येथे करण्यात आलेली नियुक्ती रद्द करावी. त्यांच्या रूपातील अविचारीपणा आम्हाला येथे नको, अशी भूमिका गांधीवादी विचारवंत व शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी मांडली. अमरावती येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मध्य प्रदेश भाजपच्या मीडिया सेलचे निलंबित प्रमुख अनिल कुमार सौमित्र यांची आयआयएमसीतील प्राध्यापकपदी नियुक्ती झाल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने ३१ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केला.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला ज्यांचे नाव आहे, त्या गाडगेबाबांनी विचारांची घाण साफ करण्यासाठी आयुष्य वाहिले. त्याच विद्यापीठाच्या आवारातील संस्थेत महात्मा गांधींना ‘फादर ऑफ पाकिस्तान’ म्हणणारी व्यक्ती नियुक्त होते. अशाप्रकारे विद्यापीठाला डम्पिंग यार्ड बनवू नका. पंतप्रधान विदेशात महात्मा गांधींचे गोडवे गातात. आरएसएसनेही महात्मा गांधींना प्रात:स्मरणीय ठरवावे आणि बाहेर विखारी प्रचार करावा, हे अक्षम्य आणि अस्वीकारार्ह आहे. गांधी नाहीत, तर ‘फादर ऑफ इंडिया’ जिना आहेत काय? ‘सौमित्र प्रवृत्ती’ नवे नीतिमूल्य रुजवणार काय? त्यांना नथुराम गोडसेला ‘फादर ऑफ नेशन’ करायचे असेल, तर त्यांनी उघडपणे करावे. या प्रवृत्तीविरुद्ध आमचा लढा आहे. लोकही त्यात सहभागी होतील. पालकमंत्री, कुलगुरूंनी लक्ष घालून सौमित्र यांना दिल्लीला परत पाठवावे, अशी मागणी चंद्रकांत वानखडे यांनी केली.

माध्यमांची अनेक प्रकारे गळचेपी होत आहे. माध्यम संस्थांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्ती पाठवून गिनिपीग तयार केले जात आहेत. शिक्षणक्षेत्रात असे धोकादायक नियोजन केले जात आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत २०१४ सालीच स्वातंत्र्य मिळाले की काय, हे लोकांमध्ये ठसेल, अशी चिंता श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे जनसंवाद विभागाचे प्रमुख कुमार बोबडे यांनी व्यक्त केली.

अनिल कुमार सौमित्र ही एक प्रवृत्ती आहे. ती आयआयएमसी, अमरावतीत प्रवेश घेतलेल्या भावी पत्रकारांचे ब्रेन वॉश करून जाईल. त्यामुळे सौमित्र यांना विद्यापीठात पाय ठेवू देऊ नका, या मागणीचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना देणार असल्याचे माध्यम संवाद तज्ज्ञ आनंद मांजरखेडे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर नागपूरऐवजी अमरावतीला मिळालेली आयआयएमसी ही संस्था अद्याप विद्यापीठाच्या आवारातच आहे. विद्यापीठात कुणीही येईल आणि ते सहन केले जाईल, असे समजू नये. सौमित्र यांची अमरावतीत नियुक्ती झाल्याने पत्रकार परिषद येथे घेतली, असा इशारा मूळचे नागपूरचे आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष बबन नाखले यांनी दिला.

विद्यापीठाच्या कॅम्पसचे कुलगुरू हे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना पत्र देऊ. या विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व मनुष्यबळ विकास मंत्री यांनाही अनिल कुमार सौमित्रच्या विषयात अवगत केले जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी व्यवस्थापन सल्लागार अरुण मानकर व सामाजिक कार्यकर्ते जयसिंगराव देशमुख यांचीही उपस्थिती होती.