शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

अंभोरी तलावाचा कालवा फुटला, पिके वाहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST

मोर्शी : नजीकच्या अंभोरी तलावाचा कालवा फुटून उभ्या पिकात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ...

मोर्शी : नजीकच्या अंभोरी तलावाचा कालवा फुटून उभ्या पिकात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोर्शी तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या धानोरा लगत अंबोरी तलाव असून या तलावातून कालव्याद्वारे नाल्यात पाणी सोडल्या जाते. मुसळधार पावसाने मोर्शी तालुक्यातील अंभोरी तलाव लबालब भरला. परंतु, त्यावरील कालवा फुटल्याने १० शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून कपाशी, तूर, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी पिके सडू लागली. अंभोरी तलावाचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा नसताना हा तलाव डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आला आहे. आता अंभोरी तलावाचा कालवा फुटल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसून पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची पूर्णत: जमीन खरडून निघाली व उभ्या पिकाचे नुकसान झाले. याची तक्रार राजस्व कार्यालयापर्यंत करण्यात आली होती. मात्र, अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. शासन व प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी जयकिशन धुर्वे, मारोती धुर्वे, शालिक धुर्वे, प्रवीण आहाके, रमेश काळे, उमराव झोड, महादेव कुंबरे, भारत रंगारी आदींनी केली आहे.