शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

मतदार यादी पुनरीक्षणासाठी ९ जून ते ३१ जुलैपर्यंत अभियान

By admin | Updated: June 5, 2014 23:42 IST

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ हजारो मतदारांवर आली होती. ही चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने

अमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ हजारो मतदारांवर आली होती. ही चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना पुन्हा संधी दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादी पुनरीक्षण, नवीन मतदार नोंदणीचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. ९ जून ते ३१ जुलै २0१४ पर्यंत हे अभियान सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले.लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत नाव नसल्यामुळे हजारो मतदारांना त्याचा घटनात्मक अधिकार बजावता आला नाही. यामुळे अनेक मतदारसंघात वादावादीचे प्रसंग उद्भवले. मतदारांना नाराज होऊन घरी परतावे लागले. जिल्हाधिकार्‍यांपासून आयोगापर्यंत अनेक तक्रारी झाल्यात. या सार्‍या प्रकाराची गंभीर दखल आयोगाने घेतली. ज्यांची नावे वगळली गेली आहेत. अशा सर्व मतदारांना व नवीन मतदारांना नाव नोंदणी करण्याची पुन्हा संधी देण्यात आली आहे. २१ व २२ जून तसेच २८ व २९ जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड उपस्थित होते.  (प्रतिनिधी)९ जून ते ३१ जुलैपर्यंत अभियानअमरावती जिल्ह्यात ९ जूनपासून विशेष मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात येणार आहे. ते ३१ जुलै २0१४ पर्यंत राहणार आहे. या मोहिमेत पूर्वीच्या यादीमधून ज्यांची नावे वगळली आहेत त्यांना आपली नावे पुन्हा समाविष्ट करता येणार आहे. याशिवाय १ जानेवारी २0१४ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाली आहे त्यालाही नवीन नाव नोंदणी करता येणार आहे.