शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

इतवारा बाजार परिसरात सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे? (असाईनमेंट )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

फोटो पी २० इतवारा बाजार अमरावती : शहरातील मुख्य बाजार असलेल्या इतवारा बाजार परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी अमरावतीकरांसाठी नवी ...

फोटो पी २० इतवारा बाजार

अमरावती : शहरातील मुख्य बाजार असलेल्या इतवारा बाजार परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी अमरावतीकरांसाठी नवी नाही. हा रस्ता पुढे वलगाव, परतवाडा, चांदूर बाजारकडे जात असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते.

चित्रा चौकापासून सुरू होणार्या या बाजारात रविवारी पाय ठेवायलाही जागा नसते. चित्रा चौक ते पुढे चांदणी चौकापर्यंत रूंद रस्ते असले, तरी या भागातील अतिक्रमणाचा पसारा पाहता पायी चालायचे कसे, असा प्रश्न पडतो. चित्रा चौक, इतवारा, टांगा पडाव ती पुढे थेट चांदणीचौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व अन्य गाड्या लागत असल्याने निर्धोक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बॉक्स

रोज हजारो लोकांची येजा

इतवारा बाजारात रोज हजारो लोकांची येजा असते. येथे मुख्यत: भाजी मार्केट असल्याने मध्यमवर्गीयांसह सामान्यांचा येथे राबता असतो. या मार्गावर अलिकडे प्रभात चौक व चित्रा चौकात मोठे मार्केट आहेत. सोबतच भातकुली, अमरावती तालुका लागून असल्याने तेथून शहरात येणार्यांची मोठी लगबग इतवारा बाजार परिसरात असते.

बॉक्स

फुटपाथ कागदावरच

चित्रा चौक ते पुढे चांदणी चौकापर्यंत फुटपाथ बनविल्या गेले आहेत. मात्र, त्यावर फेरीवाले व हातगाड्यावाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या भागात प्रचंड अतिक्रमण झाले आहे. मात्र त्याला महापालिकेचा धरबंध नाही. येथील फुटपाथ कागदावरच आहेत.

बॉक्स

अतिक्रमण हटाव केवळ दाखवायलाच

या भागात महापालिकेद्वारे अनेकदा अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाते. त्याची प्रसिध्दीही देखील केली जाते. मात्र, दुसर्या दिवशी या भागातील अतिक्रमण पुन्हा जैसे थे होते. हा त्या भागातील नेहमीचा शिरस्ता आहे. त्यासाठी महापालिकेच्या सातत्यपुर्ण मोहिमेची गरज आहे.

बॉक्स

पायी चालावे कसे

दर रविवारी इतवारा भागात भाजी घ्यायला जाते. मात्र, वाहनांची संख्या पाहता पायदळ जाण्यास मन धजावत नाही. मात्र, वाहनांची गर्दी इतकी त्यात दुचाकीदेखील निट चालवता येत नाही. या मार्गाने जाताना अपघाताची भीती नेहमीच असते.

वेणू चौधरी, पादचारी

पायी चालायची भीती

टांगापडाव चौकातून वाहने अस्ताव्यस्तपणे दामटली जातात. कोण कुठे चाललाय, कोण कुठे वळतो, ते देखील लक्षात येत नाही. फळांची गाड्या अगदी रस्त्यावर लागत असल्याने पायी चालायचे कसे, हा प्रश्न उपिस्थत होतो. वाहतूक पोलिसांची गस्त हवी.

मनीष रेचे, पादचारी

अधिकारी म्हणतात

इतवारा बाजारासह शहरातील बहुतांश भागात नेहमीच अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाते. अतिक्रिमतांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. महापालिकेकडून होणारी कारवाई निरंतर सुरू आहे.

अजय बन्सेले, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख