शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे कायमच

By admin | Updated: August 11, 2015 00:20 IST

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करण्याच्या सूचना केल्या. ...

लोकमत विशेष

आशेवर विरजण : शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीचांदूरबाजार : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करण्याच्या सूचना केल्या. यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होईल, अशी आशा वर्तविली जात होती. मात्र या सूचनेनंतर १०-१५ दिवसांचा काळ लोटूनही एकही शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी करण्याच्या अनुषंगाने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे शासन दरबारी बोललेले प्रत्यक्षात खरे उतरत नाही. एवढीच प्रतिक्रया आता पालकवर्गात व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांची निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करीत आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता १ ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करणाऱ्या या निर्णयानंतरही तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे दफ्तर भारीच आहेत. हा निर्णय बस्त्यात गुंडाळून ठेवल्यामुळे विद्यार्थी कंबरेला वाक देत अवजड दफ्तर वाहून नेत असल्याचे वास्तव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची दुकानदारी सुरू आहे. केवळ पैसा कमविण्याच्या उद्देशातून अनेक संसथा शिक्षण क्षेत्रात उतरल्या आहेत. या शाळांच्यावतीने विद्यार्थ्यांना ‘मॉडर्न’ बनविण्याकरिता संगणक शिक्षणासह विविध सांस्कृतिक गुण देण्याचाही दावा केला जातो. तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक न करताच विविधांगी शिक्षण देण्यासाठी दफ्तरात अनेक पुस्तके कोंबून केवळ विद्यार्थ्यांच्या पाठीवरील भार वाढविण्याचा चंग या शाळांनी बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिक वजनाचे दफ्तर वाहणाऱ्या मुलांना पाठदुखी, सांधे दुखणे, स्नायू, मणक्यांची झिज, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण वाढणे, डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे शासनाने दफ्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश शाळांना दिले होते. या निर्देशानुसार तालुक्यातील किती शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे दफ्तरांचे वजन कमी झाले हा शोधाचा विषय आहे. तालुक्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दफ्तर वाहण्याची जीवघेणी कसरत सुरू आहे. दफ्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाहून १० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये असा संकेत आहे. अभ्याास मंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त आवश्यकतेपक्षा अधिक शैक्षणिक साहित्य दफ्तरात कोंबले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनापेक्षा दफ्तराचे वजन २० ते ३० टक्क्यांहून अधिक आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक देणे अपेक्षित होते. मात्र अशी कोणतीही कार्यवाही शाळांनी केल्याचे दिसून येत नाही. अंमलबजावणी होईल तेव्हा खरे!विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याबाबत कितीही सूचना दिल्या जात असल्या, योजना आखल्या जात असल्या तरी अद्याप विद्यार्थ्यांना हे ओझे वाहावेच लागत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होईल तेव्हा खरे, असे पालकांना वाटते. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिकाधिक सुटसुटीत व्हावे, असे पालकांचे म्हणणे आहे.