शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडवरील ढाब्यावर तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

फोटो पी २४ रिंगरोड कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली. अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून ...

फोटो पी २४ रिंगरोड

कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली.

अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रिंग रोडवरील एका ढाबा परिसरात २३ जुलै रोजी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद देशमुख (२७, पंजाबराव देशमुख कॉलनी, व्हीएमव्ही रोड) असे मृताचे नाव आहे. तर, या घटनेत समीर देशमुख ((५०, श्रीकृष्णपेठ) व दीपक आठवले (२८, महाजनपुरा) हे जखमी झालेत.

याप्रकरणी २४ जुलै रोजी आरोपी सिध्दांत गुलाबराव वानखडे (२३, पोटे टाऊनशिप) व संकेत गोवर्धन वानखडे (२२, शेगाव, अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समीर देशमुख यांनी याबाबत तक्रार नोंदविली.

तक्रारीनुसार, समीर देशमुख व प्रसाद देशमुख हे कठोरा रिंग रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यास गेले. तेथे ढाब्याच्या आत आधीच दोघे होते. त्यावेळी त्या दोन आरोपींशी प्रसाद देशमुखचा वाद झाला. हा वाद वाढत असताना ढाबा संचालक बिरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, आरोपींनी दाद न देता प्रसादच्या पायावर चायना चाकूने वार केला. वाद सोडविण्यास धजावलेल्या समीर देशमुख यांच्या हातावरदेखील वार करण्यात आला. वेटर दीपक आठवलेदेखील या हल्ल्यात जखमी झाले.

घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दुसरीकडे तिघा जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री लगेचच प्रसाद देशमुखचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लगेचच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. शहरात दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे सुरू ठेवण्याची परवानगी असताना रात्री १० ते ११ वाजेपर्यंत धाबे सुरू राहतात. तेथे भोजनही दिले जाते, ते कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपिस्थत झाला आहे.

बाॅक्स

ठाणेदार मुख्यालयाशी संलग्न

ढाब्याला दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी असताना ढाबा परिसरात जेवणाच्या वादातून खून झाल्याने नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना तडकाफडकी पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. तर, बिट इंचार्ज असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चाैखट यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी ही कारवाई केली. तेथील ठाणेदारपदाचा प्रभार गोरखनाथ गांगुर्डे यांच्याकडे देण्यात आला.

कोट

ढाबा परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तर, ठाणेदारांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. बिट इंचार्ज असलेल्या एएसआयला निलंबित केले.

- आरती सिंह,

पोलीस आयुक्त