शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

रिंगरोडवरील ढाब्यावर तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

फोटो पी २४ रिंगरोड कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली. अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून ...

फोटो पी २४ रिंगरोड

कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली.

अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रिंग रोडवरील एका ढाबा परिसरात २३ जुलै रोजी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद देशमुख (२७, पंजाबराव देशमुख कॉलनी, व्हीएमव्ही रोड) असे मृताचे नाव आहे. तर, या घटनेत समीर देशमुख ((५०, श्रीकृष्णपेठ) व दीपक आठवले (२८, महाजनपुरा) हे जखमी झालेत.

याप्रकरणी २४ जुलै रोजी आरोपी सिध्दांत गुलाबराव वानखडे (२३, पोटे टाऊनशिप) व संकेत गोवर्धन वानखडे (२२, शेगाव, अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समीर देशमुख यांनी याबाबत तक्रार नोंदविली.

तक्रारीनुसार, समीर देशमुख व प्रसाद देशमुख हे कठोरा रिंग रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यास गेले. तेथे ढाब्याच्या आत आधीच दोघे होते. त्यावेळी त्या दोन आरोपींशी प्रसाद देशमुखचा वाद झाला. हा वाद वाढत असताना ढाबा संचालक बिरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, आरोपींनी दाद न देता प्रसादच्या पायावर चायना चाकूने वार केला. वाद सोडविण्यास धजावलेल्या समीर देशमुख यांच्या हातावरदेखील वार करण्यात आला. वेटर दीपक आठवलेदेखील या हल्ल्यात जखमी झाले.

घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दुसरीकडे तिघा जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री लगेचच प्रसाद देशमुखचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लगेचच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. शहरात दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे सुरू ठेवण्याची परवानगी असताना रात्री १० ते ११ वाजेपर्यंत धाबे सुरू राहतात. तेथे भोजनही दिले जाते, ते कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपिस्थत झाला आहे.

बाॅक्स

ठाणेदार मुख्यालयाशी संलग्न

ढाब्याला दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी असताना ढाबा परिसरात जेवणाच्या वादातून खून झाल्याने नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना तडकाफडकी पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. तर, बिट इंचार्ज असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चाैखट यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी ही कारवाई केली. तेथील ठाणेदारपदाचा प्रभार गोरखनाथ गांगुर्डे यांच्याकडे देण्यात आला.

कोट

ढाबा परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तर, ठाणेदारांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. बिट इंचार्ज असलेल्या एएसआयला निलंबित केले.

- आरती सिंह,

पोलीस आयुक्त