शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडवरील ढाब्यावर तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

फोटो पी २४ रिंगरोड कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली. अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून ...

फोटो पी २४ रिंगरोड

कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली.

अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रिंग रोडवरील एका ढाबा परिसरात २३ जुलै रोजी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद देशमुख (२७, पंजाबराव देशमुख कॉलनी, व्हीएमव्ही रोड) असे मृताचे नाव आहे. तर, या घटनेत समीर देशमुख ((५०, श्रीकृष्णपेठ) व दीपक आठवले (२८, महाजनपुरा) हे जखमी झालेत.

याप्रकरणी २४ जुलै रोजी आरोपी सिध्दांत गुलाबराव वानखडे (२३, पोटे टाऊनशिप) व संकेत गोवर्धन वानखडे (२२, शेगाव, अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समीर देशमुख यांनी याबाबत तक्रार नोंदविली.

तक्रारीनुसार, समीर देशमुख व प्रसाद देशमुख हे कठोरा रिंग रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यास गेले. तेथे ढाब्याच्या आत आधीच दोघे होते. त्यावेळी त्या दोन आरोपींशी प्रसाद देशमुखचा वाद झाला. हा वाद वाढत असताना ढाबा संचालक बिरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, आरोपींनी दाद न देता प्रसादच्या पायावर चायना चाकूने वार केला. वाद सोडविण्यास धजावलेल्या समीर देशमुख यांच्या हातावरदेखील वार करण्यात आला. वेटर दीपक आठवलेदेखील या हल्ल्यात जखमी झाले.

घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दुसरीकडे तिघा जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री लगेचच प्रसाद देशमुखचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लगेचच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. शहरात दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे सुरू ठेवण्याची परवानगी असताना रात्री १० ते ११ वाजेपर्यंत धाबे सुरू राहतात. तेथे भोजनही दिले जाते, ते कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपिस्थत झाला आहे.

बाॅक्स

ठाणेदार मुख्यालयाशी संलग्न

ढाब्याला दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी असताना ढाबा परिसरात जेवणाच्या वादातून खून झाल्याने नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना तडकाफडकी पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. तर, बिट इंचार्ज असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चाैखट यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी ही कारवाई केली. तेथील ठाणेदारपदाचा प्रभार गोरखनाथ गांगुर्डे यांच्याकडे देण्यात आला.

कोट

ढाबा परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तर, ठाणेदारांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. बिट इंचार्ज असलेल्या एएसआयला निलंबित केले.

- आरती सिंह,

पोलीस आयुक्त