शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बंधुराया, फोटोतूनच बांधते तुला राखी रे !

By admin | Updated: August 30, 2015 00:01 IST

'साहिल गेला,' यावर अजूनही विश्वासच नसलेल्या त्याच्या चारही बहिणींनी साहिलच्या प्रतिमेसमोर राखी ठेवून त्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला.

गहिवरला गावही : राखी पौर्णिमेला साहिलच्या बहिणींचे फाटले काळीजगणेश देशमुख अमरावती'साहिल गेला,' यावर अजूनही विश्वासच नसलेल्या त्याच्या चारही बहिणींनी साहिलच्या प्रतिमेसमोर राखी ठेवून त्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. सर्वंकष प्रयत्न करूनही आवरू न शकल्याने दाटून आलेला भावनातिरेक व्यक्त झाला नि डायरे परिवार पुन्हा वेदनेच्या सागरात बुडाला. साहिलला सख्खी बहीण नसली तरी त्याच्या चारही चुलत बहिणी त्याच्यासाठी सख्ख्याच होत्या. त्यातील श्रावणी ही सर्वांत लहान. 'केजी'मध्ये शिकणारी. साहिलच्या खूप खूप लाडाची. सप्टेबरच्या चार तारखेला तिचा जन्मदिवस. तिचे वास्तव्य आकोटचे. राखीपौर्णिमेला सर्वच बहिणी एकत्र येणार असल्याने श्रावणीचा जन्मदिवसही त्यानिमित्ताने माहुलीत साजरा करण्याचे साहिलने ठरविले होते. साहिलची ही कल्पना कुटुंबातील सर्वांनी उचलून धरली. श्रावणीवर आनंदाच्या सर्व छटांची बरसात करण्यासाठीची तयारी साहिलने आरंभलीही होती. चिमुकल्या बहिणीचे आभाळाएवढे कौतुक 'साहिल दादा'ला करायचे होते. श्रावणीच्या जन्मदिन उत्सवाला काय काय करणार याचा पाढाच साहिल वाचून दाखवित होता. श्रावणीच्या वडिलांनीही सुट्यांचे नियोजन करून माहुलीत मुक्कामी येण्याचे ठरविले. श्रावणी आली. श्रावणी आली, पण साहिल गेलाअमरावती : चारही बहिणी एकत्र आल्या, राखीपौर्णिमाही आली; पण सर्वांना बोलविणारा साहिलच असा अचानक निघून गेला. रक्षाबंधनाच्या दिवशीचा एकेक मिनिट या चारही बहिणींसाठी एकेका वर्षाप्रमाणे जड होता. धरणी फाटावी तसे साहिलच्या कुटुंबीयांचेही काळीज फाटले आहे. त्या असह््य वेदनांना शमविता येईल, असा मलम या भूतलावर नाहीच मुळी! साहिलला नेणाऱ्या हे विधात्या, तूच आता त्याच्या कुटुंबीयांना विरह सहन करण्याची शक्ती दे, ही प्रार्थनाच केवळ जिल्हावासी करू शकतात.