शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधुपिता

By admin | Updated: January 17, 2015 22:51 IST

दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे.

अमरावती : दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे. आर्थिक व्यवहार मंदावले आहे. दुष्काळच्या झळामध्ये वधुपिता होरपळत आहे. उपवर-वधूचे लग्न लांबणीवर पडत आहे. प्रसंगी नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जात आहे.मागील वर्षीचा हंगाम अतिपावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदा पावसाअभावी खरीप व रबीच्या सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर कमी आलेली आहे. जिल्ह्यातील १९६२ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. खरिपाचा हंगाम दोन महिने उशिरा सरू झाल्याने रबीचा हंगामही माघारला आहे. वातावरणात धुके, कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, कधी अकाली पाऊस जमिनीत नसणारी आर्द्रता, अद्याप फुलोऱ्यावर नसलेला हरभरा, तुरीवर शेंगा पोखणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव, संत्राच्या आंबिया बहराला न ताण बसल्याने कमी आलेली फूट, मृग बहराचे फळ कमी भावाअभावी अद्याप झाडावर यासारख्या अन्य समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीमध्ये पेरणीचा खर्चदेखील निघत नाही. जगाव कसं? मुला-मुलींचे शिक्षण, दररोजचा उदर निर्वाह, उपवर-मुलामुलींचे लग्नकार्य कसे करावे, या विवंचनेत वधुपिता आहे. मंगल कायालये, कॅटरर्स, कपडे दागिन्यांवर खर्च व कार्यक्रमासाठी उधळण करणे आजच्या परिस्थितीत शक्य नाही. यामुळे आठवड्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत झाल्या आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना प्रचलित निकषाप्रमाणे मदत दिली जात आहे. तीही तुटपुंजी आहे. मागणीच्या ४० टक्के दुष्काळी निधी वितरित होणार आहे. ग्रामीण भागाचे अर्थचक्र हे शेतीपिकाच्या उत्पन्नावर आधारित असते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४० टक्केही उत्पन्न नाही. शेतमालास आधारभूत किमतीएवढीही भाव मिळत नाही. सोयाबीन, कापसाचे भाव कमी झाले आहे. व्यापारी बेभाव खरेदी करत सर्वत्र शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने दुष्काळाच्या झळामध्ये आज शेतकरी होरपळला जात आहे. (प्रतिनिधी)