शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधुपिता

By admin | Updated: January 17, 2015 22:51 IST

दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे.

अमरावती : दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे. आर्थिक व्यवहार मंदावले आहे. दुष्काळच्या झळामध्ये वधुपिता होरपळत आहे. उपवर-वधूचे लग्न लांबणीवर पडत आहे. प्रसंगी नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जात आहे.मागील वर्षीचा हंगाम अतिपावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदा पावसाअभावी खरीप व रबीच्या सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर कमी आलेली आहे. जिल्ह्यातील १९६२ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. खरिपाचा हंगाम दोन महिने उशिरा सरू झाल्याने रबीचा हंगामही माघारला आहे. वातावरणात धुके, कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, कधी अकाली पाऊस जमिनीत नसणारी आर्द्रता, अद्याप फुलोऱ्यावर नसलेला हरभरा, तुरीवर शेंगा पोखणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव, संत्राच्या आंबिया बहराला न ताण बसल्याने कमी आलेली फूट, मृग बहराचे फळ कमी भावाअभावी अद्याप झाडावर यासारख्या अन्य समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीमध्ये पेरणीचा खर्चदेखील निघत नाही. जगाव कसं? मुला-मुलींचे शिक्षण, दररोजचा उदर निर्वाह, उपवर-मुलामुलींचे लग्नकार्य कसे करावे, या विवंचनेत वधुपिता आहे. मंगल कायालये, कॅटरर्स, कपडे दागिन्यांवर खर्च व कार्यक्रमासाठी उधळण करणे आजच्या परिस्थितीत शक्य नाही. यामुळे आठवड्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत झाल्या आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना प्रचलित निकषाप्रमाणे मदत दिली जात आहे. तीही तुटपुंजी आहे. मागणीच्या ४० टक्के दुष्काळी निधी वितरित होणार आहे. ग्रामीण भागाचे अर्थचक्र हे शेतीपिकाच्या उत्पन्नावर आधारित असते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४० टक्केही उत्पन्न नाही. शेतमालास आधारभूत किमतीएवढीही भाव मिळत नाही. सोयाबीन, कापसाचे भाव कमी झाले आहे. व्यापारी बेभाव खरेदी करत सर्वत्र शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने दुष्काळाच्या झळामध्ये आज शेतकरी होरपळला जात आहे. (प्रतिनिधी)