शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधुपिता

By admin | Updated: January 17, 2015 22:51 IST

दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे.

अमरावती : दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे. आर्थिक व्यवहार मंदावले आहे. दुष्काळच्या झळामध्ये वधुपिता होरपळत आहे. उपवर-वधूचे लग्न लांबणीवर पडत आहे. प्रसंगी नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जात आहे.मागील वर्षीचा हंगाम अतिपावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदा पावसाअभावी खरीप व रबीच्या सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर कमी आलेली आहे. जिल्ह्यातील १९६२ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. खरिपाचा हंगाम दोन महिने उशिरा सरू झाल्याने रबीचा हंगामही माघारला आहे. वातावरणात धुके, कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, कधी अकाली पाऊस जमिनीत नसणारी आर्द्रता, अद्याप फुलोऱ्यावर नसलेला हरभरा, तुरीवर शेंगा पोखणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव, संत्राच्या आंबिया बहराला न ताण बसल्याने कमी आलेली फूट, मृग बहराचे फळ कमी भावाअभावी अद्याप झाडावर यासारख्या अन्य समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीमध्ये पेरणीचा खर्चदेखील निघत नाही. जगाव कसं? मुला-मुलींचे शिक्षण, दररोजचा उदर निर्वाह, उपवर-मुलामुलींचे लग्नकार्य कसे करावे, या विवंचनेत वधुपिता आहे. मंगल कायालये, कॅटरर्स, कपडे दागिन्यांवर खर्च व कार्यक्रमासाठी उधळण करणे आजच्या परिस्थितीत शक्य नाही. यामुळे आठवड्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत झाल्या आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना प्रचलित निकषाप्रमाणे मदत दिली जात आहे. तीही तुटपुंजी आहे. मागणीच्या ४० टक्के दुष्काळी निधी वितरित होणार आहे. ग्रामीण भागाचे अर्थचक्र हे शेतीपिकाच्या उत्पन्नावर आधारित असते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४० टक्केही उत्पन्न नाही. शेतमालास आधारभूत किमतीएवढीही भाव मिळत नाही. सोयाबीन, कापसाचे भाव कमी झाले आहे. व्यापारी बेभाव खरेदी करत सर्वत्र शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने दुष्काळाच्या झळामध्ये आज शेतकरी होरपळला जात आहे. (प्रतिनिधी)