शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

वनपालांच्या बदल्यांमध्ये वशिलेबाजीला ब्रेक

By admin | Updated: May 27, 2014 00:22 IST

वनपालांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि वशिलेबाजीला यंदा ब्रेक लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या बदल्यांमध्ये थेट लक्ष घालून पारदर्शकता आणली आहे.

अमरावती : वनपालांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि वशिलेबाजीला यंदा ब्रेक लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या बदल्यांमध्ये थेट लक्ष घालून पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे बाबूगिरीला तर फाटा बसलाच याउलट वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या आर्थिक देवाणघेवाणीलादेखील लगाम लावण्यात आला आहे.

मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी २२ मे रोजी अमरावती वन वृत्तातील २१ वनपालांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये सरळसेवा वनपाल, पदोन्नत वनपाल या दोघानांही समसमान न्याय देत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना आणि वनविभाग या चारही शाखांमध्ये ज्या वनपालांचे नियतकालावधी झाला त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. तत्पूर्वी मुख्य वनसंरक्षकांनी २0 वनरक्षकांना वनपालपदी बढतीचे आदेश दिले आहेत. वन विभागात बदली व पदोन्नती म्हटले की बाबूगिरीला सुगीचे दिवस येतात. परंतु यंदा सीसीएफ तिवारी यांनी प्रक्रिया पारदर्शपणे राबवून वनपालांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. स्वत:च्या निगराणीत बदल्यांची प्रक्रिया पार पडल्याने यात हस्तक्षेप करून चिरीमिरी करण्याचे स्वप्न बघणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. वनपरिक्षेत्र अधिकारी बदल्यांमध्ये हस्तक्षेप करून मर्जीतील वनरक्षक, वनपालांना वनपरिक्षेत्रात घेण्यासाठी अर्थकारणाचा वापर करतात. ही बाब सीसीएफच्या निदर्शनात आली. बदल्यांमध्ये होत असलेल्या अर्थकारणाला पूर्णविराम मिळावा यासाठी सीसीएफ तिवारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारीच काय तर उपवनसंरक्षकांचाही हस्तक्षेप खपवून घेतला नाही, हे वास्तव दर्शविले. रिक्त असलेल्या वनपालांच्या जागा पदोन्नतीच्या मार्गाने भरण्यात आल्याने कर्मचार्‍यांमध्ये सीसीएफच्या या कार्यप्रणालीवर आनंद पाहावयास मिळत आहे.