शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणीगणनेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST

अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंग़ल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना ...

अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंग़ल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना संसर्गामुळे दोन वर्षापासून प्रत्यक्ष प्राणीगणना होत नाही. त्यामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांची संख्या किती? हे निश्चित करणे कठीण झाले आहे.

वन विभाग अथवा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांची ऑनलाईन नोंदणी मागविली जाते. पंरतु, गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले आणि मे महिन्यात होणारी प्राणीगणना बंदच आहे. यंदाही बुद्ध पौर्णिमेला हीच स्थिती होती. वन विभागाने प्राणी गणना होणार नाही, असे अगोदर स्पष्ट केले आहे. प्राणी गणना ही कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर करण्यात येते. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना प्राणीगणना करता यावी, यासाठी पाणवठे परिसरात मचाणी उभारल्या जातात. सायंकाळी ४ ते सकाळी १० वाजता दरम्यान ही प्रत्यक्ष प्राणीगणा केली जाते. चंद्राच्या प्रकाशात पाणवठ्यावर नेमके कोणत्या प्रकारातील पक्षी, प्राणी आढळून आले, याची माहिती प्रगणेतून नोंदविली जाते. मात्र, दोन वर्षापासून जंगल, व्याघ्र प्रकल्पात कोरोना संसर्गामुळे पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना एन्ट्री नाही. त्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष वन्यजीवांचे दर्शन कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.

-------------------

प्राणी, पक्षी प्रगणनासाठी विशिष्ट फार्म

बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात प्राणीगणना करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फार्म उपलब्ध करुन दिला जातो. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना पाणवठ्यावर प्रगणना करताना कोणत्या प्रकारचा प्राणी, पक्षी दिसून

आला याबाबतची नाेंद चित्रासमाेर करावी लागते. पक्षी, प्राण्यांची ओळख करुन तो कोणत्या प्रजाती, प्रकारातील आहे, याचे अवलोकन केले जाते. जंगल अथवा व्याघ्र प्रकल्पात वन बीटनिहाय ही प्रगणना होते. पुढे वन परिक्षेत्र, विभाग नंतर राज्यस्तरावर माहिती गोळा करुन वन्यप्राणी, पशूल पक्षांची आकडेवारी निश्चित केली जाते. मात्र, दोन वर्षात प्रगणना झाली नसल्याने वन्यजीवांची संख्या नेमकी किती, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

-----------

कोरोना संसर्गामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रवेश मनाई आहे. त्यामुळे यंदा जंगलात बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना झाली नाही. वरिष्ठाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. वडाळी, पोहरा जंगलासाठी हीच नियमावली आहे.

- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी