शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणीगणनेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST

अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंग़ल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना ...

अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंग़ल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना संसर्गामुळे दोन वर्षापासून प्रत्यक्ष प्राणीगणना होत नाही. त्यामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांची संख्या किती? हे निश्चित करणे कठीण झाले आहे.

वन विभाग अथवा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांची ऑनलाईन नोंदणी मागविली जाते. पंरतु, गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले आणि मे महिन्यात होणारी प्राणीगणना बंदच आहे. यंदाही बुद्ध पौर्णिमेला हीच स्थिती होती. वन विभागाने प्राणी गणना होणार नाही, असे अगोदर स्पष्ट केले आहे. प्राणी गणना ही कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर करण्यात येते. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना प्राणीगणना करता यावी, यासाठी पाणवठे परिसरात मचाणी उभारल्या जातात. सायंकाळी ४ ते सकाळी १० वाजता दरम्यान ही प्रत्यक्ष प्राणीगणा केली जाते. चंद्राच्या प्रकाशात पाणवठ्यावर नेमके कोणत्या प्रकारातील पक्षी, प्राणी आढळून आले, याची माहिती प्रगणेतून नोंदविली जाते. मात्र, दोन वर्षापासून जंगल, व्याघ्र प्रकल्पात कोरोना संसर्गामुळे पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना एन्ट्री नाही. त्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष वन्यजीवांचे दर्शन कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.

-------------------

प्राणी, पक्षी प्रगणनासाठी विशिष्ट फार्म

बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात प्राणीगणना करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फार्म उपलब्ध करुन दिला जातो. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना पाणवठ्यावर प्रगणना करताना कोणत्या प्रकारचा प्राणी, पक्षी दिसून

आला याबाबतची नाेंद चित्रासमाेर करावी लागते. पक्षी, प्राण्यांची ओळख करुन तो कोणत्या प्रजाती, प्रकारातील आहे, याचे अवलोकन केले जाते. जंगल अथवा व्याघ्र प्रकल्पात वन बीटनिहाय ही प्रगणना होते. पुढे वन परिक्षेत्र, विभाग नंतर राज्यस्तरावर माहिती गोळा करुन वन्यप्राणी, पशूल पक्षांची आकडेवारी निश्चित केली जाते. मात्र, दोन वर्षात प्रगणना झाली नसल्याने वन्यजीवांची संख्या नेमकी किती, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

-----------

कोरोना संसर्गामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रवेश मनाई आहे. त्यामुळे यंदा जंगलात बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना झाली नाही. वरिष्ठाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. वडाळी, पोहरा जंगलासाठी हीच नियमावली आहे.

- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी