शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

कोट्यवधीच्या सिंचन कामांना ‘ब्रेक’

By admin | Updated: May 27, 2014 23:20 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या जिल्हय़ातील सिंचन तलाव, पाझर तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे कोलमडून पडली आहेत. आचारसंहितेचा बाहू करीत मंजूर

आचारसंहितेचा बडगा : जिल्हा परिषदेतील यंत्रणा हतबल

जितेंद्र दखने - अमरावती

जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या जिल्हय़ातील सिंचन तलाव, पाझर तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे कोलमडून पडली आहेत. आचारसंहितेचा बाहू करीत मंजूर करण्यात आलेल्या ५0 हून अधिक कामांपैकी केवळ १५ कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने सुमारे १२ करोड रूपयांची सिंचनाची कामे रखडली आहेत.

तलावातील गाळ काढण्यापासून ते प्रकल्पाच्या देखभालीच्या कामांनाही ठेंगा दाखविण्यात आला आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण बंधारे, ब्रिटीशकालीन बंधारे, कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे करण्यात येतात.

आर्थिक चालू वर्षात जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या ५0 हून अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणूक आणि आता विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊ घातल्याने आचारसंहितेचा फटका या सिंचनाच्या कामांना बसला आहे. आचारसंहितेचा बाहू करीत प्रशासकीय यंत्रणेने सिंचनाची ही कामे सुरू करण्यास पुढाकार न घेतल्याने सुमारे १0 कोटींहून अधिक किमतीची कामे अद्याप सुरू होऊ शकली नाहीत. याशिवाय सिंचन तलावाच्या स्वच्छतेविषयक कामांनाही याचा फटका बसला आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात १0 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती सिंचनाखाली आली आहे. यंदा मंजूर ५0 पेक्षा जास्त सिंचन तलाव व बंधार्‍यांच्या माध्यमातून ५ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र वरील प्रमाणे उद्दिष्टपूर्ती होणे सध्या तरी अशक्य आहे.

या कामासाठी ४ कोटी ७५ लाख रूपयांचा निधी देखील मंजूर केला होता. बहुतांश कोल्हापुरी बंधारे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सिंचन तलावांच्या देखभाली पासून ते कोल्हापुरी बंधार्‍यांच्या दुरूस्तीपर्यंत विविध कामे लघु पाटबंधारे विभागामार्फत केली जातात. मात्र यावर्षी या कामाचा श्रीगणेशाच झाला नाही.

तलावांमधील गाळ काढणे महत्त्वाचे काम आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे अन्यथा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने जलसाठा या तलावामध्ये साठवू शकत नाही. याचा फटका सिंचनावर आणि तलावांच्या कार्यक्षमतेवर होतो. आचारसंहितेचा बागुलबुवा करीत ही कामे अडगळीत अद्यापही पडून आहेत. त्यामुळे या कामाची मुहूर्तमेढ केव्हा निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे विदर्भात सिंचनाचा अनुशेष मोठय़ा प्रमाणात असताना अनुशेष भरुन काढण्यासाठी शासन ते प्रशासनापर्यंतचे सर्वच जण नेहमीच गाजावाजा करीत असतात. परंतु दुसरीकडे सिंचन प्रकल्प मंजुर असताना ही कामे वेळीच मार्गी लावण्यात येत नाहीत. (प्रतिनिधी)