शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

बीपीएल लाभार्थींची साखर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:30 IST

शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी.....

ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना फटका : अंत्योदयवर एक किलो साखर

जितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी जिल्ह्यात जुलै महिन्यापासूनच साखर मिळणे बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ८०६ इतक्या जुन्या बीपीएल कार्डधारकांना रेशनमधून मिळणारी साखर बंद झाली आहे. आता फक्त १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांनाच प्रतिकुटूंब एक किलो साखर दिली जात आहे. हे प्रमाण पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम होते.शासकीय धोरणानुसार मे महिन्यापर्यंत बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर १३ रूपये ५० पैशांना मिळत होती तर सणासुदीला हे प्रमाण ६६० ग्रॅम इतके होते. परंतु केंद्र सरकारने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान देण्याचे कळविले होते. त्यानुसार मे २०१७ मध्ये राज्य शासनाने आदेश काढून सर्व जिल्ह्यांना या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे बजावले. जून महिन्यात बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलो इतकी साखर २० रूपये दराने विक्री करण्यात आली.परंतु जुलैपासून शासनाने बीपीएलधारकांना साखरविक्री बंद करून अंत्योदय कार्डधारकांनाच साखरेची विक्री सुरू केली आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलोप्रमाणे साखर रेशनवर दिली जात आहे. शुक्रवार १५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅमप्रमाणे दिली जाणारी साखर आता प्रतिकुटुंब एक किलोनुसार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अर्ध्याहून अधिक प्रमाण घटलेप्रत्येक कुटुंबात सरासरी चार माणसे गृहित धरल्यास पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे दोन किलो साखर अंत्योदय कार्डधारकांना मिळत होती परंतु शासनाने साखरेचे प्रमाण कमी केल्याने कुटुंबाला एक किलोच साखर मिळत आहे. एका कुटुंबात सहा सदस्य असले तरी त्यांना एक किलो साखरेवरच समाधान मानावे लागत आहे.जूनमध्ये बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती एक किलोप्रमाणे साखरेचे वितरण करण्यात आले. जुलैपासून केवळ अंत्योदय कार्डधारकांना एक किलो याप्रमाणे साखरेचे वाटप केले जात आहे.- अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी