शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बीपीएल लाभार्थींची साखर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:30 IST

शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी.....

ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना फटका : अंत्योदयवर एक किलो साखर

जितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी जिल्ह्यात जुलै महिन्यापासूनच साखर मिळणे बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ८०६ इतक्या जुन्या बीपीएल कार्डधारकांना रेशनमधून मिळणारी साखर बंद झाली आहे. आता फक्त १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांनाच प्रतिकुटूंब एक किलो साखर दिली जात आहे. हे प्रमाण पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम होते.शासकीय धोरणानुसार मे महिन्यापर्यंत बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर १३ रूपये ५० पैशांना मिळत होती तर सणासुदीला हे प्रमाण ६६० ग्रॅम इतके होते. परंतु केंद्र सरकारने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान देण्याचे कळविले होते. त्यानुसार मे २०१७ मध्ये राज्य शासनाने आदेश काढून सर्व जिल्ह्यांना या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे बजावले. जून महिन्यात बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलो इतकी साखर २० रूपये दराने विक्री करण्यात आली.परंतु जुलैपासून शासनाने बीपीएलधारकांना साखरविक्री बंद करून अंत्योदय कार्डधारकांनाच साखरेची विक्री सुरू केली आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलोप्रमाणे साखर रेशनवर दिली जात आहे. शुक्रवार १५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅमप्रमाणे दिली जाणारी साखर आता प्रतिकुटुंब एक किलोनुसार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अर्ध्याहून अधिक प्रमाण घटलेप्रत्येक कुटुंबात सरासरी चार माणसे गृहित धरल्यास पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे दोन किलो साखर अंत्योदय कार्डधारकांना मिळत होती परंतु शासनाने साखरेचे प्रमाण कमी केल्याने कुटुंबाला एक किलोच साखर मिळत आहे. एका कुटुंबात सहा सदस्य असले तरी त्यांना एक किलो साखरेवरच समाधान मानावे लागत आहे.जूनमध्ये बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती एक किलोप्रमाणे साखरेचे वितरण करण्यात आले. जुलैपासून केवळ अंत्योदय कार्डधारकांना एक किलो याप्रमाणे साखरेचे वाटप केले जात आहे.- अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी