शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
3
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
4
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
5
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
6
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
7
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
8
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
9
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
10
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
11
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
12
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
13
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
14
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
15
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
16
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
17
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
18
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
19
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
20
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल लाभार्थींची साखर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:30 IST

शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी.....

ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना फटका : अंत्योदयवर एक किलो साखर

जितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी जिल्ह्यात जुलै महिन्यापासूनच साखर मिळणे बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ८०६ इतक्या जुन्या बीपीएल कार्डधारकांना रेशनमधून मिळणारी साखर बंद झाली आहे. आता फक्त १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांनाच प्रतिकुटूंब एक किलो साखर दिली जात आहे. हे प्रमाण पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम होते.शासकीय धोरणानुसार मे महिन्यापर्यंत बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर १३ रूपये ५० पैशांना मिळत होती तर सणासुदीला हे प्रमाण ६६० ग्रॅम इतके होते. परंतु केंद्र सरकारने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान देण्याचे कळविले होते. त्यानुसार मे २०१७ मध्ये राज्य शासनाने आदेश काढून सर्व जिल्ह्यांना या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे बजावले. जून महिन्यात बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलो इतकी साखर २० रूपये दराने विक्री करण्यात आली.परंतु जुलैपासून शासनाने बीपीएलधारकांना साखरविक्री बंद करून अंत्योदय कार्डधारकांनाच साखरेची विक्री सुरू केली आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलोप्रमाणे साखर रेशनवर दिली जात आहे. शुक्रवार १५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅमप्रमाणे दिली जाणारी साखर आता प्रतिकुटुंब एक किलोनुसार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अर्ध्याहून अधिक प्रमाण घटलेप्रत्येक कुटुंबात सरासरी चार माणसे गृहित धरल्यास पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे दोन किलो साखर अंत्योदय कार्डधारकांना मिळत होती परंतु शासनाने साखरेचे प्रमाण कमी केल्याने कुटुंबाला एक किलोच साखर मिळत आहे. एका कुटुंबात सहा सदस्य असले तरी त्यांना एक किलो साखरेवरच समाधान मानावे लागत आहे.जूनमध्ये बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती एक किलोप्रमाणे साखरेचे वितरण करण्यात आले. जुलैपासून केवळ अंत्योदय कार्डधारकांना एक किलो याप्रमाणे साखरेचे वाटप केले जात आहे.- अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी