शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराजांचे न ऐकल्याने काशिनाथचा झाला खून’

By admin | Updated: October 19, 2016 00:11 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांचे न ऐकल्यास किती भयंकर दुष्परिणाम होतात,...

सत्यशोधन अहवाल : सद्गुरू महात्म्य पुस्तकातील भयंकर अनुभवअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांचे न ऐकल्यास किती भयंकर दुष्परिणाम होतात, याची नाना वर्णने ज्या सद्गुरू महात्म्य या पुस्तकात कथन करण्यात आली आहेत, त्याच पुस्तकात महाराजांचे न ऐकल्याने काशिनाथ टांगळेचा खून करण्यात आल्याचा अनुभव नमूद करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धामणगावच्या एन.आर.इंदलकर यांच्या न्यायालयात सादर केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालात या भयंकर मुद्याचा समावेश आहे. शंकर महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त आहेत. त्याआधारे ते चमत्कार करतात. त्यांचे न ऐकल्यास जीवासही मुकावे लागते, अशी दहशत पुस्तकाद्वारे नियोजितपणे पसरविण्यात आली असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. अहवालात चमत्कारांविषयी नमूद करण्यात आलेले एक उदाहरण असे- पान क्रमांक ६३ वर पांडुरंग हलमारे लिहितात, ''एखाद्याने श्री महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही, त्यांच्या आज्ञेची अवहेलना केली तर त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात याची माझ्या देखत घडलेली घटना आपणास सांगतो.'' पांडुरंग हलमारे यांचा सुतारकाम करणारा सहकारी काशिनाथ टांगळे आश्रमाच्या पूर्व कोपऱ्यात बैलबंडी, वखर इत्यादीचे जू बनवायचा. त्याने बाभळीचे लाकूड एका मातंग गृहस्थाकडून घेतले. काशिनाथने पैसेही दिले; पण हा मातंग गृहस्थ काही दिवसांनी मरण पावला. त्याच्या मुलाने काशिनाथ टांगळेसोबत पैशावरून भांडण उकरून काढले. यानंतर आठ दिवसांनी महाराजाचा अमरावतीला कार्यक्रम होता. या दौऱ्यात महाराजाने काशिनाथ टांगळेला सोबत दौऱ्यावर अमरावतीला चालण्यास सांगितले. पण तो तयार झाला नाही. मला खूप कामे आहेत, असे तो म्हणाला. महाराजाने एकदोनदा चालण्याचा आग्रह केला. म्हणाले, काम होत राहील. मात्र तुम्ही अमरावतीला आले पाहिजे. टांगळेचा स्वभाव हट्टी होता. त्याने साफ नकार दिला. भक्त मंडळी व महाराज अमरावतीला निघून गेले. जेथे महाराजांची व्यवस्था करण्यात आली होती त्या खोलीचे दार महाराजांनी बंद केले. नंतर काही वेळाने महाराज बाहेर येऊन म्हणाले, आपल्या आश्रमाच्या परिसरात एक दुर्घटना घडली आहे. एक जीव गेला आहे. आम्ही भक्त विचारात पडलो. संध्याकाळी पिंपळखुट्याला आल्यावर कळले की, काशिनाथ टांगळेसोबत मातंग मुलाने भांडण केले. ते विकोपाला गेले आणि त्या मुलाने काशिनाथ टांगळेचा खून केला. पुढे पांडुरंग हलमारे लिहितात, टांगळेने जर महाराजांचे ऐकले असते तर त्याचा जीव वाचला असता. अरविंद देशमुख यांनी लिहिलेल्या 'श्री सद्गुरू महात्म्य' पुस्तकाचे प्रकाशक शिरीष चौधरी असून सर्व हक्क श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट यांच्या स्वाधीन आहेत. शंकर महाराजांनी पुस्तक लिहिण्यास आशीर्वाद दिला आहे, असे स्पष्ट करताना दशहत पसरविण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे मत सत्यशोधन अहवालात समितीने नोंदविले आहे.