शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

मोर्शी तालुक्यात स्फोट; एकाच दिवशी ६५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST

पान २ चे लिड मोर्शी : तालुक्यात कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक झाला असून, शुक्रवारी पुन्हा तालुक्यात ६५ ...

पान २ चे लिड

मोर्शी : तालुक्यात कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक झाला असून, शुक्रवारी पुन्हा तालुक्यात ६५ नवे कोरोनाग्रस्त आढळले. पैकी मोर्शी शहरात जवळपास २० रुग्णांची नोंद आहे. सिंभोरा रोडवरील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात पंजाबराव कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, अजमिरे ले-आऊट येथील २७ वर्षीय पुरुष, ज्ञानदीप कॉलनी येथील ६२ वर्षीय पुरुष, पुनर्वसन कॉलनी येथील ३० वर्षीय पुरुष, रुक्मिणीनगर येथील ५३ वर्षीय महिला, प्रभात चौक मोर्शी येथील ३० वर्षीय पुरुष, सुलतानपुरा येथील ६० वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, पोलीस स्टेशन येथील ३० वर्षीय महिला, अप्पर वर्धा कॉलनी येथील २६ वर्षीय पुरुष, जयस्तंभ चौक येथील ६० वर्षीय पुरुष, विवेकानंद कॉलनी येथील २० वर्षीय पुरुष, दीप कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुष, रामनगर येथील ६१ वर्षे पुरुष, रामकृष्ण कॉलनी येथील ४४ वर्षीय पुरुष, माळीपुरा येथील ४० वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील खोपडा येथील सहा पुरुष, दोन महिला, हिवरखेड येथील ६० वर्षीय पुरुष, पाळा येथील ७५ वर्षीय महिला, २३ वर्षीय पुरुष, मायवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, तरोडा येथील तीन पुरुष, एक महिला, दापोरी येथील ६६ वर्षीय पुरुष, चिखलसावंगी येथील १७ वर्षीय पुरुष, पार्डी येथील २३ वर्षीय पुरुष, निंबी येथील २२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळले. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले असून, नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. शासन व प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन त्वरित उपाययोजना अमलात आणाव्या, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी केली आहे.

---------

चाकर्दा येथील परिस्थिती आवाक्याबाहेर

आठवड्यात पाच मृत्यू , प्रत्येक घरात सर्दी न् खोकला ताप

धारणी : कोरोना विषाणू हळूहळू गाव-खेड्यापर्यंत प्रवेशल्याने तालुक्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. आरोग्य प्रशासन हतबल झाले असून, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे थेट मृत्यूचा धोका असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

धारणी शहरातील जवळपास सर्व दवाखाने हाऊसफुल असून, दुसरीकडे भूमका आणि परिहार यांच्या आहारी जाऊनदेखील अनेकांनी आपले जीव गमावले आहे. तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील चाकर्दा या गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, घरोघरी सर्दी खोकला व तापाचे रुग्ण असल्यामुळे आणि अवघ्या एका आठवड्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण अमरावती येथे उपचार घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तलाई कॅम्प येथील दोघांचा मृत्यू

धारणी शहराला लागून असलेल्या तलाई कॅम्प येथील ६५ वर्षीय पुरुषाचा अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच भागातील एका २५ वर्षीय महिलेचासुद्धा उपजिल्हा रुग्णालय येथे मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. मृत्यू कशामुळे झाला, याचा अनेकांविषयी उलगडा होऊ शकला नसल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. धारणी येथे पॉझिटिव्ह रुग्णासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

------------------

दोन बातम्या समोरासमोर लावून पान २ ची लिड करणे