शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘खावटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

कॉमन/ गणेश वासनिक फोटो : ०७, एएमपीएच ०१ (कॅप्शन: अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात निकृष्ट खावटी किराणा किट आणून ...

कॉमन/ गणेश वासनिक

फोटो : ०७, एएमपीएच ०१ (कॅप्शन: अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात निकृष्ट खावटी किराणा किट आणून टाकताना आदिवासी बांधव)

अमरावती : खावटी म्हणून आदिवासी बांधवांना वाटप केले जाणारी किराणा किट अत्यंत निकृष्ट आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी दुसरा लाॅकडाऊन घोषित करताना जी अतिरिक्त दोन हजारांची खावटी जाहीर केली, ती रक्कम अद्यापही मिळाली नाही. आदिवासी कुटुंबीयांना वाटप होणाऱ्या खावटी किटच्या नावाखाली कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

लाॅकडाऊनमुळे आदिवासींपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने खावटी योजना पुनर्जीवित केली. यात ११ लाख ५५ हजार कुटुंबांना रोख स्वरूपात २ हजार रुपये व वस्तू स्वरूपात २ हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासाठी सरकारने ४८६ कोटी रुपये मंजूर केले. मात्र, आता या योजनेत गरिबांना निकृष्ट धान्याचे वाटप केले जात आहे. अर्ज भरून नेले पण यादीत नाव आले नाही, यादीत नाव आले तर खात्यात पैसे जमाच झाले नाही, अशी ओरड आहे. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दाट संशय असून आदिवासी समाजाला न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ट्रायबल फोरमचे संस्थापक

अध्यक्ष प्रमोद घोडाम यांनी तक्रार केली आहे.

बाॅक्स

तूर डाळीत खडे, तर तेलाला कुबट वास

खावटी म्हणून मटकी १ किलो, चवळी २ किलो, हरभरा ३ किलो, पांढरा वाटाणा १ किलो, तूर डाळ २ किलो, उडीद दाळ १ किलो, मीठ ३ किलो, गरम मसाला ५०० ग्रॅम, शेंगदाणा तेल १ किलो, मिरची पावडर १ किलो, चहा पावडर ५०० ग्रॅम, साखर ३ किलो अशा १२ वस्तू वाटप केल्या जात आहेत. यातील चटणीत विटकरी रंगाचे बारीक खडे आहेत. तर मूग डाळ व तुरीच्या डाळीला वास येत आहे. या सर्व वस्तूंची बाजारातील किंंमत एक हजारांच्या घरात आहे. मात्र, ही किराणा किट हजारांच्या म्हणून आदिवासींच्या माथी मारत आहे.

-------------

कोट

खावटीतील वस्तू आयएसआय मार्क असायला पाहिजे; पण तसे नाही. जनावरे सुद्धा खाणार नाही असे निकृष्ट धान्य वाटप करून आदिवासी समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. या धान्याची तपासणी करून कोट्यवधीच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे.

-डॉ. संदीप धुर्वे, आमदार, आर्णी-केळापूर