शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

फळगळीमुळे संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:16 IST

संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे ...

संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील

मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे संत्रा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने मोर्शी तालुक्यातील संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. संत्रा गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे, असा प्रश्न संत्राउत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानाचे सर्वेक्षण करून संशोधकांनी व कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.

मोर्शी तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, तालुक्यातील संत्राबागांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले. त्यामुळे बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून, शेंडेमर रोगामुळे बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही संशोधक व कृषी विभागाकडून संत्राउत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळालेले नाही. संत्राबागांची पाहणीदेखील कुणी केलेली नाही. संत्राउत्पादक शेतकऱ्यांना खासगी कंपनीचे निविष्ठा विक्रेते व कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या सल्ल्याने या रोगांवर उपाय योजना करावी लागत आहे. यात त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. संत्रागळतीची माहिती शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली असूनसुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

असे आहे संकट

तालुक्यातील लाखो संत्राझाडावर संत्रा गळती, कोलत्या (शेंडेमर, पायकुज व मूळकुज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. शासनाने प्रथम या रोगावर उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

-----------------

आंबिया बहराला गळतीचा मारा

मोर्शी तालुक्यात संत्राउत्पादक शेतकरी अधिक आहेत. दापोरी, हिवरखेड, बेलोना, उमरखेड, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा, भिवकुंडी, मायवाडी, तरोडा, धानोरासह तालुक्यातील परिसरात संत्राउत्पादन घेण्यात येते. यावर्षी प्रथमच संत्रा झाडावरील शेंडे अचानक वाळू लागल्याने हिरव्या फांद्यांसह आंबिया बहराची हिरवी संत्री गळून जमिनीवर पडत आहेत. संत्रा उत्पादक शेतकर्यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असतांना संत्रा गळतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.