शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

फळगळीमुळे संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:16 IST

संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे ...

संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील

मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे संत्रा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने मोर्शी तालुक्यातील संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. संत्रा गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे, असा प्रश्न संत्राउत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानाचे सर्वेक्षण करून संशोधकांनी व कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.

मोर्शी तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, तालुक्यातील संत्राबागांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले. त्यामुळे बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून, शेंडेमर रोगामुळे बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही संशोधक व कृषी विभागाकडून संत्राउत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळालेले नाही. संत्राबागांची पाहणीदेखील कुणी केलेली नाही. संत्राउत्पादक शेतकऱ्यांना खासगी कंपनीचे निविष्ठा विक्रेते व कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या सल्ल्याने या रोगांवर उपाय योजना करावी लागत आहे. यात त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. संत्रागळतीची माहिती शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली असूनसुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

असे आहे संकट

तालुक्यातील लाखो संत्राझाडावर संत्रा गळती, कोलत्या (शेंडेमर, पायकुज व मूळकुज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. शासनाने प्रथम या रोगावर उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

-----------------

आंबिया बहराला गळतीचा मारा

मोर्शी तालुक्यात संत्राउत्पादक शेतकरी अधिक आहेत. दापोरी, हिवरखेड, बेलोना, उमरखेड, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा, भिवकुंडी, मायवाडी, तरोडा, धानोरासह तालुक्यातील परिसरात संत्राउत्पादन घेण्यात येते. यावर्षी प्रथमच संत्रा झाडावरील शेंडे अचानक वाळू लागल्याने हिरव्या फांद्यांसह आंबिया बहराची हिरवी संत्री गळून जमिनीवर पडत आहेत. संत्रा उत्पादक शेतकर्यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असतांना संत्रा गळतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.