शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

फळगळीमुळे संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:16 IST

संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे ...

संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील

मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे संत्रा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने मोर्शी तालुक्यातील संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. संत्रा गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे, असा प्रश्न संत्राउत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानाचे सर्वेक्षण करून संशोधकांनी व कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.

मोर्शी तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, तालुक्यातील संत्राबागांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले. त्यामुळे बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून, शेंडेमर रोगामुळे बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही संशोधक व कृषी विभागाकडून संत्राउत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळालेले नाही. संत्राबागांची पाहणीदेखील कुणी केलेली नाही. संत्राउत्पादक शेतकऱ्यांना खासगी कंपनीचे निविष्ठा विक्रेते व कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या सल्ल्याने या रोगांवर उपाय योजना करावी लागत आहे. यात त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. संत्रागळतीची माहिती शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली असूनसुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

असे आहे संकट

तालुक्यातील लाखो संत्राझाडावर संत्रा गळती, कोलत्या (शेंडेमर, पायकुज व मूळकुज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. शासनाने प्रथम या रोगावर उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

-----------------

आंबिया बहराला गळतीचा मारा

मोर्शी तालुक्यात संत्राउत्पादक शेतकरी अधिक आहेत. दापोरी, हिवरखेड, बेलोना, उमरखेड, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा, भिवकुंडी, मायवाडी, तरोडा, धानोरासह तालुक्यातील परिसरात संत्राउत्पादन घेण्यात येते. यावर्षी प्रथमच संत्रा झाडावरील शेंडे अचानक वाळू लागल्याने हिरव्या फांद्यांसह आंबिया बहराची हिरवी संत्री गळून जमिनीवर पडत आहेत. संत्रा उत्पादक शेतकर्यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असतांना संत्रा गळतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.