शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

नुकसान मोठे, पंचनामे खोटे

By admin | Updated: April 17, 2015 23:56 IST

जिल्ह्यावर डिसेंबर २०१४ अखेरपासून अवकाळी काळी छाया आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले.

नाचविले कागदी घोडे : सर्वच तालुक्यात १५ हजार हेक्टर बाधित क्षेत्रअमरावती : जिल्ह्यावर डिसेंबर २०१४ अखेरपासून अवकाळी काळी छाया आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. शासनाने या बाधित क्षेत्राला विशेष बाब म्हणून मदतीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ७ हजार ९८३ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. महसूल व कृषी विभागाद्वारा केवळ २८ फेब्रुवारी व १ मार्च या दिनांकांचा पंचनामा करण्यात आला. प्रत्यक्षात मार्च महिन्यात कित्येकदा अवकाळीने पिकाची हानी केली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात १५ हजारावर हेक्टर श्ोतीपीकाचे नुकसान झाले असताना ८ हजार हेक्टरमध्ये नुकसानीचा शासनाचा संयुक्त अहवाल खोटा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जिल्ह्यात रबी हंगामाकरीता १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. खरीपाचा हंगाम माघारल्याने रबीचा हंगाम देखील दीड महिने माघारला. कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा ५ टक्के अधिक रबीची पेरणी यावर्षी झाली. यामध्ये सर्वाधिक ९८ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा व ५२ हजार हेक्टर क्षेत्रात गहू अशी पेरणी झाली. डिसेंबर २०१४ अखेरीस पासून अवकाळी पाऊस व गारपीटीचे सत्र जिल्ह्यात सुरु झाले. जानेवारी महिन्यात ३ वेळा, फेब्रुवारीत २ वेळा मार्च महिन्यात ३ वेळा व एप्रिल महिन्यात सध्याही अवकाळीचा कहर सुरुच आहे. शासनाने केवळ फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानूसार दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च या दोन दिवसात ५० टक्याहून अधिक नुकसान झालेले ६ हजार १२१ हेक्टर १२ आर. क्षेत्र आहे.प्रत्यक्षात बाधीत क्षेत्र १५ हजार हेक्टरवर आहे.केवळ दोन महिन्यांच्या नुकसानीसाठी निर्णयराज्य शासनाने अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित क्षेत्राला विशेष मदत देण्याचा निर्णय घेतला तो केवळ दोन महिन्यांच्या बाधित क्षेत्रासाठी आहे. यामध्ये शासनाने शेतीपिके, फळपिके, बहुवार्षिक पिके या सर्व पिकासाठी दोन हेक्टरची मर्यादा ठरविली आहे.