शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

‘अमृत’चा लाभ थेंबा-थेंबाने

By admin | Updated: November 24, 2015 00:21 IST

केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून राज्यातील ४२ शहरांना निधी मिळणार असला तरी, अद्यापपर्यंत राज्याला देय असलेला पहिला हप्ता केंद्र शासनाने दिलेला नाही.

अचलपूर पालिकेला प्रतीक्षा : तरतूदच नाही, निकषही कठीणअमरावती : केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून राज्यातील ४२ शहरांना निधी मिळणार असला तरी, अद्यापपर्यंत राज्याला देय असलेला पहिला हप्ता केंद्र शासनाने दिलेला नाही. यासाठी सविस्तर वार्षिक आराखडा राज्य शासनाने सादर केला नसल्याने राज्याला पहिल्या टप्प्यापासून वंचित रहावे लागले. उल्लेखनीय असे की, यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेचा समावेश आहे. शेजारील गुजरातसह आंध्रपदेश, मध्यपद्रेश, झारखंड, मिझोराम, उडिसा या राज्यांना अमृत योजनेतून निधी मंजूर होऊन त्याचा पहिला हप्ताही केंद्र शासनाने वितरित केला आहे. स्मार्टसिटी योजनेनंतर राज्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने ‘अटल मिशन फॉर रिज्युवेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन (अमृत)’ ही योजना जाहीर केली. या अंतर्गत प्रत्येक राज्याने वार्षिक आराखडा केंद्र सरकारला सादर करणे अपेक्षित होते. अमृत योजनेत राज्याने एक लाख लोकसंख्या असणाऱ्या ४२ शहरांचा समावेश केला. तथापि अद्यापपर्यंत राज्याच्या सविस्तर आराखड्याला अंतिम स्वरुप दिले नाही. त्यामुळे या ४२ शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी मिळालेला नाही. सद्यस्थिती पाहता अमृत योजनेसाठी निकषांची पूर्तीच होणे कठीण आहे. अचलपूर शहरासह बहुतांश शहरांमध्ये असलेली सद्यस्थिती पाहता योजनेचे निकष जसजसे पूर्ण होतील तसतसा या योजनेच्या निधीचा लाभ थेंबाथेंबाने मिळेल. योजनेच्या निकषानुसार ‘अमृत’ची वाट कठीण दिसत असली तरी अवघड मात्र नक्कीच नाही, हेदेखील खरे आहे. अमृत योजनेसाठी केंद्र शासन ५० टक्के राज्यशासन ३० टक्के आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था २० टक्के निधी खर्च करणार आहे.