शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! सर्पसंचार वाढला; एकाच दिवशी पकडले २३ साप

By admin | Updated: June 21, 2014 01:10 IST

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर शहरातील लोकवस्त्यांमध्ये सर्पांचा संचार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

  अमरावती : दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर शहरातील लोकवस्त्यांमध्ये सर्पांचा संचार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी २३ तर शुक्रवारी ७ साप पकडण्यात आले असून ते छत्रीतलाव परिसरात सुरक्षित सोडण्यात आले. साप विषारी असो की बिनविषारी; तो दिसला की, भल्या भल्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहत नाही. मागील दोन दिवसांपासून शहराच्या कानाकोपऱ्यात साप निघत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे सापांचे आश्रयस्थान असलेल्या बिळात (वारुळ) पाणी शिरल्याने त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी साप हे सुरक्षित स्थळ शोधतात. त्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागात सापांचा संचार वाढू लागला आहे. सापांचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीसुद्धा पहावयास मिळत आहे. साप मनुष्याला घाबरतो, हे सर्वश्रुत आहे; मात्र, सापाला मनुष्यदेखील अधिक घाबरतो, हे घरात साप निघाल्यानंतर स्पष्ट होते. लोकवस्ती वाढल्याने सापांचे संरक्षण धोक्यात अमरावती : दस्तुरनगर परिसरातील रहिवासी सर्पमित्र नीलेश कंचनपुरे यांनी १९ जून रोजी २३ तर २० जून रोजी ७ साप पकडून त्यांना छत्री तलाव परिसरात जीवदान दिले आहे. पहिला पाऊस पडताच सापांचा संचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने सुरक्षिततेसाठी अद्यापपर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. शहरात कवड्या व पादीवळ जातीचे सर्वाधिक साप मागील दोन दिवसांत पकडण्यात आल्याची माहिती कंचनपुरे यांनी दिली. झपाट्याने लोकवस्ती वाढत असल्याने खुल्या जागा आणि वनपरिक्षेत्रात मानवाने वास्तव्य सुरु केले आहे. त्यामुळे सापांचे भ्रमण आणि संरक्षण त्यामुळे धोक्यात आले आहे.साप दिसताच त्याला जीवे मारण्याची नकळत मानवाच्या डोक्यात कल्पना येते, ही मानसिकता सापांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो. मात्र त्याच्या चाव्यामुळे जीवाला धोका असल्याने त्याला संपविण्याचाच अधिक प्रमाणात विचार केला जातो. ही भावनाच साप नावाचा प्राणी संपविण्याच्या मार्गी लागल्याचे प्राणीतंज्ज्ञाने सांगितले.