शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

सावधान! विनाकारण फिराल तर करावी लागेल कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST

अमरावती : ३० एप्रिलपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून, अत्यावश्यक सुविधेकरिता सकाळी चार तासांची मुदत दिली आहे. मात्र, ११ ...

अमरावती : ३० एप्रिलपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून, अत्यावश्यक सुविधेकरिता सकाळी चार तासांची मुदत दिली आहे. मात्र, ११ वाजतानंतरही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशांवर कारवाईकरिता मुख्य चौकात आरोग्य विभागातर्फे अत्याधुनिक चार मोबाईल ॲम्बुलन्स व्हॅन तैनात केलेले आहेत. विचारणा केल्यानंतर पोलिसांना त्यांचे योग्य उत्तर न मिळाल्यास महापालिकेच्या पथकाद्वारा त्यांची कोरोना चाचणी( रॅपिड अँटिजेन टेस्ट ) केली जात आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत ४२१ जणांचे कोरोना टेस्ट करण्यात आली. यात १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

नागरिकांची चाचणी केल्यानंतर १० मिनिटांत त्याचा अहवाल मिळत असून, रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला कोविड रुग्णालयात दाखल केले जात आहे. बुधवारी महापालिकेचे आरोग्य विभाग व पोलिसांच्यावतीने संयुक्त कारवाई राबवीत दुपारी अडीच वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पठाण चौकात १२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला, तर इर्विन चौकात १२० जणांच्या कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच जयस्तंभ चौकात ६३ चाचण्या करण्यात आल्या. यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला नाही तर शेगाव नाका येथे ५६ पैकी चार पॉझिटिव्ह तर यशोदानगर येथे ६२ चाचण्यांपैकी दोन पॉझिटिव्ह आढळले. या कारवाईमुळे नागरिकसुद्धा धास्तावले असून त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्याची मदत होत आहे. बुधवारी रात्री पासून कडक लॉकडाऊन लागण्याचे निर्देश असल्याने पोलीस थेट गुन्हा दाखल करणार आहे. सध्या सुद्धा विनाकरण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला जात आहे. तसेच वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे.

या कारवाईकरीता पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात सर्व ठाणेदार, तसेच महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे व उपआयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त भाग्यश्री बोरीकर, सहायक आयुक्त प्राची कचरे व त्यांची आरोग्य टिम कार्यरत आहेत.

बॉक्स

बाजार समितीनजीक ३६७ जणांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने या ठिकाणी मोबाईल ॲम्बुलन्स व्हॅन तैनात करून मंगळवारी ३६७ जणांची रॅपीड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. तसेच मास्क न घालणाऱ्या प्रत्येक ५०० रुपये असा २४ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती महापालिका उपायुक्त रवि पवार यांनी दिली.

कोट

संचारबंदी आदेश जारी आहेत. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना संबंधित ठाण्याचे पोलीस पथक अडवित आहे. त्यांना जाब विचारला जात आहे. समाधानकारण उत्तर न मिळाल्यास त्यांना कोरोना चाचणीसाठी महापालिकेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात येत आहे. तसेच कलम १८८ अंतर्गत गुन्हासुद्धा नोंदविला जात आहे.

- आरती सिंह, पोलीस आयुक्त