शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मिठाई खा; पण निकष पारखून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:30 IST

दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देरासायनिक पदार्थांचा वापर होण्याची शक्यता : दिवाळीच्या सणासुदीला बळावतील विकार

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.सणासुदीला मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न प्रशासन विभागाने हॉटेलमधील अशा पकारच्या मिठाईची तपासणी केल्यास भेसळ संदर्भातील सत्य बाहेर निघेल. मिठाईसाठी लागणारा खवा हा अमरावती जिल्हयात कमी पमाणात तयार होतो. कारण मिठार्इंची मागणी जास्त व दुधाचे संकलन त्या तुलनेत कमी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून दूध आणावे लागते.चवदार लागणाºया मिठाईमध्ये घातक असे रसायनिक द्रव्य वापरले जात असल्याने ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. मिठाई लहान मुलेसुद्धा आवडीने सेवन करतात. त्या कारणाने त्यांच्या आरोग्याला भेसळयुक्त मिठाई जास्त घातक व हानिकारक ठरू शकते.जिल्ह्यात एकूण १२६ परवानाधारक हॉटेल तसेच २६२ रेस्टॉरंट-हॉटेल आहेत. ५६६ लहान-मोठे नोंदणीकृत हॉटेल जिल्ह्यात कार्यरत आहेत. शेकडो हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या मिठाई विक्री होत आहेत. त्या सर्वच्या सर्व मिठाईच्या गुणवत्तेची पारख झालेली असण्याची खात्री बाळगता येत नाही.कसा तयार होतो खवा व भेसळ?एका लिटर दुधामधून २०० ग्रॅम खवा तयार होतो. म्हणजे एक किलो खव्यासाठी पाच लिटर दुधाची आवश्यकता असते. एका हॉटेलमध्ये या दिवसांची सरासरी २५ किलो मिठाई एका दिवसात विक्री होते. म्हणजे सणाला दिवसाकाठी १५००० किलो मिठाईची जिल्ह्यात विक्री करण्यात येते. ही मिठाई तयार करण्यासाठी सरासरी ७५ हजार लिटर दुधाची गरज भासते. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्हा दूग्ध संघाकडून साडेचार हजार लीटर दुधाची आवक नोंदविली जात आहे, तर मदर डेअरी, यशोदा व खासगी दूग्ध पुरवठाच्या माध्यमातून २६ हजार लिटर दूध संकलित होत आहे व ते नागरिक व हॉटेल चालकांपर्यंत पोहचविले जात आहे. नोंदणी न केलेल्या खासगी किरकोळ दुग्ध उत्पादकांकडूनही हजारो लिटर दूध बाजारात येते. तरीही जेवढी खव्याची मागणी आहे, तेवढा खवा तयार करण्याइतपत दुधाची पूर्तता अमरावती जिल्ह्यातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्या कारणाने खवा बाहेरून येतो व यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी ओळखली जाईल भेसळमिठाई म्हणून आपण गोड विष तर खात नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक पदार्थांवर लेबल किंवा इतर गोष्टी या नियमानुसार दिसल्या नाहीत, तर यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असण्याची शक्यता असते. प्रथम खव्याच्या जवळून सुगंध घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. खव्याचे तुकडे घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनिल यलो रंगाची भेसळ असल्याची समजावे. खव्याचे पदार्थ २४ तासांत, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत संपविण्याची सूचना मिठाईच्या बॉक्सवर नमूद आहे काय, हे पहावे.