शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

सावधान! मिठाई खा; पण निकष पारखून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:30 IST

दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देरासायनिक पदार्थांचा वापर होण्याची शक्यता : दिवाळीच्या सणासुदीला बळावतील विकार

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.सणासुदीला मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न प्रशासन विभागाने हॉटेलमधील अशा पकारच्या मिठाईची तपासणी केल्यास भेसळ संदर्भातील सत्य बाहेर निघेल. मिठाईसाठी लागणारा खवा हा अमरावती जिल्हयात कमी पमाणात तयार होतो. कारण मिठार्इंची मागणी जास्त व दुधाचे संकलन त्या तुलनेत कमी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून दूध आणावे लागते.चवदार लागणाºया मिठाईमध्ये घातक असे रसायनिक द्रव्य वापरले जात असल्याने ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. मिठाई लहान मुलेसुद्धा आवडीने सेवन करतात. त्या कारणाने त्यांच्या आरोग्याला भेसळयुक्त मिठाई जास्त घातक व हानिकारक ठरू शकते.जिल्ह्यात एकूण १२६ परवानाधारक हॉटेल तसेच २६२ रेस्टॉरंट-हॉटेल आहेत. ५६६ लहान-मोठे नोंदणीकृत हॉटेल जिल्ह्यात कार्यरत आहेत. शेकडो हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या मिठाई विक्री होत आहेत. त्या सर्वच्या सर्व मिठाईच्या गुणवत्तेची पारख झालेली असण्याची खात्री बाळगता येत नाही.कसा तयार होतो खवा व भेसळ?एका लिटर दुधामधून २०० ग्रॅम खवा तयार होतो. म्हणजे एक किलो खव्यासाठी पाच लिटर दुधाची आवश्यकता असते. एका हॉटेलमध्ये या दिवसांची सरासरी २५ किलो मिठाई एका दिवसात विक्री होते. म्हणजे सणाला दिवसाकाठी १५००० किलो मिठाईची जिल्ह्यात विक्री करण्यात येते. ही मिठाई तयार करण्यासाठी सरासरी ७५ हजार लिटर दुधाची गरज भासते. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्हा दूग्ध संघाकडून साडेचार हजार लीटर दुधाची आवक नोंदविली जात आहे, तर मदर डेअरी, यशोदा व खासगी दूग्ध पुरवठाच्या माध्यमातून २६ हजार लिटर दूध संकलित होत आहे व ते नागरिक व हॉटेल चालकांपर्यंत पोहचविले जात आहे. नोंदणी न केलेल्या खासगी किरकोळ दुग्ध उत्पादकांकडूनही हजारो लिटर दूध बाजारात येते. तरीही जेवढी खव्याची मागणी आहे, तेवढा खवा तयार करण्याइतपत दुधाची पूर्तता अमरावती जिल्ह्यातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्या कारणाने खवा बाहेरून येतो व यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी ओळखली जाईल भेसळमिठाई म्हणून आपण गोड विष तर खात नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक पदार्थांवर लेबल किंवा इतर गोष्टी या नियमानुसार दिसल्या नाहीत, तर यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असण्याची शक्यता असते. प्रथम खव्याच्या जवळून सुगंध घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. खव्याचे तुकडे घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनिल यलो रंगाची भेसळ असल्याची समजावे. खव्याचे पदार्थ २४ तासांत, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत संपविण्याची सूचना मिठाईच्या बॉक्सवर नमूद आहे काय, हे पहावे.