शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सावधान! मिठाई खा; पण निकष पारखून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:30 IST

दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देरासायनिक पदार्थांचा वापर होण्याची शक्यता : दिवाळीच्या सणासुदीला बळावतील विकार

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.सणासुदीला मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न प्रशासन विभागाने हॉटेलमधील अशा पकारच्या मिठाईची तपासणी केल्यास भेसळ संदर्भातील सत्य बाहेर निघेल. मिठाईसाठी लागणारा खवा हा अमरावती जिल्हयात कमी पमाणात तयार होतो. कारण मिठार्इंची मागणी जास्त व दुधाचे संकलन त्या तुलनेत कमी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून दूध आणावे लागते.चवदार लागणाºया मिठाईमध्ये घातक असे रसायनिक द्रव्य वापरले जात असल्याने ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. मिठाई लहान मुलेसुद्धा आवडीने सेवन करतात. त्या कारणाने त्यांच्या आरोग्याला भेसळयुक्त मिठाई जास्त घातक व हानिकारक ठरू शकते.जिल्ह्यात एकूण १२६ परवानाधारक हॉटेल तसेच २६२ रेस्टॉरंट-हॉटेल आहेत. ५६६ लहान-मोठे नोंदणीकृत हॉटेल जिल्ह्यात कार्यरत आहेत. शेकडो हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या मिठाई विक्री होत आहेत. त्या सर्वच्या सर्व मिठाईच्या गुणवत्तेची पारख झालेली असण्याची खात्री बाळगता येत नाही.कसा तयार होतो खवा व भेसळ?एका लिटर दुधामधून २०० ग्रॅम खवा तयार होतो. म्हणजे एक किलो खव्यासाठी पाच लिटर दुधाची आवश्यकता असते. एका हॉटेलमध्ये या दिवसांची सरासरी २५ किलो मिठाई एका दिवसात विक्री होते. म्हणजे सणाला दिवसाकाठी १५००० किलो मिठाईची जिल्ह्यात विक्री करण्यात येते. ही मिठाई तयार करण्यासाठी सरासरी ७५ हजार लिटर दुधाची गरज भासते. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्हा दूग्ध संघाकडून साडेचार हजार लीटर दुधाची आवक नोंदविली जात आहे, तर मदर डेअरी, यशोदा व खासगी दूग्ध पुरवठाच्या माध्यमातून २६ हजार लिटर दूध संकलित होत आहे व ते नागरिक व हॉटेल चालकांपर्यंत पोहचविले जात आहे. नोंदणी न केलेल्या खासगी किरकोळ दुग्ध उत्पादकांकडूनही हजारो लिटर दूध बाजारात येते. तरीही जेवढी खव्याची मागणी आहे, तेवढा खवा तयार करण्याइतपत दुधाची पूर्तता अमरावती जिल्ह्यातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्या कारणाने खवा बाहेरून येतो व यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी ओळखली जाईल भेसळमिठाई म्हणून आपण गोड विष तर खात नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक पदार्थांवर लेबल किंवा इतर गोष्टी या नियमानुसार दिसल्या नाहीत, तर यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असण्याची शक्यता असते. प्रथम खव्याच्या जवळून सुगंध घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. खव्याचे तुकडे घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनिल यलो रंगाची भेसळ असल्याची समजावे. खव्याचे पदार्थ २४ तासांत, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत संपविण्याची सूचना मिठाईच्या बॉक्सवर नमूद आहे काय, हे पहावे.