शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

सावधान! मिठाई खा; पण निकष पारखून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:30 IST

दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देरासायनिक पदार्थांचा वापर होण्याची शक्यता : दिवाळीच्या सणासुदीला बळावतील विकार

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीला बाजारात मिळणाऱ्या विविध रंगबिरंगी मिठाईला विशेष मागणी असते. मिठाई खा, पण जरा जपून, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.सणासुदीला मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न प्रशासन विभागाने हॉटेलमधील अशा पकारच्या मिठाईची तपासणी केल्यास भेसळ संदर्भातील सत्य बाहेर निघेल. मिठाईसाठी लागणारा खवा हा अमरावती जिल्हयात कमी पमाणात तयार होतो. कारण मिठार्इंची मागणी जास्त व दुधाचे संकलन त्या तुलनेत कमी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून दूध आणावे लागते.चवदार लागणाºया मिठाईमध्ये घातक असे रसायनिक द्रव्य वापरले जात असल्याने ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. मिठाई लहान मुलेसुद्धा आवडीने सेवन करतात. त्या कारणाने त्यांच्या आरोग्याला भेसळयुक्त मिठाई जास्त घातक व हानिकारक ठरू शकते.जिल्ह्यात एकूण १२६ परवानाधारक हॉटेल तसेच २६२ रेस्टॉरंट-हॉटेल आहेत. ५६६ लहान-मोठे नोंदणीकृत हॉटेल जिल्ह्यात कार्यरत आहेत. शेकडो हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या मिठाई विक्री होत आहेत. त्या सर्वच्या सर्व मिठाईच्या गुणवत्तेची पारख झालेली असण्याची खात्री बाळगता येत नाही.कसा तयार होतो खवा व भेसळ?एका लिटर दुधामधून २०० ग्रॅम खवा तयार होतो. म्हणजे एक किलो खव्यासाठी पाच लिटर दुधाची आवश्यकता असते. एका हॉटेलमध्ये या दिवसांची सरासरी २५ किलो मिठाई एका दिवसात विक्री होते. म्हणजे सणाला दिवसाकाठी १५००० किलो मिठाईची जिल्ह्यात विक्री करण्यात येते. ही मिठाई तयार करण्यासाठी सरासरी ७५ हजार लिटर दुधाची गरज भासते. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्हा दूग्ध संघाकडून साडेचार हजार लीटर दुधाची आवक नोंदविली जात आहे, तर मदर डेअरी, यशोदा व खासगी दूग्ध पुरवठाच्या माध्यमातून २६ हजार लिटर दूध संकलित होत आहे व ते नागरिक व हॉटेल चालकांपर्यंत पोहचविले जात आहे. नोंदणी न केलेल्या खासगी किरकोळ दुग्ध उत्पादकांकडूनही हजारो लिटर दूध बाजारात येते. तरीही जेवढी खव्याची मागणी आहे, तेवढा खवा तयार करण्याइतपत दुधाची पूर्तता अमरावती जिल्ह्यातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्या कारणाने खवा बाहेरून येतो व यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी ओळखली जाईल भेसळमिठाई म्हणून आपण गोड विष तर खात नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक पदार्थांवर लेबल किंवा इतर गोष्टी या नियमानुसार दिसल्या नाहीत, तर यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असण्याची शक्यता असते. प्रथम खव्याच्या जवळून सुगंध घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. खव्याचे तुकडे घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनिल यलो रंगाची भेसळ असल्याची समजावे. खव्याचे पदार्थ २४ तासांत, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत संपविण्याची सूचना मिठाईच्या बॉक्सवर नमूद आहे काय, हे पहावे.