शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

बापरे, १८० दिवसांत ११,७१५ जणांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

प्रदीप भाकरे अमरावती : मोकाट श्वानांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराबरोबर ज‌िल्ह्यात भटक्या श्वानांचे प्रमाण ...

प्रदीप भाकरे

अमरावती : मोकाट श्वानांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराबरोबर ज‌िल्ह्यात भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले असून, लहान मुलांपासून ते वाहनचालक, प्राणी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल ११,७१५ व्यक्तींना श्वानांनी चावा घेतला. त्यात अमरावती शहरातील ७ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश आहे.

दोन महिन्यांपूर्वी दर्यापूर शहरात एका भटक्या श्वानाने १३ जणांना चावा घेतला, तर ४ जुलै रोजी सकाळी श्वानांनी केलेल्या हल्ल्यात एका हरणाचा मृत्यू झाला होता. दोन गंभीर जखमीही झाले होते. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून श्वान निर्बिजिकरणात हाराकिरी होत असल्याने मोकाट श्वानांच्या संख्येत भर पडली आहे. शहरातून रात्री जाताना श्वान मागे धावतात. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. शहरातील झोपडपट्टी भागात मोकाट श्वानांचा मुक्त संचार असला, तरी अन्य भागातील रस्त्यांवरदेखील मोकाट श्वानांचे कळप आढळून येतात. एकट्या इर्विन रुग्णालयात सहा महिन्यांत श्वानदंशाच्या तब्बल ७,२९७ केसेसची नोंद घेण्यात आली. मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या प्रशासन याबाबत कोणतीही उपायोजना करत नसल्यामुळे नागरिकांनीच सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. इर्विन रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध असून, कुत्र्याने चावा घेतल्यास ही लस तातडीने टोचून घेणे आवश्यक आहे.

बॉक्स १

मोकाट फिरणाऱ्या श्वानांपासून धोका अधिक

शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांपासून धोका अधिक आहे. झुंडीने राहणाऱ्या श्वानांमध्ये पिसाळण्याची शक्यता अधिक असते. अस्वच्छ खाणे, अस्वच्छ वातावरणासह काही अन्य कारणांमुळे रेबीजचे विषाणू श्वानाच्या शरीरात प्रवेश करू शकतात. हे विषाणू त्याच्या लाळेत असतात. पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यानंतर लाळेतून इतरांना संसर्ग झाल्यास रेबीजची लागण होण्याचा धोका असतो.

बॉक्स २

येथे श्वानांचा वावर

कचरा कुंडीसह मटण, चिकनची दुकाने, चायनीजची दुकाने, कत्तलखाने व कंपोस्ट डेपो परिसरात श्वानांच्या झुंडी कायम आहेत. चायनीजच्या गाड्यांवरील कचरा कोंडाळा किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. त्यामुळे अशा परिसरात श्वानांचा वावर वाढला आहे.

लक्षणे

रेबीज झालेल्या रुग्णाला साधारणपणे ताप आणि तापाची लक्षणे, मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भीती वाटते. त्याचा घसा पूर्णपणे खरडून निघतो व तो बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी श्वानांच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.

उपचार -

श्वान चावल्याने जखम झाल्यावर लवकर ती स्वच्छ करावी, त्यामुळे रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीजवर ॲन्टीरेबीज व्हॅक्स लस उपलब्ध आहे. रुग्णाने रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस घेतले पाहिजे. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात, चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत.

श्वान चावल्यावर उपाय -

जखम स्वच्छ साबणाने धुवून काढावी, जंतुनाशक लावावे, जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

हे टाळा -

जखमेवर चुना, हळद, माती, तंबाखू, चहा पावडर, लिंबू असे पदार्थ लावू नये

जखमेला पट्टी बांधू नये, टाके घालू नयेत

जानेवारी ते जूनपर्यंत झालेली नोंद

दवाखाना : श्वानदंश केसेस

इर्विन : ७२९७

ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी : ४०३

ग्रामीण रुग्णालय भातकुली: १७४

ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार : २८७

ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे : ३२१

ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा : ३२

ग्रामीण रुग्णालय, चुरणी: ३९

ग्रामीण रुग्णालय, धामणगाव : १००

ग्रामीण रुग्णालय, नांदगाव : ३००

ग्रामीण रुग्णालय, तिवसा : २१३

ग्रामीण रुग्णालय, वरूड : ४३२

उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर: ७८०

उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर : ३४४

उपजिल्हा रुग्णालय, धारणी ५९५

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी : ३९८