शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

२९ टक्के कर्जवाटपावर बँका स्थिर, पश्चिम विदर्भात शेतकरी अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 19:44 IST

राष्ट्रीयीकृत अन् ग्रामीण बँकांचा टक्का माघारला

अमरावती : यंदाच्या हंगामात सुरुवातीला पाऊस माघारल्याने खरिपाची दुबार पेरणी करावी लागली. शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपात बँकांचे सहकार्य राहिले. पश्चिम विदर्भात ८५३९.३२ कोटी पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना पाच महिन्यांत बँकांनी ३,३०,८३४ शेतकऱ्यांना २५३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले, याची २९ टक्केवारी आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपात माघारल्याचे वास्तव आहे.

सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. यावर शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असली तरी अटी-शर्तींमध्ये लाखो शेतकºयांचा सात-बारा कोरा झालाच नाही. सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना  बँका पीककर्ज नाकारत आहेत. प्रशासनाच्या तंबीला बँका जुमानत नसल्याने या बँकांवर अंकुश कुणाचा, हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यंदाच्या हंगामासाठी अमरावती जिल्ह्यात १६८५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४३,५२३ शेतकºयांना ३६,००२ हेक्टर क्षेत्रासाठी ४७४.३६ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात १३९८.७८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ४६,६८४ शेतकऱ्यांना ४८,५१६ हेक्टरसाठी ३९९.२१ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८.५४ टक्केवारी आहे. वाशीम जिल्ह्यात १५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४०,८९४ शेतकरी खातेदारांना ४४,९२५ हेक्टरसाठी ३३१.८७  कोटींचे वाटप करण्यात आले. ही २१.६९ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात १७७३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २९,४१३ शेतकºयांना ८०७८ हेक्टर क्षेत्रासाठी २३३.६० कोटींचे पीककर्जवाटप करण्यात आले. ही १३.१७ टक्केवारी आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात २१६१ कोटींच्या पीकर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,७०,२६० शेतकºयांना १,०६,४१२ हेक्टर क्षेत्रासाठी १०९३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५०.५६ टक्केवारी आहे.

राट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानेनायंदाच्या हंगामासाठी विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११.०३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे. आता खरीप हंगामाचे वाटप संपत आले असताना या बँकांनी १,५२,३८८ शेतकऱ्यांना १३८०.९४ कोटींचे वाटप केले ही २५.५२ टक्केवारी आहे. यातुलनेत जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,६४,३२९ शेतकरी खातेदारांना १०२५.९१ कोटींचे वाटप केले. ही ४४.४९ टक्केवारी आहे, तर ग्रामीण बँकांना ८३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १४,११७ शेतकऱ्यांना १२५.२९ कोटींचे कर्जवाटप केले. ही १५.०५ टक्केवारी आहे. 

टॅग्स :amravati-pcअमरावतीbankबँकfarmer suicideशेतकरी आत्महत्याBanking Sectorबँकिंग क्षेत्र