शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

२९ टक्के कर्जवाटपावर बँका स्थिर, पश्चिम विदर्भात शेतकरी अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 19:44 IST

राष्ट्रीयीकृत अन् ग्रामीण बँकांचा टक्का माघारला

अमरावती : यंदाच्या हंगामात सुरुवातीला पाऊस माघारल्याने खरिपाची दुबार पेरणी करावी लागली. शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपात बँकांचे सहकार्य राहिले. पश्चिम विदर्भात ८५३९.३२ कोटी पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना पाच महिन्यांत बँकांनी ३,३०,८३४ शेतकऱ्यांना २५३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले, याची २९ टक्केवारी आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपात माघारल्याचे वास्तव आहे.

सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. यावर शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असली तरी अटी-शर्तींमध्ये लाखो शेतकºयांचा सात-बारा कोरा झालाच नाही. सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना  बँका पीककर्ज नाकारत आहेत. प्रशासनाच्या तंबीला बँका जुमानत नसल्याने या बँकांवर अंकुश कुणाचा, हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यंदाच्या हंगामासाठी अमरावती जिल्ह्यात १६८५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४३,५२३ शेतकºयांना ३६,००२ हेक्टर क्षेत्रासाठी ४७४.३६ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात १३९८.७८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ४६,६८४ शेतकऱ्यांना ४८,५१६ हेक्टरसाठी ३९९.२१ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८.५४ टक्केवारी आहे. वाशीम जिल्ह्यात १५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४०,८९४ शेतकरी खातेदारांना ४४,९२५ हेक्टरसाठी ३३१.८७  कोटींचे वाटप करण्यात आले. ही २१.६९ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात १७७३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २९,४१३ शेतकºयांना ८०७८ हेक्टर क्षेत्रासाठी २३३.६० कोटींचे पीककर्जवाटप करण्यात आले. ही १३.१७ टक्केवारी आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात २१६१ कोटींच्या पीकर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,७०,२६० शेतकºयांना १,०६,४१२ हेक्टर क्षेत्रासाठी १०९३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५०.५६ टक्केवारी आहे.

राट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानेनायंदाच्या हंगामासाठी विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११.०३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे. आता खरीप हंगामाचे वाटप संपत आले असताना या बँकांनी १,५२,३८८ शेतकऱ्यांना १३८०.९४ कोटींचे वाटप केले ही २५.५२ टक्केवारी आहे. यातुलनेत जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,६४,३२९ शेतकरी खातेदारांना १०२५.९१ कोटींचे वाटप केले. ही ४४.४९ टक्केवारी आहे, तर ग्रामीण बँकांना ८३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १४,११७ शेतकऱ्यांना १२५.२९ कोटींचे कर्जवाटप केले. ही १५.०५ टक्केवारी आहे. 

टॅग्स :amravati-pcअमरावतीbankबँकfarmer suicideशेतकरी आत्महत्याBanking Sectorबँकिंग क्षेत्र