शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

२९ टक्के कर्जवाटपावर बँका स्थिर, पश्चिम विदर्भात शेतकरी अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 19:44 IST

राष्ट्रीयीकृत अन् ग्रामीण बँकांचा टक्का माघारला

अमरावती : यंदाच्या हंगामात सुरुवातीला पाऊस माघारल्याने खरिपाची दुबार पेरणी करावी लागली. शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपात बँकांचे सहकार्य राहिले. पश्चिम विदर्भात ८५३९.३२ कोटी पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना पाच महिन्यांत बँकांनी ३,३०,८३४ शेतकऱ्यांना २५३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले, याची २९ टक्केवारी आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपात माघारल्याचे वास्तव आहे.

सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. यावर शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असली तरी अटी-शर्तींमध्ये लाखो शेतकºयांचा सात-बारा कोरा झालाच नाही. सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना  बँका पीककर्ज नाकारत आहेत. प्रशासनाच्या तंबीला बँका जुमानत नसल्याने या बँकांवर अंकुश कुणाचा, हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यंदाच्या हंगामासाठी अमरावती जिल्ह्यात १६८५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४३,५२३ शेतकºयांना ३६,००२ हेक्टर क्षेत्रासाठी ४७४.३६ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात १३९८.७८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ४६,६८४ शेतकऱ्यांना ४८,५१६ हेक्टरसाठी ३९९.२१ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८.५४ टक्केवारी आहे. वाशीम जिल्ह्यात १५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४०,८९४ शेतकरी खातेदारांना ४४,९२५ हेक्टरसाठी ३३१.८७  कोटींचे वाटप करण्यात आले. ही २१.६९ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात १७७३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २९,४१३ शेतकºयांना ८०७८ हेक्टर क्षेत्रासाठी २३३.६० कोटींचे पीककर्जवाटप करण्यात आले. ही १३.१७ टक्केवारी आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात २१६१ कोटींच्या पीकर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,७०,२६० शेतकºयांना १,०६,४१२ हेक्टर क्षेत्रासाठी १०९३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५०.५६ टक्केवारी आहे.

राट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानेनायंदाच्या हंगामासाठी विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११.०३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे. आता खरीप हंगामाचे वाटप संपत आले असताना या बँकांनी १,५२,३८८ शेतकऱ्यांना १३८०.९४ कोटींचे वाटप केले ही २५.५२ टक्केवारी आहे. यातुलनेत जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,६४,३२९ शेतकरी खातेदारांना १०२५.९१ कोटींचे वाटप केले. ही ४४.४९ टक्केवारी आहे, तर ग्रामीण बँकांना ८३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १४,११७ शेतकऱ्यांना १२५.२९ कोटींचे कर्जवाटप केले. ही १५.०५ टक्केवारी आहे. 

टॅग्स :amravati-pcअमरावतीbankबँकfarmer suicideशेतकरी आत्महत्याBanking Sectorबँकिंग क्षेत्र