शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST

चांदूर बाजार : खरीप हंगामातील पिकाचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेल्या तुरीवरसुद्धा ...

चांदूर बाजार : खरीप हंगामातील पिकाचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेल्या तुरीवरसुद्धा वातावरणातील बदलांमुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज भासत असल्याची चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

यावर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे परिसरातील सोयाबीन, मूग, उडीद तसेच बोंडअळीमुळे कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच भागांतील सोयाबीन, उडीद, मूग पीक शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. तूर पिकावरसुद्धा वातावरणातील बदलामुळे शेंगा पोखरणारी अळीचे मोठ्या प्रमाणात संकट उभे ठाकले आहे.

सध्या तूर पिकाला फुले, शेंगांचा चांगलाच बहर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही दिवस ढगाळलेल्या वातावरणातील बदलांमुळे या पिकावर, शेंगा पोखरणाऱ्या अळीने आक्रमण केले. यामुळे तूर पिकाचे भविष्यसुद्धा धोक्यात येत असल्याचे स्पष्ट रूप दिसून येत आहे. आजपर्यंत डोलदार दिसणारे तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाते की काय, अशी परिस्थिती या शेंगा पोखरणाऱ्या अळीने शेतकऱ्यांपुढे उभी केली आहे. त्यामुळे या परिसरातील तूर पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सोयाबीन, कपाशी, मूग पिकाचे झालेल्या नुकसानापासून शेतकरी सावरला नसताना, पिकाच्या नुकसानाच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे खचून गेलेल्या शेतकऱ्यांना तूर पिकावर आलेल्या शेंगा पोखरणाऱ्या पाळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज भासू लागली आहे.

--------------------

तूर पिकावर पाने गुंडळणारी व शेंगा पोखणाऱ्याला अळीचा प्रादुर्भाव होत आहे. हे आर्थिक नुकसान पातळीच्या आत दिसून येत असून, त्यावर क्षेत्रिया कर्मचाऱ्यांमार्फत उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे सुरू आहे. शेतकऱ्यांनी पाच टक्के निंबोळी अर्काची तसेच अझाडिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिलिची फवारणी तुरीवर करावी.

- अंकुश जोगदंड, तालुका कूषी अधिकारी