शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

कंकणाकृती सूर्यग्रहणाचा आज विलोभनीय खगोलीय अविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

गुरुवारच्या कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी अमावस्या असून, चंद्र सूर्यबिंबाच्या समोरून प्रवास करणार आहे. अर्थात पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध चंद्र येणार आहे. यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे ग्रहणाची मध्यवस्था असताना, चंद्राच्या सर्व बाजूंनी सूर्याची तेजस्वी कडा दिसेल.

ठळक मुद्दे१३२ व्या सारोस चक्रातील हे ४६ वे सूर्यग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाच्या दक्षिण भागातून गुरुवारी सकाळी ८ ते ११ दरम्यान कंकणाकृती, तर उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण हा खगोलीय अविष्कार सर्वांना अनुभवता येणार आहे. याआधी सुमारे १० वर्षांपूर्वी २२ जुलै २००९ ला, तर त्यानंतर १५ जानेवारी २०१० रोजी कंकणाकृती ग्रहण दिसले होते.गुरुवारच्या कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी अमावस्या असून, चंद्र सूर्यबिंबाच्या समोरून प्रवास करणार आहे. अर्थात पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध चंद्र येणार आहे. यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे ग्रहणाची मध्यवस्था असताना, चंद्राच्या सर्व बाजूंनी सूर्याची तेजस्वी कडा दिसेल. या ग्रहणात चंद्राच्या सावलीची जमिनीवरील मार्गाची रुंदी १६४ किलोमीटर आहे. हा गडद सावलीचा पट्टा केरळमधील कुन्नूर, तामिळनाडू राज्यातील कोइमतूर, कराईकुडी या शहरांजवळून जाणार आहे. त्यामुळे या भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. आखाती देश तसेच आशियाई देशांमधून हे ग्रहण दिसेल तसेच देशाच्या इतर भागासह महाराष्ट्रातून खंडग्रास अवस्था दिसेल. महाराष्ट्रातून सूर्य सुमारे ७० ते ७५ टक्के झाकलेला दिसेल. याला खंडग्रास अवस्था असे म्हणतात. ग्रहणास ८ वाजून ४ मिनिटांनी सुरुवात होईल. ९ वाजून ३० मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाचा मध्य दिसेल. सकाळी १०.५७ वाजता ग्रहण संपेल. एका वर्षात संपूर्ण जगभरात किमान दोन ते कमाल पाच ग्रहणे होतात. ही ग्रहणे खग्रास, खंडग्रास अथवा कंकणाकृती यापैकी एक असते. २१ जून २०२० रोजी आणखी एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमधील काही भागांतून पाहता येणार असल्याचे प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.सारोस चक्र म्हणजे काय ?एकदा एक ग्रहण झाल्यानंतर साधारण अठरा ते साडेअठरा वर्षाच्या अंतराने पुन्हा ग्रहण होते. या चक्राला सारोस चक्र असे म्हणतात. यानंतर ठरावीक कालावधीनंतर ठरावीक भागात ही ग्रहणे विविध प्रकारात दिसून येतात. अशी साधारण ७० ते ८० ग्रहणे होतात तेव्हा एक चक्र पूर्ण होते. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे असे घडते.ग्रहण कसे पहावे ?सुरक्षित मायलर फिल्मपासून बनवलेले चष्मे वापरावेत. वेल्डिंग काचही वापरता येईल. दुर्बिणीवर मायलर फिल्म बसवूनही अवलोकन करता येईल. जर मायलर फिल्म नसेल, तर दुर्बिणीच्या आयपीसवर पांढरा जाड कागद धरुन ठेवून प्रतिमा मिळवता येईल. प्लास्टिकच्या मध्यम आकाराच्या बॉलवर रेती भरून गोल आरसा चिटकवावा. हा बॉल सूर्यप्रकाशात गोल रिंगवर ठेवावा. प्रकाशकिरणे आरशावरून भिंतीवर पडतील. त्या ठिकाणी पांढरा कागद चिटकवावा.ग्रहण आणि अंधश्रद्धाग्रहणात गरोदर स्त्रियांना होणारे मूल अंध, अपंग वा ओठ चिरलेले असे होऊ शकते. ग्रहणकाळात अन्न-वस्त्र दान करणे, प्यायचे पाणी नष्ट करणे, दारे-खिडक्या बंद करून घरातच बसणे, चाकूचा वापर न करणे, पूजापाठ करणे व नंतर आंघोळ करणे अशा अनेक अंधश्रद्धा समाजात दिसून येतात. परंतु, मानवी जीवनावर या ग्रहणाचा परिणाम होत नसल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोलप्रेमी विजय गिरुळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक