शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

कंकणाकृती सूर्यग्रहणाचा आज विलोभनीय खगोलीय अविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

गुरुवारच्या कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी अमावस्या असून, चंद्र सूर्यबिंबाच्या समोरून प्रवास करणार आहे. अर्थात पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध चंद्र येणार आहे. यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे ग्रहणाची मध्यवस्था असताना, चंद्राच्या सर्व बाजूंनी सूर्याची तेजस्वी कडा दिसेल.

ठळक मुद्दे१३२ व्या सारोस चक्रातील हे ४६ वे सूर्यग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाच्या दक्षिण भागातून गुरुवारी सकाळी ८ ते ११ दरम्यान कंकणाकृती, तर उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण हा खगोलीय अविष्कार सर्वांना अनुभवता येणार आहे. याआधी सुमारे १० वर्षांपूर्वी २२ जुलै २००९ ला, तर त्यानंतर १५ जानेवारी २०१० रोजी कंकणाकृती ग्रहण दिसले होते.गुरुवारच्या कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी अमावस्या असून, चंद्र सूर्यबिंबाच्या समोरून प्रवास करणार आहे. अर्थात पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध चंद्र येणार आहे. यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे ग्रहणाची मध्यवस्था असताना, चंद्राच्या सर्व बाजूंनी सूर्याची तेजस्वी कडा दिसेल. या ग्रहणात चंद्राच्या सावलीची जमिनीवरील मार्गाची रुंदी १६४ किलोमीटर आहे. हा गडद सावलीचा पट्टा केरळमधील कुन्नूर, तामिळनाडू राज्यातील कोइमतूर, कराईकुडी या शहरांजवळून जाणार आहे. त्यामुळे या भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. आखाती देश तसेच आशियाई देशांमधून हे ग्रहण दिसेल तसेच देशाच्या इतर भागासह महाराष्ट्रातून खंडग्रास अवस्था दिसेल. महाराष्ट्रातून सूर्य सुमारे ७० ते ७५ टक्के झाकलेला दिसेल. याला खंडग्रास अवस्था असे म्हणतात. ग्रहणास ८ वाजून ४ मिनिटांनी सुरुवात होईल. ९ वाजून ३० मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाचा मध्य दिसेल. सकाळी १०.५७ वाजता ग्रहण संपेल. एका वर्षात संपूर्ण जगभरात किमान दोन ते कमाल पाच ग्रहणे होतात. ही ग्रहणे खग्रास, खंडग्रास अथवा कंकणाकृती यापैकी एक असते. २१ जून २०२० रोजी आणखी एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमधील काही भागांतून पाहता येणार असल्याचे प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.सारोस चक्र म्हणजे काय ?एकदा एक ग्रहण झाल्यानंतर साधारण अठरा ते साडेअठरा वर्षाच्या अंतराने पुन्हा ग्रहण होते. या चक्राला सारोस चक्र असे म्हणतात. यानंतर ठरावीक कालावधीनंतर ठरावीक भागात ही ग्रहणे विविध प्रकारात दिसून येतात. अशी साधारण ७० ते ८० ग्रहणे होतात तेव्हा एक चक्र पूर्ण होते. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे असे घडते.ग्रहण कसे पहावे ?सुरक्षित मायलर फिल्मपासून बनवलेले चष्मे वापरावेत. वेल्डिंग काचही वापरता येईल. दुर्बिणीवर मायलर फिल्म बसवूनही अवलोकन करता येईल. जर मायलर फिल्म नसेल, तर दुर्बिणीच्या आयपीसवर पांढरा जाड कागद धरुन ठेवून प्रतिमा मिळवता येईल. प्लास्टिकच्या मध्यम आकाराच्या बॉलवर रेती भरून गोल आरसा चिटकवावा. हा बॉल सूर्यप्रकाशात गोल रिंगवर ठेवावा. प्रकाशकिरणे आरशावरून भिंतीवर पडतील. त्या ठिकाणी पांढरा कागद चिटकवावा.ग्रहण आणि अंधश्रद्धाग्रहणात गरोदर स्त्रियांना होणारे मूल अंध, अपंग वा ओठ चिरलेले असे होऊ शकते. ग्रहणकाळात अन्न-वस्त्र दान करणे, प्यायचे पाणी नष्ट करणे, दारे-खिडक्या बंद करून घरातच बसणे, चाकूचा वापर न करणे, पूजापाठ करणे व नंतर आंघोळ करणे अशा अनेक अंधश्रद्धा समाजात दिसून येतात. परंतु, मानवी जीवनावर या ग्रहणाचा परिणाम होत नसल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोलप्रेमी विजय गिरुळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक