शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अस्मानी, सुल्तानी संकटाचे २८४७ बळी !

By admin | Updated: June 19, 2016 00:08 IST

अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, ...

१६७२ प्रकरणे अपात्र : ११३७ कुटुंबांना मदतीचा हातअमरावती : अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, पावसाची अनियमितता, डोईवर असलेले कर्ज आणि कुटुंबांच्या उदरभरणाच्या प्रश्नांचे हे आत्मघाती बळी आहेत. सन २००१ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे भयावह सत्र अरबोंच्या उपाययोजनांशी थांबलेले नाही. विदर्भातील वर्धा आणि अमरावती विभागातील पाच अशा सहा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जगात सर्वदूर अपप्रसिद्धी मिळाली. त्यात यवतमाळ पाठोपाठ सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद ‘अंबानगरी’त झाली. डॉ.पंजाबराव देशमुखांसारख्या ‘कृषी’रत्नांच्या जिल्ह्याच्या कपाळावरील शेतकरी आत्महत्यांचा काळा डाग कायमच्या पुसण्यासाठी उपाययोजनांचा पायंडा घालण्यात आला; तथापि अंमलबजावणीअभावी अरबो-खबरो रुपयांच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र अव्याहतपणे सुरू राहिले. निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि अपुऱ्या, अवेळी येणाऱ्या पावसाने त्यात भर घातली. पाणी टंचाई व त्यामागोमाग येणाऱ्या भयाण दुष्काळानेही शेतकरी आत्महत्येसारखे आत्मघातकी पावलाकडे वळला. कर्ज वाटप असो की, कर्जाचे पुनर्गठन, सावकारी कर्ज असो की, खासगी सहकारी बॅँकांचे प्रत्येक बाबतीत शेतकरी नावडले जात आहे. त्याचाच दृश्य परिपाक शेतकरी आत्महत्यांचा वाढत्या घटनांमधून उघड होत आहे. लाखो रुपये उत्पादन खर्च लावून कापूस, सोयाबीनसारखी नगदी पिके हातची गेल्याने आणि तद्नंतर मुला-मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न कसे करायचे? या विवंचनेत शेतकरी परिस्थितीसमोर नतमस्तक होतो आहे. सन २००१ ते जून २०१६ या साढे पंधरा वर्षांत अमरावती जिल्ह्यात २,८४७ शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन दरबारी आहे. त्यातील १,१३७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे पत्र गनण्यात आली तर तब्बल १६७२ शेतकरी आत्महत्या मदतीच्या निकषासाठी अपात्र ठरविण्यात आल्या. ३८ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. ११३७ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी तुटपुंजी आर्थिक मदत देण्यात आली. मान्सून जोरदार बरसावा या चिंबवर्षावात शेतकरी आत्महत्यांचा डाग पुसून निघावा अशी तमाम शेतकरी कष्टकऱ्यांची आस आहे.