शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी, सुल्तानी संकटाचे २८४७ बळी !

By admin | Updated: June 19, 2016 00:08 IST

अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, ...

१६७२ प्रकरणे अपात्र : ११३७ कुटुंबांना मदतीचा हातअमरावती : अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, पावसाची अनियमितता, डोईवर असलेले कर्ज आणि कुटुंबांच्या उदरभरणाच्या प्रश्नांचे हे आत्मघाती बळी आहेत. सन २००१ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे भयावह सत्र अरबोंच्या उपाययोजनांशी थांबलेले नाही. विदर्भातील वर्धा आणि अमरावती विभागातील पाच अशा सहा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जगात सर्वदूर अपप्रसिद्धी मिळाली. त्यात यवतमाळ पाठोपाठ सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद ‘अंबानगरी’त झाली. डॉ.पंजाबराव देशमुखांसारख्या ‘कृषी’रत्नांच्या जिल्ह्याच्या कपाळावरील शेतकरी आत्महत्यांचा काळा डाग कायमच्या पुसण्यासाठी उपाययोजनांचा पायंडा घालण्यात आला; तथापि अंमलबजावणीअभावी अरबो-खबरो रुपयांच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र अव्याहतपणे सुरू राहिले. निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि अपुऱ्या, अवेळी येणाऱ्या पावसाने त्यात भर घातली. पाणी टंचाई व त्यामागोमाग येणाऱ्या भयाण दुष्काळानेही शेतकरी आत्महत्येसारखे आत्मघातकी पावलाकडे वळला. कर्ज वाटप असो की, कर्जाचे पुनर्गठन, सावकारी कर्ज असो की, खासगी सहकारी बॅँकांचे प्रत्येक बाबतीत शेतकरी नावडले जात आहे. त्याचाच दृश्य परिपाक शेतकरी आत्महत्यांचा वाढत्या घटनांमधून उघड होत आहे. लाखो रुपये उत्पादन खर्च लावून कापूस, सोयाबीनसारखी नगदी पिके हातची गेल्याने आणि तद्नंतर मुला-मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न कसे करायचे? या विवंचनेत शेतकरी परिस्थितीसमोर नतमस्तक होतो आहे. सन २००१ ते जून २०१६ या साढे पंधरा वर्षांत अमरावती जिल्ह्यात २,८४७ शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन दरबारी आहे. त्यातील १,१३७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे पत्र गनण्यात आली तर तब्बल १६७२ शेतकरी आत्महत्या मदतीच्या निकषासाठी अपात्र ठरविण्यात आल्या. ३८ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. ११३७ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी तुटपुंजी आर्थिक मदत देण्यात आली. मान्सून जोरदार बरसावा या चिंबवर्षावात शेतकरी आत्महत्यांचा डाग पुसून निघावा अशी तमाम शेतकरी कष्टकऱ्यांची आस आहे.