शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी, सुल्तानी संकटाचे २८४७ बळी !

By admin | Updated: June 19, 2016 00:08 IST

अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, ...

१६७२ प्रकरणे अपात्र : ११३७ कुटुंबांना मदतीचा हातअमरावती : अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, पावसाची अनियमितता, डोईवर असलेले कर्ज आणि कुटुंबांच्या उदरभरणाच्या प्रश्नांचे हे आत्मघाती बळी आहेत. सन २००१ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे भयावह सत्र अरबोंच्या उपाययोजनांशी थांबलेले नाही. विदर्भातील वर्धा आणि अमरावती विभागातील पाच अशा सहा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जगात सर्वदूर अपप्रसिद्धी मिळाली. त्यात यवतमाळ पाठोपाठ सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद ‘अंबानगरी’त झाली. डॉ.पंजाबराव देशमुखांसारख्या ‘कृषी’रत्नांच्या जिल्ह्याच्या कपाळावरील शेतकरी आत्महत्यांचा काळा डाग कायमच्या पुसण्यासाठी उपाययोजनांचा पायंडा घालण्यात आला; तथापि अंमलबजावणीअभावी अरबो-खबरो रुपयांच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र अव्याहतपणे सुरू राहिले. निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि अपुऱ्या, अवेळी येणाऱ्या पावसाने त्यात भर घातली. पाणी टंचाई व त्यामागोमाग येणाऱ्या भयाण दुष्काळानेही शेतकरी आत्महत्येसारखे आत्मघातकी पावलाकडे वळला. कर्ज वाटप असो की, कर्जाचे पुनर्गठन, सावकारी कर्ज असो की, खासगी सहकारी बॅँकांचे प्रत्येक बाबतीत शेतकरी नावडले जात आहे. त्याचाच दृश्य परिपाक शेतकरी आत्महत्यांचा वाढत्या घटनांमधून उघड होत आहे. लाखो रुपये उत्पादन खर्च लावून कापूस, सोयाबीनसारखी नगदी पिके हातची गेल्याने आणि तद्नंतर मुला-मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न कसे करायचे? या विवंचनेत शेतकरी परिस्थितीसमोर नतमस्तक होतो आहे. सन २००१ ते जून २०१६ या साढे पंधरा वर्षांत अमरावती जिल्ह्यात २,८४७ शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन दरबारी आहे. त्यातील १,१३७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे पत्र गनण्यात आली तर तब्बल १६७२ शेतकरी आत्महत्या मदतीच्या निकषासाठी अपात्र ठरविण्यात आल्या. ३८ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. ११३७ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी तुटपुंजी आर्थिक मदत देण्यात आली. मान्सून जोरदार बरसावा या चिंबवर्षावात शेतकरी आत्महत्यांचा डाग पुसून निघावा अशी तमाम शेतकरी कष्टकऱ्यांची आस आहे.