शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुरमाड मातीवर पसरविले डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

डवरगाव ते गुरुकुंज मोझरी रस्ता डांबरीकरणात सावळागोंधळ अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमीशी जोडणाऱ्या ...

डवरगाव ते गुरुकुंज मोझरी रस्ता डांबरीकरणात सावळागोंधळ

अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमीशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या निर्माणाधीन कार्यात व डांबरीकरणात प्रचंड सावळागोंधळ झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या आजी-माजी पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते, हे विशेष. दोन तालुक्यांच्या बांधकाम विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करणे क्रमप्राप्त झाले आहे.

अनेक महिन्यांपासून अतिशय संथगतीने चाललेल्या या रस्त्याच्या कामात प्रचंड उणिवा असून चक्क पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मुहूर्त साधण्यात आला. सोबतच या तेरा किलोमीटर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पुलसदृश रपट्याची काम संथ व निकृष्ट करण्यात आल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. एकीकडे डांबरीकरण आणि दुसरीकडे पुलाचे अर्धवट बांधकाम अशी परिस्थिती या रस्त्याच्या निर्मितीच्या वेळी पाहायला मिळाली.

पावसाळा सुरू होऊनही मार्गातील अनेक रपट्यांची कामे अर्धवट आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मभूमी ते कर्मभूमी असा दुवा ठरणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होणे क्रमप्राप्त होते. पण, तसे न होता चक्क पुलावर टाकण्यात आलेल्या मुरमाच्या मातीवर डांबरीकरण करण्यात आले. परिणामी अवघ्या तिसऱ्या दिवसांपासून त्या ठिकाणी डांबरीकरण उखडून गेले. डांबरीकरणाचा एकच थर सध्या देण्यात आला असून, रस्त्याचे खडीकरण आणि नंतर डांबरीकरण यात खूप अंतर पडले होते. त्यामुळे खडीकरणाचे अनेक ठिकाणी खड्ड्यात रूपांतर झाले. त्याची योग्य डागडुजी न करताच त्यावरच डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या प्रत्येक पुलावरचे डांबरीकरण उखडले आहे. प्रत्यक्षात रस्ता निर्मिती करताना मातीचा थर पूर्णतः खरडून काढून नंतर खडीकरणावर डांबरीकरण करणे क्रमप्राप्त असते. हा नियमच या रस्ता उभारणीत पायदळी तुडविला गेला.

----------------------------------------------------

बॉक्स

पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरणाचा मुहूर्त

तिवसा-चांदूर रेल्वे रस्त्याची दुरुस्ती व गुरुकुंज मोझरी ते डवरगाव या अमरावती व तिवसा तालुक्यांच्या बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या निर्मितीचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आले. अमरावती- नागपूर महामार्गावर निर्माण झालेले जीवघेणे खड्डे बुजविण्याचे कामही चक्क पावसाळ्यात करण्यात आले आहे.