शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बाजार समित्यांवर होणार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती

By admin | Updated: November 10, 2015 00:25 IST

राज्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ४ तर ५ कोटी पेक्षा...

अध्यादेश : कृषी प्रक्रिया, पणन्, विधी, अर्थशास्त्र, वाणिज्य तज्ज्ञअमरावती : राज्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ४ तर ५ कोटी पेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर दोन तज्ज्ञ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाने याविषयी १६ जून रोजी अध्यादेश काढला होता. त्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्य घटनेच्या कलम २१३ (२) अन्वये अध्यादेश काढल्यानंतर होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हा अध्यादेश सहा महिन्यापर्यंत वैध असतो. या अनुषंगाने विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन १३ जुलै रोजी सुरू झाले होते. तेव्हापासून सहा आठवडे म्हणजेच ४२ दिवसांपर्यंत हा अध्यादेश लागू असतो. तत्पूर्वी या अध्यादेशातील तरतुदीप्रमाणे तज्ज्ञ संचालकांची निवड करावी लागणार आहे. कृषी प्रक्रियेमध्ये नेमल्या जाणाऱ्या तज्ज्ञांचा कृषी प्रक्रियेचा व्यवसाय असावा, अशी अट आहे. त्याचे स्वत:च्या नावे नोंदणी प्रमाणपत्र किंवा कृषी सहकारी प्रक्रिया संस्थेचा संचालक असावा व संस्था गेली ३ वर्ष सातत्याने उत्पादनाखाली असावी, अशीही अट आहे. तसेच कृषी प्रक्रिया उद्योगासाठी पुरस्कारप्राप्त व्यक्तीस प्राधान्य देण्यात आले आहे. या तज्ज्ञांच्या नेमणुकीमुळे बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार असून अनेक बदल घडून येतील.