शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

एकदाच करावा लागणार शिष्यवृत्तीसाठी अर्ज

By admin | Updated: June 8, 2014 23:34 IST

समाज घटकातील विद्यार्थ्यांंना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे हेलपाटे दरवर्षी होऊ नये यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना एकदाच

सामाजिक न्याय विभाग : ११ वीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांंना होणार लाभअमरावती : समाज घटकातील विद्यार्थ्यांंना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे हेलपाटे दरवर्षी होऊ नये यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना एकदाच शिष्यवृत्तीचा अर्ज भरावा लागणार आहे. पुढील शिक्षण होईस्तोवर त्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार नाही. हा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. याची अंमलबजावणी २0१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. विद्यार्थ्यांंनी अभ्यासक्रमासाठी इयत्ता ११ वीत प्रवेश घेतल्यानंतर पूर्ण शिक्षण होईस्तोवर त्यांना या सवलतीचा फायदा होणार आहे. यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर पदवी ते पदव्युत्तरपर्यंंतचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे लागत होते. विहीत मुदतीत अर्ज सादर न झाल्यास लाभापासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांंवर आल्याची अनेक उदाहरणे आहेत, या क्लिष्ट प्रक्रियेत महाविद्यालयीन कर्मचारी देखील विद्यार्थ्यांंना त्रस्त करीत असत. यानंतर सर्व अर्ज समाजकल्याण विभागाकडे जाऊन त्यांची पडताळणी होत असे. यातही छोटी चूक झाल्यास ते लाभापासून वंचित राहत असे. या सर्व प्रक्रियेमधून आता विद्यार्थ्यांंची सुटका झाली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी याच सत्रापासून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)