शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

अ‍ॅन्टीबायोटिकविनाच उपचार

By admin | Updated: October 6, 2016 00:24 IST

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधींचा साठा पाच ते सहा दिवसांपूर्वीच संपल्यामुळे हजारो रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आरोग्य धोक्यात : दररोज ८०० ते ९०० रुग्णांना आवश्यकतावैभव बाबरेकर अमरावतीजिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधींचा साठा पाच ते सहा दिवसांपूर्वीच संपल्यामुळे हजारो रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. औषधींचा पुरवठा करणाऱ्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाराच आहे. जिल्ह्यात‘व्हायरल फिव्हर’चे थैमान सुरू आहे. डेग्यू सदृश आजारानेही जिल्ह्याला ग्रासले आहे. तापाव्यरिक्त विविध आजारांचे रुग्ण जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांचा ओघ कायमच आहे. या आजारी रूग्णांवर डॉक्टरांकडून योग्य तो औषधोपचार केला जात असला तरी उपचारांमध्ये महत्त्वाचे कार्य करणारी प्रतिजैविक इजेक्शनच रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. इर्विनच्या औषधी भांडारात अ‍ॅन्टीबायोटिक औषधी उपलब्ध नाहीत. केवळ अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्यांवरच काम भागविले जात आहे. सेफो टॅक्झीम, सेफ्ट्री अ‍ॅक्झोन, एमआॅक्झीक्लेव आदी अ‍ॅन्टीबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इर्विन रूग्णालयात दररोज ८०० ते ९०० रूग्णांना अ‍ॅन्टीबायोटिक इंजेक्शन दिले जाते. विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यासाठी ही औषधी महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, हे इंजेक्शनच उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांचे आरोग्य बरे होईल तरी कसे, असा प्रश्न आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्षअमरावती : अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधी रुग्णांना दिल्या जात नसल्यामुळे अनेक जण मृत्युच्या दारी किंवा काही रूग्ण दगावल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याऔषधींच्या तुटवड्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. मागणीनुसार औषधींचा तत्काळ पुरवठा करण्यात यावा, असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र आरोग्य विभागाकडूनच औषधींचा पुरवठा करण्यात आला नाही. खासगी क्षेत्राकडे धावशासकीय यंत्रणेकडून अ‍ॅन्टीबायोटिक्सचा पुरवठा थांबल्यामुळे इर्विन प्रशासन गोंधळले आहे. उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांनीच पुढाकार घेत खासगी क्षेत्राकडे धाव घेतली आहे. खासगी क्षेत्रातून ही औषधी विकत घेऊन रुग्णांना दिली जात आहे. मात्र, आता तो साठा सुद्धा संपुष्टात आल्याने समस्या चिघळली आहे. काही अ‍ॅन्टीबायोटिक्स इंजेक्शन संपले आहेत. मात्र, पर्याय म्हणून गोळ्या उपलब्ध आहेत.खासगी क्षेत्रातून इंजेक्शन बोलाविण्यात आले आहेत. औषधी पुरवठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. - अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक.