शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

अ‍ॅन्टीबायोटिकविनाच उपचार

By admin | Updated: October 6, 2016 00:24 IST

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधींचा साठा पाच ते सहा दिवसांपूर्वीच संपल्यामुळे हजारो रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आरोग्य धोक्यात : दररोज ८०० ते ९०० रुग्णांना आवश्यकतावैभव बाबरेकर अमरावतीजिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधींचा साठा पाच ते सहा दिवसांपूर्वीच संपल्यामुळे हजारो रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. औषधींचा पुरवठा करणाऱ्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाराच आहे. जिल्ह्यात‘व्हायरल फिव्हर’चे थैमान सुरू आहे. डेग्यू सदृश आजारानेही जिल्ह्याला ग्रासले आहे. तापाव्यरिक्त विविध आजारांचे रुग्ण जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांचा ओघ कायमच आहे. या आजारी रूग्णांवर डॉक्टरांकडून योग्य तो औषधोपचार केला जात असला तरी उपचारांमध्ये महत्त्वाचे कार्य करणारी प्रतिजैविक इजेक्शनच रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. इर्विनच्या औषधी भांडारात अ‍ॅन्टीबायोटिक औषधी उपलब्ध नाहीत. केवळ अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्यांवरच काम भागविले जात आहे. सेफो टॅक्झीम, सेफ्ट्री अ‍ॅक्झोन, एमआॅक्झीक्लेव आदी अ‍ॅन्टीबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इर्विन रूग्णालयात दररोज ८०० ते ९०० रूग्णांना अ‍ॅन्टीबायोटिक इंजेक्शन दिले जाते. विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यासाठी ही औषधी महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, हे इंजेक्शनच उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांचे आरोग्य बरे होईल तरी कसे, असा प्रश्न आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्षअमरावती : अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधी रुग्णांना दिल्या जात नसल्यामुळे अनेक जण मृत्युच्या दारी किंवा काही रूग्ण दगावल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याऔषधींच्या तुटवड्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. मागणीनुसार औषधींचा तत्काळ पुरवठा करण्यात यावा, असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र आरोग्य विभागाकडूनच औषधींचा पुरवठा करण्यात आला नाही. खासगी क्षेत्राकडे धावशासकीय यंत्रणेकडून अ‍ॅन्टीबायोटिक्सचा पुरवठा थांबल्यामुळे इर्विन प्रशासन गोंधळले आहे. उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांनीच पुढाकार घेत खासगी क्षेत्राकडे धाव घेतली आहे. खासगी क्षेत्रातून ही औषधी विकत घेऊन रुग्णांना दिली जात आहे. मात्र, आता तो साठा सुद्धा संपुष्टात आल्याने समस्या चिघळली आहे. काही अ‍ॅन्टीबायोटिक्स इंजेक्शन संपले आहेत. मात्र, पर्याय म्हणून गोळ्या उपलब्ध आहेत.खासगी क्षेत्रातून इंजेक्शन बोलाविण्यात आले आहेत. औषधी पुरवठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. - अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक.