शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

- हा तर मराठ्यांचा अन्यायाविरूद्ध आक्रोश !

By admin | Updated: September 23, 2016 00:21 IST

मराठा समाज एकेकाळी सधन होता. परंतु सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे हा समाज माघारत गेला.

ना. प्रवीण पोटे : ११ लाख मराठ्यांचा सहभाग अमरावती : मराठा समाज एकेकाळी सधन होता. परंतु सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे हा समाज माघारत गेला. समाजाची सर्वच क्षेत्रात पिछेहाट होत गेली. मात्र, आता या अन्यायाने परिसीमा ओलांडली आहे. ६९ वर्षांनंतर मराठा समाज जागृत झाला असून या अन्यायाविरूद्धचा आक्रोशच या ‘न भूतो न भविष्यती’ मूकमोर्चातून उफाळून आला आहे. म्हणूनच शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मंजूर कराव्यात, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी काढण्यात आलेल्या मूकमोर्चाने आजवरच्या मोर्चांचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायला विरोध करण्याकरिताच हा समाज रस्त्यावर उतरल्याचा पुनरूच्चार यावेळी पालकमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, कधीकाळी मराठा समाज भूपती होता. परंतु आज या समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोपर्डीतील घटनेने या समाजाचा संयम पूर्णपणे ढळला. यातूनच समाज एकवटला आणि या अन्यायाच्या बिजांमधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जन्मली आहे. हा मोर्चा शासन अथवा कोणत्याही समाजाविरूद्ध नाही, ही बाब पालकमंत्र्यांनी स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे शेतमालाला योग्य भाव, मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती मिळावी या मागण्यांसाठी हा मूक आक्रोश आहे, असे ते म्हणाले. मोर्चेकऱ्यांच्या संख्येबाबत प्रशासनाकडून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी कानोसा घेतला असता तब्बल साडेआठ लाख लोक अमरावतीत दाखल झाल्याची माहिती होती. मात्र, दुपारी २ वाजता ही संख्या ११ लाखांच्यावर पोहोचल्याचा दावा ना. पोटे यांनी केला. मोर्चा शिस्तबद्ध तितकाच लक्षणीय होता. मोर्चेकऱ्यांच्या मागणीनुसार अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचा सूर आहे, ही बाब राज्य शासनाने मान्य करावी. सततची नापिकी, दुष्काळ आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणारे ९० टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत, असे ते म्हणाले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून या मोर्चाविषयी मुख्यमंत्र्यांना इत्यंभूत माहिती दिली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न असेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजाची शासनपूरक भूमिका असून हा मोर्चा कोणत्याही समाजाविरोधी नसल्याचे ना. पोेटे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. (प्रतिनिधी)