शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

अंगणवाडीतील बालकांना शाळेचे दर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना, शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. ...

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना, शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी, बालवाडीतील गतवर्षातील व यावर्षीच्याही विद्यार्थ्यांना शाळेचे दर्शन दुर्लभच होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गतवर्षी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला होता तसेच सत्राच्या शेवटी परीक्षा न देता पुढील वर्गासाठी ते पात्र ठरले. परंतु, अंगणवाडी, बालवाडीतील विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हातात वही, पाटी-पेन्सिल न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्या सर्वांनी आपल्या शिक्षकांसह शाळेचेही वर्षभरात तोंड पाहिलेले नाही. प्राथमिक विद्यार्थ्यांना त्या वर्गाचा अभ्यास तर सोडाच, शाळा व तेथील शिक्षकांची ओळखदेखील न होता पुढील वर्गात प्रवेश केला. त्यामुळे इतर पालकांची चिंता अधिक वाढली आहे.

यावर्षी मुलांवर कोरोनाने भयंकर संकट ओढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जूनपासून शाळा नियमित सुरू होणे अशक्य आहे. विद्यार्थ्यांना अक्षरओळख, अंकज्ञान व अन्य विषयांचे ज्ञान न होता, त्यांना पुढील वर्गात बसविणे पालकांना धोक्याचे वाटते. ऑनलाईन शिक्षणाचा विचार केल्यास, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना अद्याप अँड्रॉईड मोबाइल उपलब्ध झालेला नाही. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत. प्रत्येक गावात मोबाईलची रेंज नाही. असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहापासून वर्षभर तरी दूर आहेत. वर्गातील प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाईन शिक्षणात फरक पडत असून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा मोबाईलवरील खेळ व इतर गोष्टीत रस वाटतो. पालक व शिक्षकांचे लक्ष चुकवून ते अशा गोष्टी करीत असतात. ऑनलाईन शिक्षण त्यांच्या पचनी पडण्यासाठी काही अवधी लागेल.

कोट

माझा मुलगा मागील वर्षी पहिलीत गेला. तो शाळेत न जाता पास झाला. शाळेची व शिक्षकांची ओळखही न होता यावर्षी तो दुसरीत जाईल. त्याच्या ज्ञानाचे काय?

अतुल कावरे, पालक