शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पालकमंत्र्यांनी स्वीकारावे पुनर्वसित गावाचे पालकत्व! निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांची मागणी

By प्रदीप भाकरे | Updated: February 22, 2025 20:44 IST

Amravati News: अप्पर वर्धा प्रकल्पानंतर जिल्ह्यात सर्वात मोठ्या ठरू पाहणाऱ्या निम्न पेढी सिंचन प्रकल्पाची घळभरणी यंदाच्या जूनमध्ये प्रस्तावित असली तरी ती रखडलेल्या स्थलांतरणामुळे होणार की नाही, अशी शंका असताना सुसज्ज मूलभूत सुविधांसाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे.

अमरावती - अप्पर वर्धा प्रकल्पानंतर जिल्ह्यात सर्वात मोठ्या ठरू पाहणाऱ्या निम्न पेढी सिंचन प्रकल्पाची घळभरणी यंदाच्या जूनमध्ये प्रस्तावित असली तरी ती रखडलेल्या स्थलांतरणामुळे होणार की नाही, अशी शंका असताना सुसज्ज मूलभूत सुविधांसाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सिंचन भवनात भेट घेतली. तथा पिण्याचे पाणी व पुनर्वसनस्थळी मूलभूत सुसज्ज सुुविधा पुरविल्यानंतरच स्थलांतरण, अशी मागणी रेटून धरली. पालकमंत्र्यांनी अळणगाव या पुनर्वसित गावाचे पालकत्व स्वीकारावे, अशी आर्त हाकही दिली.

निम्न पेढी प्रकल्पाअंतर्गत अळणगाव या गावाचे पुनर्वसन अमरावतीलगतच्या कठोरा शिवारात करण्यात आले. मात्र या प्रकल्पाला जुन्या कायद्यानुसार मूलभूत सुविधा देय असल्याने प्रकल्पग्रस्तांची मानसिकता नकारात्मक होत चालली आहे. येथे बाभूळबन निर्माण झाले असून, पिण्याचे पाणीदेखील नाही. नाल्या बुजल्या आहेत. काही इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्यामुळे आपण या गावाचे पालकत्व स्वीकारून या पुनर्वसित गावात विकासात्मक कामे करावीत व हे गाव राज्यभरातील पुनर्वसितांसाठी मॉडेल म्हणून उभे राहावे, अशी विनंती प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आ. रवी राणा यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी सरपंच गौतम खंडारे, सतीश मेटांगे, पंजाबराव दुर्गे, प्रवीण घोंगडे आदी उपस्थित होते. 

पाच गावे बुडीत क्षेत्रातनिम्न पेढी प्रकल्पाअंतर्गत हातुर्णा, अळणगाव, गोपगव्हाण, कुंड खुर्द व कुंड सुर्जापूर ही पाच गावे पूर्णत: बुडीत क्षेत्रात आहे. त्यांचे पाच ठिकाणी पुनर्वसनासाठी जागादेखील देण्यात आली आहे. मात्र त्या पुनर्वसित पाचही गावांत मूलभूत सुविधांची वानवा असल्याने अद्यापपर्यंत पाचही गावातील सुमारे ४० टक्के कुटुंबांनी गावे सोडलेले नाही. त्यांचे स्थलांतरण अडल्याने परिणामी प्रकल्पाची घळभरणीदेखील थांबली आहे.

अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या१) निम्न पेढी प्रकल्पातील एकूण १७६२ बाधित कुटुंबांना ८.२६ लाख रुपये प्रतिकुटुंब सानुग्रह अनुदान द्यावे.२) निम्न पेढी प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबाला सरसकट घरकुलाच्या लाभ देण्यात यावा, कुणालीही अपात्र ठरवू नये.३) निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसन ज्या ठिकाणी मिळालेल्या भूखंडावरील ७/१२ बोझा हटवून कमी करून देण्यात यावा.४) निम्न पेढी प्रकल्पातील ५२ शेतकऱ्यांना २ चा गुणक लागू करून फरकाची रक्कम देण्यात यावी.५) निम्न पेढी प्रकल्पातील पाचही गावांचे जलजीवन मिशनअंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.

पुनर्वसन हवे दर्जेदारनिम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसित गावात पेयजलाची व्यवस्था करावी. अंतर्गत रोडचे डांबरीकरण व बंधिस्त नालीचे बांधकाम, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसह नवीन इमारत बांधकाम करणे, खुले मात्र सरकारी भूखंडांना वॉल कंपाऊंड घालून तेथील स्वच्छता व सौंदर्यीकरण करणे, इलेक्ट्रिक पोलची दुरुस्ती करणे, स्ट्रीट लाइट बसवणे, डी. पी. दुरुस्तीची मागणीदेखील करण्यात आली.

टॅग्स :AmravatiअमरावतीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे