शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

तंटामुक्तीत अमरावती जिल्हा अव्वल

By admin | Updated: April 28, 2015 00:08 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले.

विभागात ८४ हजार तंटे निकाली : बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबित सुरेश सवळे अमरावतीराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. यात नेहमीप्रमाणे अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे अद्यापही प्रलंबित आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत सन २००७ मध्ये तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागात सामाजिक एकोप्याचे वातावरण रहावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या मोहिमेला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. गावातील दिवाणी, फौजदारी व महसुली स्वरुपाचे सर्व तंटे सामोपचाराने मिटविण्याचे अधिकार तंटामुक्त गाव समित्यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तंटामुक्त गाव मोहिमेच्या अनुषंगाने गावात धार्मिक, जातीय सलोखा, सामाजिक एकात्मता तसेच गावहिताचे सामाजिक उपक्रम राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. सात वर्षांत अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे मिटविण्यात आले. या सात वर्षांत दाखल झालेल्या तंट्यांची संख्या ७ लाख ६८ हजार ११७ होती. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने तंटे मिटविले गेले. दाखल झालेल्या १ लाख ६० हजार ३०४ तंट्यांपैकी ४९ हजार ८४२ तंटे निकाली निघाले आहेत. मोहिमेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्याने दाखल ८४,३८२ तंट्यापैकी ३३,२९६ तंटे सामोेपचाराने मिटविले. तंटामुक्त गाव मोहिमेत तिसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा असून या जिल्ह्याने १ लाख ४४९ हजार १९० दाखल तंट्यापैकी १८ हजार ८२६ तंटे निकाली काढले आहेत. मोहिमेत विभागात वाशीम जिल्ह्याचा चवथा क्रमांक लागतो. या जिल्ह्याने ८६ हजार ९०६ दाखल तंट्यापैकी १६ हजार २४० तंटे मिटविले आहेत. मोहिमेत बुलडाणा जिल्ह्याची पिछेहाट झाली असून दाखल सर्वाधिक २ लाख ८७ हजार ३३८ तंट्यापैकी केवळ ८ हजार ९६ तंटेच आपसात निकाली काढण्यात यश आले आहे. बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबितसमोपचाराने तंटे मिटविण्यात बुलडाणा जिल्हा पिछाडीवर असला तरी विभागात सर्वाधिक तंटे याच जिल्ह्यात दाखल आहेत. तंटामुक्त गाव मोहिमेच्या सात वर्षांच्या कार्यकाळात बुलडाणा जिल्ह्यात सामोपचाराने तंटे मिटविण्याबाबत निरुत्साह दिसून आला. त्यामुळे सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्याकडे गृह विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक गावे तंटामुक्त झाल्याचे खरे श्रेय जिल्ह्यातीलच नागरिकांना आहे. येणाऱ्या काळात अमरावती जिल्हाच तंटामुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. - एस. वीरेश प्रभू, जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती.