शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
3
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
4
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
5
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
6
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
7
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
8
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
9
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
10
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
11
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
12
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
13
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
14
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
15
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
16
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
17
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
18
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
19
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
20
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीत अमरावती जिल्हा अव्वल

By admin | Updated: April 28, 2015 00:08 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले.

विभागात ८४ हजार तंटे निकाली : बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबित सुरेश सवळे अमरावतीराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. यात नेहमीप्रमाणे अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे अद्यापही प्रलंबित आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत सन २००७ मध्ये तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागात सामाजिक एकोप्याचे वातावरण रहावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या मोहिमेला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. गावातील दिवाणी, फौजदारी व महसुली स्वरुपाचे सर्व तंटे सामोपचाराने मिटविण्याचे अधिकार तंटामुक्त गाव समित्यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तंटामुक्त गाव मोहिमेच्या अनुषंगाने गावात धार्मिक, जातीय सलोखा, सामाजिक एकात्मता तसेच गावहिताचे सामाजिक उपक्रम राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. सात वर्षांत अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे मिटविण्यात आले. या सात वर्षांत दाखल झालेल्या तंट्यांची संख्या ७ लाख ६८ हजार ११७ होती. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने तंटे मिटविले गेले. दाखल झालेल्या १ लाख ६० हजार ३०४ तंट्यांपैकी ४९ हजार ८४२ तंटे निकाली निघाले आहेत. मोहिमेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्याने दाखल ८४,३८२ तंट्यापैकी ३३,२९६ तंटे सामोेपचाराने मिटविले. तंटामुक्त गाव मोहिमेत तिसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा असून या जिल्ह्याने १ लाख ४४९ हजार १९० दाखल तंट्यापैकी १८ हजार ८२६ तंटे निकाली काढले आहेत. मोहिमेत विभागात वाशीम जिल्ह्याचा चवथा क्रमांक लागतो. या जिल्ह्याने ८६ हजार ९०६ दाखल तंट्यापैकी १६ हजार २४० तंटे मिटविले आहेत. मोहिमेत बुलडाणा जिल्ह्याची पिछेहाट झाली असून दाखल सर्वाधिक २ लाख ८७ हजार ३३८ तंट्यापैकी केवळ ८ हजार ९६ तंटेच आपसात निकाली काढण्यात यश आले आहे. बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबितसमोपचाराने तंटे मिटविण्यात बुलडाणा जिल्हा पिछाडीवर असला तरी विभागात सर्वाधिक तंटे याच जिल्ह्यात दाखल आहेत. तंटामुक्त गाव मोहिमेच्या सात वर्षांच्या कार्यकाळात बुलडाणा जिल्ह्यात सामोपचाराने तंटे मिटविण्याबाबत निरुत्साह दिसून आला. त्यामुळे सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्याकडे गृह विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक गावे तंटामुक्त झाल्याचे खरे श्रेय जिल्ह्यातीलच नागरिकांना आहे. येणाऱ्या काळात अमरावती जिल्हाच तंटामुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. - एस. वीरेश प्रभू, जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती.