शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीत अमरावती जिल्हा अव्वल

By admin | Updated: April 28, 2015 00:08 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले.

विभागात ८४ हजार तंटे निकाली : बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबित सुरेश सवळे अमरावतीराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. यात नेहमीप्रमाणे अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे अद्यापही प्रलंबित आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत सन २००७ मध्ये तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागात सामाजिक एकोप्याचे वातावरण रहावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या मोहिमेला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. गावातील दिवाणी, फौजदारी व महसुली स्वरुपाचे सर्व तंटे सामोपचाराने मिटविण्याचे अधिकार तंटामुक्त गाव समित्यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तंटामुक्त गाव मोहिमेच्या अनुषंगाने गावात धार्मिक, जातीय सलोखा, सामाजिक एकात्मता तसेच गावहिताचे सामाजिक उपक्रम राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. सात वर्षांत अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे मिटविण्यात आले. या सात वर्षांत दाखल झालेल्या तंट्यांची संख्या ७ लाख ६८ हजार ११७ होती. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने तंटे मिटविले गेले. दाखल झालेल्या १ लाख ६० हजार ३०४ तंट्यांपैकी ४९ हजार ८४२ तंटे निकाली निघाले आहेत. मोहिमेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्याने दाखल ८४,३८२ तंट्यापैकी ३३,२९६ तंटे सामोेपचाराने मिटविले. तंटामुक्त गाव मोहिमेत तिसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा असून या जिल्ह्याने १ लाख ४४९ हजार १९० दाखल तंट्यापैकी १८ हजार ८२६ तंटे निकाली काढले आहेत. मोहिमेत विभागात वाशीम जिल्ह्याचा चवथा क्रमांक लागतो. या जिल्ह्याने ८६ हजार ९०६ दाखल तंट्यापैकी १६ हजार २४० तंटे मिटविले आहेत. मोहिमेत बुलडाणा जिल्ह्याची पिछेहाट झाली असून दाखल सर्वाधिक २ लाख ८७ हजार ३३८ तंट्यापैकी केवळ ८ हजार ९६ तंटेच आपसात निकाली काढण्यात यश आले आहे. बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबितसमोपचाराने तंटे मिटविण्यात बुलडाणा जिल्हा पिछाडीवर असला तरी विभागात सर्वाधिक तंटे याच जिल्ह्यात दाखल आहेत. तंटामुक्त गाव मोहिमेच्या सात वर्षांच्या कार्यकाळात बुलडाणा जिल्ह्यात सामोपचाराने तंटे मिटविण्याबाबत निरुत्साह दिसून आला. त्यामुळे सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्याकडे गृह विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक गावे तंटामुक्त झाल्याचे खरे श्रेय जिल्ह्यातीलच नागरिकांना आहे. येणाऱ्या काळात अमरावती जिल्हाच तंटामुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. - एस. वीरेश प्रभू, जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती.