शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फसवणुकीचे अमरावती 'कनेक्शन'

By admin | Updated: January 29, 2015 22:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावावर विमा पॉलिसी काढणाऱ्या प्रकरणातील सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावावर विमा पॉलिसी काढणाऱ्या प्रकरणातील सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. शासकीय कर्मचारी भासवून त्याने अनेक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन हजारो नागरिकांना गंडा घातला आहे. तिवसा ठाण्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींना ३१ जानेवरीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शंभर रुपयांत एक लाखाचा विमा असे आमिष दाखवून भांबोरा, अमदाबाद, पालवाडी या गावांतील कित्येक नागरिकांना राजीव गांधी ग्राम विमा योजना व जीवणदायी ग्राम विमा योजनेच्या नावाने फसवणूक करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज, विमा पॉलिसीच्या पावतीवर शासनाची राजमुद्रा व पावती फाडणारा ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने या नागरिकांची फसगत झाली. भांबोरा व पालवाडी येथील व्यक्ती मृत झाल्यावर त्यांना विमा पॉलिसीचा लाभ मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केल्यावर सरपंच, सचिवांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्यावर ही योजनाच अस्तित्वात नाही व ही कागदपत्रे व स्वाक्षरी जिल्हाधिकाऱ्यांची नाही, असे समजल्यानंतर नातेवार्इंकानी तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली. तिवसा पोलिसांनी राजेश गवळी (अमरावती) व भांबोरा ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गवळी यांना अटक केली. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजेश गवळी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून फसवणुकीचे प्रकार हल्ली वाढले आहेत. मागील महिन्यात शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची असणाऱ्या सुकन्या योजनेमध्ये 'प्रतिनिधी पाहिजेत' या आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. केवळ एसएमएसद्वारे नाव व पत्ता मागवून त्या उमेदवाराला स्पिड पोस्टद्वारे शासनाचे राजमुद्रा अंकित असलेल्या पत्रावर नियुक्तीपत्र पाठविण्यात आले व सातत्याने संपर्क करून योजनेच्या प्रशिक्षणासाठी ६ हजार रुपये दर्शविलेल्या बँक खात्यात जमा करण्याबद्दल फोन आलेत. अनेक नागरिकांनी शासनाच्या राजमुद्रेवर विश्वास ठेवून रक्कमेचा बँक खात्यात भरणा केला. मात्र, तो नंबर कधीच लागला नाही.